शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कोट्यवधींचे धान्य बेवारस पडलेले असून त्याची नासाडी हाेत असल्याचे चित्र दिसत आहे. हे ...

मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कोट्यवधींचे धान्य बेवारस पडलेले असून त्याची नासाडी हाेत असल्याचे चित्र दिसत आहे. हे आयते कुरण मिळाल्याने भटक्या प्राण्यांनी या धान्य गाेदामाचा ताबा घेतल्याने तालुक्यातील खरेदी-विक्री संघाच्या कारभाराचे सर्वत्र धिंडवडे निघत आहेत. या नासाडीबाबत ‘लाेकमत’ने लक्ष वेधूनही त्याकडे खरेदी-विक्री संघाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाने मुरबाड तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुमारे तीन हजार ८८४ शेतकऱ्यांचे ९३ हजार ४२४ क्विंटल धान्य खरेदी केले. त्यापैकी शेकडो शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे़. हे शेतकरी दररोज खरेदी-विक्री संघाकडे फेऱ्या मारत आहेत. खरेदी केलेले धान्य राईस मिलमध्ये भरडून त्यातून मिळणारा तांदूळ रास्त भाव दुकानाला पुरविला जातो. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याची निगा राखण्यासाठी लागणारी साधनसामग्री व मनुष्यबळ संघाला पुरवले जाते. मुरबाड तालुक्यातील शेतकरी संघाने खरेदी कलेल्या या धान्याची याेग्य काळजी घेतली जात नसल्याने नासाडी हाेत आहे. यासाठी दरमहा लाखाे रुपयांचे गाेदाम भाडे भरले जात आहे. मात्र, या गाेदामाला दरवाजे नसल्यामुळे भटक्या जनावरांनी त्याचा ताबा घेतला आहे, तर उर्वरित धान्य हे उघड्यावर टाकून त्यावर प्लास्टिक टाकले आहे. मात्र, अतिवृष्टीच्या काळात हे हजारो क्विंटल धान्य भिजून सडले आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गरिबांची पोटाची खळगी भरण्यासाठी साठवलेल्या धान्याच्या प्रकरणी शेतकरी संघावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत.