लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिव्यात मंगळवारी सकाळी ८.०८ च्या कसारा-सीएसटी जलद लोकलचे दरवाजे न उघडल्याने स्थानकात प्रचंड गोंधळ झाला. दिवा प्रवासी संघटनेने फलाट क्रमांक ४ वर आरपीएफ जवान तैनात करण्याची मागणी केली.तीन दिवसांच्या सुट्टयांनंतर चाकरमानी कामावर निघाले होते. त्यातच दिव्यातील चाकरमानी सकाळी ८.०८ च्या कसारा-सीएसटी जलद लोकल पडण्यासाठी दिवा स्थानकात आली. तेव्हा जोरदार पाऊस पडत होता. लोकल थांबल्यावर आतील प्रवाशांनी दरवाजे न उघडल्याने एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, त्यानंतर जलद लोकल एक तासाने असल्याने प्रवाशांनी यावेळी संताप व्यक्त केला. त्यामुळे तेथे आरपीएफ जवान तैनात करण्याची मागणी केली आहे.
लोकलचे दरवाजे न उघडल्याने दिव्यात गोंधळ
By admin | Updated: June 28, 2017 03:21 IST