शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कोट्यवधींचे धान्य बेवारस पडलेले असून त्याची नासाडी हाेत असल्याचे चित्र दिसत आहे. हे ...

मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कोट्यवधींचे धान्य बेवारस पडलेले असून त्याची नासाडी हाेत असल्याचे चित्र दिसत आहे. हे आयते कुरण मिळाल्याने भटक्या प्राण्यांनी या धान्य गाेदामाचा ताबा घेतल्याने तालुक्यातील खरेदी-विक्री संघाच्या कारभाराचे सर्वत्र धिंडवडे निघत आहेत. या नासाडीबाबत ‘लाेकमत’ने लक्ष वेधूनही त्याकडे खरेदी-विक्री संघाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाने मुरबाड तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुमारे तीन हजार ८८४ शेतकऱ्यांचे ९३ हजार ४२४ क्विंटल धान्य खरेदी केले. त्यापैकी शेकडो शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे़. हे शेतकरी दररोज खरेदी-विक्री संघाकडे फेऱ्या मारत आहेत. खरेदी केलेले धान्य राईस मिलमध्ये भरडून त्यातून मिळणारा तांदूळ रास्त भाव दुकानाला पुरविला जातो. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याची निगा राखण्यासाठी लागणारी साधनसामग्री व मनुष्यबळ संघाला पुरवले जाते. मुरबाड तालुक्यातील शेतकरी संघाने खरेदी कलेल्या या धान्याची याेग्य काळजी घेतली जात नसल्याने नासाडी हाेत आहे. यासाठी दरमहा लाखाे रुपयांचे गाेदाम भाडे भरले जात आहे. मात्र, या गाेदामाला दरवाजे नसल्यामुळे भटक्या जनावरांनी त्याचा ताबा घेतला आहे, तर उर्वरित धान्य हे उघड्यावर टाकून त्यावर प्लास्टिक टाकले आहे. मात्र, अतिवृष्टीच्या काळात हे हजारो क्विंटल धान्य भिजून सडले आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गरिबांची पोटाची खळगी भरण्यासाठी साठवलेल्या धान्याच्या प्रकरणी शेतकरी संघावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत.