शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान १६८ कोटी, भरपाई फक्त ६७ कोटी

By admin | Updated: December 22, 2015 00:15 IST

कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते.

हितेन नाईक,  पालघरकोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते. यावेळी १ लाख ८० हजार ९९६ एकर क्षेत्रातील १ लाख ८१ हजार ९११ शेतकऱ्यांचे सुमारे १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराचे नुकसान झाले होते. तिच्या भरपाईपोटीे या शेतकऱ्यांना केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजार रू.ची तुटपुंजी भरपाई दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.राज्यात सर्वाधिक आंबा व काजूचे उत्पादन घेणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार ८७४ शेतकऱ्याच्या ८० हजार ५३६.५३ एकर क्षेत्रातील आंबा व काजूचे ७९ कोटी ५३ लाख ७५ हजाराचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले होते. मात्र शासनाने केवळ २५ कोटी ९३ लाख ५७ हजार रू. ची भरपाई दिली आहे. ठाणे जिल्ह्यात ४ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४०१.९५ एकर क्षेत्रात ४ कोटी १९ लाख ५३ हजाराचे नुकसान झाले असून २ कोटी ७२ लाख १२ हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील ४६ हजार २४३ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ९६५.३५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू, पिकाच्या ३७ कोटी ९१ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी शासनाने १३ कोटी ५ लाख १६ हजार रू.ची भरपाई मंजूर केली आहे तर रायगड जिल्ह्यात ४३ हजार ५८९ शेतकऱ्यांच्या ४३ हजार ७७३.१५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू च्या ४३ कोटी ७९ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी १५ कोटी ८५ लाख ५३ हजाराची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील एकूण १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराच्या नुकसानीपैकी केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजाराची भरपाई बागायतदारांना मिळणार आहे. उर्वरीत १०० कोटी ८८ लाख ४० हजाराची नुकसान भरपाई कशी होणार व कोण भरून देणार असा प्रश्न बागायतदारांमधून उपस्थित केला जात असून शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याची टीका होत आहे.