शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

दगडी पाटे-वरवंटे ग्रामीण भागातूनही हद्दपार

By admin | Updated: April 4, 2016 02:00 IST

शहरातून दगडी पाटे-वरवंटे केव्हाच गायब झाले व त्यांची जागा मिक्सर, फूड प्रोसेसर यांनी घेतली. धान्य दळण्याची जाती तर इतिहासजमा झाली. आता पॅकबंद आटा घरोघरी वापरला जातो.

सुधाकर वाघ,  धसईशहरातून दगडी पाटे-वरवंटे केव्हाच गायब झाले व त्यांची जागा मिक्सर, फूड प्रोसेसर यांनी घेतली. धान्य दळण्याची जाती तर इतिहासजमा झाली. आता पॅकबंद आटा घरोघरी वापरला जातो. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही पाटे-वरवंटे हद्दपार झाले आहेत. येथील आठवडाबाजारात त्यांची मागणी पूर्णपणे घटली आहे.ग्रामीण भागातही वीजपुरवठ्याची परिस्थिती सुधारल्याने आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी मिक्सर वापरण्याची सुविधा उपलब्ध केल्याने या भागात पाटे-वरवंटे वापरणे बंद झाले आहे. शहरात पिठाच्या चक्क्यांमधून धान्य दळून आणण्याची पद्धत सुरू झाल्यापासून जाती इतिहासजमा झाली. आता अनेक घरांत पॅकबंद आटा, बेसन यांचा वापर केला जातो. ग्रामीण भागातही हेच लोण पसरू लागल्याने तेथील जाती वापरणे थांबले आहे.मुरबाड तालुक्यातील सरळगाव हे आठवडाबाजाराचे ठिकाण आहे. या ठिकाणी दर मंगळवारी हा बाजार भरतो. भाजीपाला तसेच जनावरे विक्र ीसाठी येतात. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी परिसरातील लोक या बाजारात गर्दी करतात. पूर्वी या बाजारात अनेक लोक दगडी पाटे-वरंवटे विकत घेऊन जात. मात्र, आता ते खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे या बाजारात येणारे कारागीर सांगतात.हल्ली त्यांची मागणी खूप कमी झाली आहे. दिवसभर उन्हातान्हात बसून पाटे-वरवंटे तयार केले तरी त्यांची विक्री होत नाही. आतापर्यंत याच गोष्टी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, अशी माहिती अर्जुन जाधव यांनी दिली. यापुढे लोकांना पाटे-वरवंटे वापरायचे नसतील तर माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले.ग्रामीण भागातील काही महिलांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, पाट्या-वरवंट्यावर वाटण करण्यापेक्षा मिक्सरमध्ये करणे अधिक सोयीचे आहे. शिवाय, स्वच्छतेच्या दृष्टीनेही ते अधिक गरजेचे आहे. सध्या घरात असलेले पाटे-वरवंटे वापराविना पडून असल्याने त्याला टाकी लावून घेण्याचा किंवा नव्याने खरेदी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यामुळे हे पारंपरिक व्यवसाय लोप पावण्याची भीती आहे.