शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दगडी पाटे-वरवंटे ग्रामीण भागातूनही हद्दपार

By admin | Updated: April 4, 2016 02:00 IST

शहरातून दगडी पाटे-वरवंटे केव्हाच गायब झाले व त्यांची जागा मिक्सर, फूड प्रोसेसर यांनी घेतली. धान्य दळण्याची जाती तर इतिहासजमा झाली. आता पॅकबंद आटा घरोघरी वापरला जातो.

सुधाकर वाघ,  धसईशहरातून दगडी पाटे-वरवंटे केव्हाच गायब झाले व त्यांची जागा मिक्सर, फूड प्रोसेसर यांनी घेतली. धान्य दळण्याची जाती तर इतिहासजमा झाली. आता पॅकबंद आटा घरोघरी वापरला जातो. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही पाटे-वरवंटे हद्दपार झाले आहेत. येथील आठवडाबाजारात त्यांची मागणी पूर्णपणे घटली आहे.ग्रामीण भागातही वीजपुरवठ्याची परिस्थिती सुधारल्याने आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी मिक्सर वापरण्याची सुविधा उपलब्ध केल्याने या भागात पाटे-वरवंटे वापरणे बंद झाले आहे. शहरात पिठाच्या चक्क्यांमधून धान्य दळून आणण्याची पद्धत सुरू झाल्यापासून जाती इतिहासजमा झाली. आता अनेक घरांत पॅकबंद आटा, बेसन यांचा वापर केला जातो. ग्रामीण भागातही हेच लोण पसरू लागल्याने तेथील जाती वापरणे थांबले आहे.मुरबाड तालुक्यातील सरळगाव हे आठवडाबाजाराचे ठिकाण आहे. या ठिकाणी दर मंगळवारी हा बाजार भरतो. भाजीपाला तसेच जनावरे विक्र ीसाठी येतात. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी परिसरातील लोक या बाजारात गर्दी करतात. पूर्वी या बाजारात अनेक लोक दगडी पाटे-वरंवटे विकत घेऊन जात. मात्र, आता ते खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे या बाजारात येणारे कारागीर सांगतात.हल्ली त्यांची मागणी खूप कमी झाली आहे. दिवसभर उन्हातान्हात बसून पाटे-वरवंटे तयार केले तरी त्यांची विक्री होत नाही. आतापर्यंत याच गोष्टी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, अशी माहिती अर्जुन जाधव यांनी दिली. यापुढे लोकांना पाटे-वरवंटे वापरायचे नसतील तर माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले.ग्रामीण भागातील काही महिलांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, पाट्या-वरवंट्यावर वाटण करण्यापेक्षा मिक्सरमध्ये करणे अधिक सोयीचे आहे. शिवाय, स्वच्छतेच्या दृष्टीनेही ते अधिक गरजेचे आहे. सध्या घरात असलेले पाटे-वरवंटे वापराविना पडून असल्याने त्याला टाकी लावून घेण्याचा किंवा नव्याने खरेदी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यामुळे हे पारंपरिक व्यवसाय लोप पावण्याची भीती आहे.