शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
2
“CM फडणवीसांच्या डोळ्यात पाणी आले नाही, तर सांगाल ते ऐकेन”; मनोज जरांगेनी दिले चॅलेंज
3
Hotel Bhagyashree : अर्ध्या तासात ७५ हजार रुपये कमावतात 'हॉटेल भाग्यश्री'चे मालक? सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
सनम बेवफा! सर्वाधिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स टॉप २० यादीत महाराष्ट्रातील 'या' २ शहरांचा समावेश
5
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
6
Russia Plane Crash: मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...
7
महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
8
भाग्यवान! संपूर्ण आयुष्य गरिबीत काढलं, आता फळफळलं नशीब; रातोरात 'असा' झाला करोडपती
9
११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन
10
भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी
11
Shravan Special Recipe: २ चमचे तुपात करा महिनाभर टिकणारे उपासाचे लाडू; पचायला हलके आणि करायलाही सोपे 
12
कोणाला हवा सोनम-राजचा जामीन?, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट; ४० लाखाबाबत खुलासा
13
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
14
'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?
15
१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक
16
अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे
17
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?
18
कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर
19
Janhvi Kapoor : कल्याणमधील तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ बघून संतापली जान्हवी कपूर, म्हणाली....
20
Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!

प्रीपेड रिक्षा रात्री नसल्याने गैरसोय

By admin | Updated: June 9, 2015 22:52 IST

भाडे नाकारणे बंद व्हावे व महिलांना रिक्षातून सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने सुरु केलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेला आता महिना उलटला आहे.

ठाणे : भाडे नाकारणे बंद व्हावे व महिलांना रिक्षातून सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने सुरु केलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेला आता महिना उलटला आहे. या सेवेचा महिलांना चांगला फायदा झाला आहे. परंतु रात्रीच्या वेळेस प्रवाशांना या रिक्षा उपलब्ध होत नसल्याने महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रात्री १० नंतर लांबचे भाडे मिळत नसल्याचे कारण प्रिपेड रिक्षा चालकांनी पुढे केले आहे. दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभागाने, प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यात समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.ठाण्यात १ मे पासून या सेवेला सुरवात झाली आहे. या योजनेला आजही फारसा प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. मात्र महिला प्रवाशांनी बऱ्यापैकी या रिक्षांचा वापर करायला सुरवात केली आहे. तरी ज्या उद्देशासाठी ही योजना ठाण्यात सुरु झाली तो उद्देशच सफल होत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये, विशेष करुन महिला प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी आहे. अनेक महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने घरी जाण्यासाठी त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून लांबचा प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या देखील जास्त असल्याने प्रीपेड रिक्षांची सर्वाधिक गरज ही रात्री १० नंतर आहे. मात्र याच वेळेस प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत नाहीत. त्याचवेळी जर प्रीपेड रिक्षा उपलब्ध होणार नसतील तर ही योजना सुरु करुन उपयोग काय? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.रात्री १० नंतर आणि दुपारी २ नंतर रिक्षा उपलब्ध होत नसल्याचे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने सुद्धा मान्य केले आहे. प्रवाशांची वेळ आणि रिक्षाचालकांमध्ये योग्य समन्वय नसल्याने हे सर्व प्रकार घडत आहेत.