शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

ठाणे जिल्ह्याला डेंग्यूचा ‘ताप’

By admin | Updated: September 25, 2015 02:18 IST

साथीच्या आजारांनी डोके वर काढले असतानाच जिल्ह्यात तापाचे सुमारे ४१३ रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ ठिकाणच्या साथीच्या उद्रेकांमध्ये ३०८ डेंग्यूची तर हिवतापाचे १०५ रूग्ण आहेत

सुरेश लोखंडे, ठाणेसाथीच्या आजारांनी डोके वर काढले असतानाच जिल्ह्यात तापाचे सुमारे ४१३ रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ ठिकाणच्या साथीच्या उद्रेकांमध्ये ३०८ डेंग्यूची तर हिवतापाचे १०५ रूग्ण आहेत. यात सुमारे आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात जुलै ते ७ सप्टेंबरपर्यंत सुमारे दहा ठिकाणी साथीचा उद्रेक झाला. यामध्ये ३०१ रूग्ण तर मे मध्ये भिवंडी महापालिकेच्या क्षेत्रात उद्भवलेल्या साथीमध्ये सात रूग्ण आढळले. त्यांचे रक्त नमुने घेऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. या कालावधीतील आॅगस्टमध्ये पाच जणांचा तर १० सप्टेंबरपर्यंत तीन रूग्ण दगावले आहेत. सध्या जिल्ह्यात सार्वजनिक उत्सवांची रेलचेल सुरू आहे. त्यात गॅस्ट्रोसह अतिसार, हगवण, कावीळ, हिवताप, विषमज्वर आणि डेंग्यूची साथ डोके वर काढू पहात आहे. यामुळे विविध स्वरूपाच्या तापाने जिल्हा फणफणत असतानाच डेंग्यू या जीवघेण्या आजाराने जिल्ह्यातील सुमारे ३०१ रूग्ण त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यास अनुसरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस सोनावणे यांना विचारणा केली असता, जलजन्य साथीचे आजार आटोक्यात असून जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी डेंग्यूचे संशयित आढळण्याचे प्रमाण वाढल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. कल्याण तालुक्यातील आजदे गावाजवळील पिसवली टाटा पॉवर जवळच्या वस्तीत उद्भवलेल्या साथीमध्ये १४२ रूग्ण, अंबरनाथ तालुक्यातील वडवली येथील साथ उद्रेकात २४, शिवबसव नगरमध्ये १२, सेक्शन अंबरनाथमध्ये १०, शास्त्री नगरमध्ये ४७, ठाणे महापालिकेच्या मानपाडा परिसरात चार, मिरा भार्इंदर मनपाच्या शांतीनगरमध्ये नऊ, सुभाषनगर, शक्ती टॉवर येथे १५, भिवंडी तालुक्याच्या दळेपाडा येथे ३८ आणि कल्याण डोंबिवली मनपाच्या माढवी येथे साथीचा उद्रेक झाल्याचे उघड झाले आहे. यापैकी मनपा क्षेत्रात केवळ दहा तर नगरपालिका क्षेत्रात केवळ चार रूग्ण आणि ग्रामीण भागात दोन असे केवळ १२ रूग्ण डेंग्यूचे असल्याचा निर्वाळा ताप उद्रेकाच्या वर्गीकरण अहवालात नमूद केले आहे. परंतु जिल्ह्यातील वास्तवस्थिती लक्षात घेता ३०० पेक्षा अधिक रूग्ण डेंग्यूने त्रस्त असून त्यांची नोंद अहवालात घेण्यास विलंब होत आहे. ४टोकावडे येथील माजी सरपंच शांताराम पवार यांचा नातू वैभव पवार याला डेंग्यूची लागण झाली असून त्याला कल्याण येथील खाजगी रु ग्णालयात दाखल केले आहे. गावात आणखी एक-दोन रु ग्ण या आजाराने बाधीत असल्याचे समोर येत आहेत परंतु शासकीय दवाखान्यात उपचार होत नसल्याने या रु ग्णांना महागड्या खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. ४यामुळे डेंग्यूच्या आजारावर सर्व शासकीय रु ग्णालयात उपचाराच्या सुविधा निर्माण करून डासांचा उपद्रव रोखण्यासाठी औषध फवारणीची मागणी पंचायत समिती सदस्या पद्मा गायकर व मुरबाड मनसे शहर प्रमुख नरेश देसले यांनी केली आहे. या बाबत प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांचेकडे चौकशी केली असता त्यांना या बाबत कोणतीही कल्पना नव्हती.शहापुरात मलेरियाबरोबरच डेंग्यूचे देखील ३ रुग्ण आढळून आले आहेत तर ४ संशयित असल्याची शासकीय आकडेवारी आहे. तालुक्यातील धोंडाळपाडा येथील उत्तम खंडागळे (३३) चिंतामण खंडागळे (५५) व चेरवली येथील जागृती फर्डे (१८) यांना डेंग्यू झाला आहे. तर ४ संशयितदेखील आढळले आहेत. जुलै महिन्यात १ आॅगस्टमध्ये २ तर सप्टेंबरमध्ये ३ अशी डेंग्यू रुग्णांची आकडेवारी दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबरच कल्याण डोंबिवली येथीली खाजगी रुग्णालयात व शहापूर तालुक्यात ४ ते ५ रुग्ण उपचार घेत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र टाकीपठार २, किन्हवली ५, शेणवा ७, डोळखांब ३, कसारा ९, वासिंद १३, शेंद्रूण ५, अघई १०, टेंभा ३ असे अनुक्रमे मलेरियाचे ५७ रुग्ण आॅगस्ट अखेरीस आढळले आहेत. खाजगी रुग्णालयात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्यांनी २४ तासाच्या आत शासकीय आरोग्य यंत्रणेस कळविणे बंधनकारक आहे.