शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

परेच्या विरोधात डहाणू-वैतरणा प्रवासी एकवटले

By admin | Updated: July 17, 2017 01:01 IST

पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्याकडून उपनगरीय सेवेच्या नावाखाली लाखो रु पयांची लूट करणारे रेल्वे प्रशासन

लोकमत न्युज नेटवर्कपालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्याकडून उपनगरीय सेवेच्या नावाखाली लाखो रु पयांची लूट करणारे रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडीतून दररोजचा प्रवास करणाऱ्या पासधारका कडून मोठा दंड वसूल करीत आहे. ही प्रवृत्ती म्हणजे ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ असाच काहीसा प्रकार असल्याने डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेने आता ह्या प्रवृत्ती विरोधात लढण्याचा पवित्रा उचलला आहे.सन १९९९ मध्ये रेल्वे प्रशासनाने डहाणू स्टेशन पर्यंतचा भाग उपनगरीय क्षेत्र म्हणून घोषित करून कर रु पी अधिभार वसुलीला सुरुवात केली आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवाश्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला १४ वर्षाचा कालावधी लागला. ह्या १४ वर्षात प्रवाश्याना पुरेश्या सोयीसुविधा न पुरवता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकडून जे कोट्यवधी रुपये वसूल केले ही बेकायदेशीर वसुली असल्याचे प्रवाश्याचे म्हणणे आहे. आजही पहाटे ५ वाजल्याच्या नंतरच लोकल सेवा सुरू होत असल्याने अनेक दैनंदिन कर्मचारी, भाजी विक्रेत्या महिला, विविध आस्थापना मध्ये काम करणारे अधिकारी ह्यांना वेळेवर उपस्थित राहता येत नाही. त्याचा परिणाम नोकरी, व्यवसायावर पडत असल्याने अनेक प्रवाशी ५ च्या आधी येणाऱ्या सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस, लोकशक्ती एक्स्प्रेस, सौराष्ट्र मेल आदी लांब पल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करीत असत. मात्र, आता ह्या गाड्याना सुपरफास्टचा दर्जा दिल्याने त्यातून प्रवास करणाऱ्या मासिक, त्रैमासिक पासधारकाना बेकायदेशीर ठरवून त्यांच्या कडून दंडापोटी मोठी वसुली केली जात आहे.आजही वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या स्टेशन वरील इंडिकेटर्स सुरूच झाले नसून पाणी पिण्याची सोय, पादचारी पूल, प्लॅटफॉर्म वरील पत्रे नसणे, अनेक शौचालये तुंबलेले असणे अशा अनेक समस्या येथील प्रवाशांना निमुट सहन करव्या लागत आहेत. असे असतांना उपनगरीय सेवेच्या नावावर त्याच प्रवाशांकडून करवसुली केली जात आहे. त्यामुळे प्रथम रेल्वे प्रशासनाने पहाटे १ ते २ वाजल्यापासून लोकल सेवा सुरू करावी आणि नंतरच प्रवाश्याकडून दंड वसुली करावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत. बुधवारी पहाटे लोकल किंवा शटल उपलब्ध नसल्याने मुंबईला कामावर चाललेल्या ललित राऊत यांनी पहाटे लोकशक्ती एक्स्प्रेस पकडून ते बोरिवली स्थानकावर उतरले असता तिकीट तपासनीसांनी त्यांच्याकडे तिकीटाची मागणी केली, तसे राऊतांनी आपला त्रैमासिक पास दाखवला.मात्र त्यांनी हा पास चालणार नाही असे सांगत त्यांच्या कडून ३५० रु पयांचा दंड वसूल केला. एकतर पहाटे लोकल किंवा शटल सेवा सुरू करायची नाही आणि दुसरीकडे दंड वसूल करायचा ह्या जुलमी प्रवृत्ती विरोधात प्रवाश्या मध्ये संतप्त भाव उमटत आहेत. हा सवाल फक्त ललित राऊत यांचा नसून डहाणू ते वैतरणा दरम्यान याच वेळी प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा असून फक्त सेवा कर घेण्याऐवजी येथील प्रवाशांना निदान पुरेश्या सेवा पुरवा अन्यथा मागे झालेल्या तीव्र आंदोलनाची पुनरावृत्ती होईल असा इशारा डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने दिला आहे. प्रवाश्यांच्या विविध मागण्यांना धरून आज संस्थेच्या पदाधिकार्यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन विविध सेवा पुरवण्यासाठी लक्ष घालावे व येथील प्रवश्यांवर होत असलेला अन्याय दूर करावा असे आशयाचे निवेदनही संस्थेमार्फत देण्यात आले आहे.