शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

कोरोना काळात हरवली लोकशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोना काळात सगळे काही ठप्प झाले होते, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याची ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोना काळात सगळे काही ठप्प झाले होते, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हे असली तरी प्रशासनाला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. त्यांना वाटत असेल तरच सगळे ठिकठाक होईल, अन्यथा सामान्य नागरिकांना कुणी वाली नाही. म्हणूनच कोरोना काळात लोकशाही हरवली असून ती कुणी शोधून देता का? अशी टीका ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व संरक्षण विभागातील निवृत्त अधिकारी विवेक पंडित यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण झाली असून, मार्च २०२० पासून लोकशाही हरवली असल्याचे फलक त्यांनी विद्यानिकेतन शाळेच्या बसच्या मागे लावले आहेत.

रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्याबाबत कुठे काही काम सुरू असेल, तर त्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली तर ते देखील ‘म्युनिसिपल ऑफिस में जाके पुछो,’ असे उत्तर देऊन सामान्यांना बेदखल करीत आहेत. कोपर उड्डाणपुलासंदर्भातदेखील कुणी कॉन्ट्रॅक्टर देता का कॉन्ट्रॅक्टर, असा सवाल केल्यावर यंत्रणा जागी झाली, हे सगळ्यांना माहीत आहे. पण असे किती ठिकाणी जनजागरण करायचे? आणि का? असा सवाल त्यांनी केला. सध्या तर इथले आपण निवडून दिलेले मनपाचे विश्वस्त म्हणजेच नगरसेवक यांचा कालावधी संपल्याने त्यांनाही धड जबाबदार धरता येत नसल्याने, थेट प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

शिक्षणाचा बट्ट्याबोळ, लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ

काहीही सुरळीत नाही, याच दुःख असल्याचे पंडित सांगतात. कारण रस्ते धड नाहीत, वीज सतत कुठे ना कुठे खंडित होतच आहे. वाहतूककोंडीवर बोलायचे कुणी? कोपर उड्डाणपूल शुभारंभ भिजत घोंगडे, रेल्वेसेवा सगळ्यांना नाहीच, कोरोना लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ, अधिकारी ऑनफिल्ड नाहीत, शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला असताना केवळ सगळे ठीक सुरू आहे, असे म्हणायचे का? आणि म्हणायचे तरी का? म्हणूनच लोकशाही हरवली आहे, असे म्हंटले तर त्यात वावगे काय, असा सवाल त्यांनी केला.

----------------