शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान १६८ कोटी, भरपाई फक्त ६७ कोटी

By admin | Updated: December 22, 2015 00:15 IST

कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते.

हितेन नाईक,  पालघरकोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते. यावेळी १ लाख ८० हजार ९९६ एकर क्षेत्रातील १ लाख ८१ हजार ९११ शेतकऱ्यांचे सुमारे १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराचे नुकसान झाले होते. तिच्या भरपाईपोटीे या शेतकऱ्यांना केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजार रू.ची तुटपुंजी भरपाई दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.राज्यात सर्वाधिक आंबा व काजूचे उत्पादन घेणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार ८७४ शेतकऱ्याच्या ८० हजार ५३६.५३ एकर क्षेत्रातील आंबा व काजूचे ७९ कोटी ५३ लाख ७५ हजाराचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले होते. मात्र शासनाने केवळ २५ कोटी ९३ लाख ५७ हजार रू. ची भरपाई दिली आहे. ठाणे जिल्ह्यात ४ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४०१.९५ एकर क्षेत्रात ४ कोटी १९ लाख ५३ हजाराचे नुकसान झाले असून २ कोटी ७२ लाख १२ हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील ४६ हजार २४३ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ९६५.३५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू, पिकाच्या ३७ कोटी ९१ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी शासनाने १३ कोटी ५ लाख १६ हजार रू.ची भरपाई मंजूर केली आहे तर रायगड जिल्ह्यात ४३ हजार ५८९ शेतकऱ्यांच्या ४३ हजार ७७३.१५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू च्या ४३ कोटी ७९ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी १५ कोटी ८५ लाख ५३ हजाराची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील एकूण १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराच्या नुकसानीपैकी केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजाराची भरपाई बागायतदारांना मिळणार आहे. उर्वरीत १०० कोटी ८८ लाख ४० हजाराची नुकसान भरपाई कशी होणार व कोण भरून देणार असा प्रश्न बागायतदारांमधून उपस्थित केला जात असून शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याची टीका होत आहे.