शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

महावितरणने थकवली गणेशोत्सव मंडळांची अनामत रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:19 IST

समन्वय समितीचा आरोप : वीजपुरवठ्यासाठी ५० मीटरची वायर

ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महावितरणकडून अनेक मंडळे तात्पुरत्या स्वरूपात वीज घेतात. त्याचे बिलही भरतात. तरीही, शहरातील तब्बल ७५ टक्के मंडळांची मागील पाच ते सहा वर्षांपासूनची अनामत रक्कमच महावितरणने दिली नसल्याचा आरोप गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी समीर सावंत यांनी गुरुवारी केला. त्यावर, महापौर मीनाक्षी शिंदे यांनीसुद्धा महावितरणला खडेबोल सुनावून मंडळांची अनामत रक्कम वेळेत न दिल्याने तुमच्यावर काय कारवाई करायची, असा सवाल केला.

ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी सायंकाळी गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजिली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मीनाक्षी शिंदे होत्या. त्यांच्यासमवेत स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजपचे गटनेते नारायण पवार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले तसेच वाहतूक विभाग, पोलीस, अग्निशमन दल आणि महावितरणचे पदाधिकारी यांच्यासमवेत गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महावितरणवर सावंत यांनी हा आरोप केला.

आम्ही नियमाने परवानगी घेत असतो. परवानगी घेतल्यानंतर अनामत रक्कमही भरतो. जे बिल येते ते सुद्धा भरतो. मात्र, मागील पाच ते सहा वर्षांपासून अनामत रक्कमच परत केली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, गणेशोत्सव मंडळांसाठी ३० मीटरपर्यंतच वायर पुरविली जाते, ती मर्यादाही वाढविण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ज्यांची अनामत रक्कम शिल्लक असेल, ती परत केली जाईल, यासाठी मंडळांनी अर्ज करावेत, असे सांगितले. तसेच महावितरणची तात्पुरती जोडणी मिळविण्यासाठी संबंधित शाखा अभियंत्याकडेच अर्ज करावा आणि ३० मीटरऐवजी ५० मीटरपर्यंतची वाढीव परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी मान्य केले. याच मुद्यावरून महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अनामत रक्कम न देणाºया अधिकाºयांवर काय कारवाई करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही अनामत रक्कम वेळेत परत करण्यात यावी आणि यापुढेही अनामत रक्कम ३० दिवसांच्या आत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना केल्या.

नवीन मंडळांवर लक्ष ठेवामहापालिकेने वेळेत परवानगी देताना वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभागानेही वेळेत परवानगी द्यावी. मंडळांनीही एक महिन्याच्या आत परवानगीसाठी अर्ज सादर करावेत, अशी सूचनाही महापौरांनी केली. तर, रजिस्टर मंडळांपेक्षा नवीन मंडळांची भर मागील काही वर्षांत जास्त पडत आहे. या मंडळांवरदेखील योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत. या मंडळांच्या माध्यमातून केवळ उत्सवाच्या काळात पावत्या फाडल्या जातात आणि उत्सवाच्या काळात नको ते प्रकार त्यांच्याकडून घडत असतात. त्यामुळे अशा मंडळांवर अंकुश ठेवण्यासाठी लक्ष ठेवून योग्य ती पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. गणेशोत्सव विसर्जनासाठी रस्त्याच्या बाजूची एक लेन सेपरेट ठेवण्यात यावी, रात्री १२ च्या आत मंडळांनी गणपती विसर्जन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अर्जांचा निपटारा तत्काळ होणारगणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या अर्जांचा निपटारा प्रभाग समितीनिहाय दोन ते तीन दिवसांत केला जाणार आहे. त्यानुसार, वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभागानेही मंडळांना नाहरकत दाखला तत्काळ देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. त्यानुसार, त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन या दोनही विभागांकडून देण्यात आले. याशिवाय, शाडूच्या, कागदाच्या मूर्तींना प्राधान्य देणे, वृक्षांच्या फांद्या वेळेत छाटणे, शाडूच्या किंवा कागदापासून मूर्ती तयार करणाºयांना अनुदान उपलब्ध करून देणे आदींसह इतर मुद्यांवरसुद्धा यावेळी चर्चा झाली.

टॅग्स :mahavitaranमहावितरण