शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नुकसान १६८ कोटी, भरपाई फक्त ६७ कोटी

By admin | Updated: December 22, 2015 00:15 IST

कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते.

हितेन नाईक,  पालघरकोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते. यावेळी १ लाख ८० हजार ९९६ एकर क्षेत्रातील १ लाख ८१ हजार ९११ शेतकऱ्यांचे सुमारे १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराचे नुकसान झाले होते. तिच्या भरपाईपोटीे या शेतकऱ्यांना केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजार रू.ची तुटपुंजी भरपाई दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.राज्यात सर्वाधिक आंबा व काजूचे उत्पादन घेणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार ८७४ शेतकऱ्याच्या ८० हजार ५३६.५३ एकर क्षेत्रातील आंबा व काजूचे ७९ कोटी ५३ लाख ७५ हजाराचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले होते. मात्र शासनाने केवळ २५ कोटी ९३ लाख ५७ हजार रू. ची भरपाई दिली आहे. ठाणे जिल्ह्यात ४ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४०१.९५ एकर क्षेत्रात ४ कोटी १९ लाख ५३ हजाराचे नुकसान झाले असून २ कोटी ७२ लाख १२ हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील ४६ हजार २४३ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ९६५.३५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू, पिकाच्या ३७ कोटी ९१ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी शासनाने १३ कोटी ५ लाख १६ हजार रू.ची भरपाई मंजूर केली आहे तर रायगड जिल्ह्यात ४३ हजार ५८९ शेतकऱ्यांच्या ४३ हजार ७७३.१५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू च्या ४३ कोटी ७९ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी १५ कोटी ८५ लाख ५३ हजाराची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील एकूण १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराच्या नुकसानीपैकी केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजाराची भरपाई बागायतदारांना मिळणार आहे. उर्वरीत १०० कोटी ८८ लाख ४० हजाराची नुकसान भरपाई कशी होणार व कोण भरून देणार असा प्रश्न बागायतदारांमधून उपस्थित केला जात असून शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याची टीका होत आहे.