शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नोटांच्या ‘रेशनिंग’ने ग्राहक हैराण

By admin | Updated: November 11, 2016 05:51 IST

बड्या रकमेच्या नोटा रद्द झाल्यामुळे हातखर्चालाही पैसे शिल्लक न राहिल्याने गुरुवारी लक्षावधी बँक ग्राहकांनी पाचशे-हजाराच्या नोटा बदलून घेण्याकरिता तसेच काहींनी रोकड

ठाणे : बड्या रकमेच्या नोटा रद्द झाल्यामुळे हातखर्चालाही पैसे शिल्लक न राहिल्याने गुरुवारी लक्षावधी बँक ग्राहकांनी पाचशे-हजाराच्या नोटा बदलून घेण्याकरिता तसेच काहींनी रोकड खात्यात जमा करण्याकरिता बँकेत धाव घेतल्याने न भुतो... असा गोंधळ उडाला. खात्यात पैसे जमा आहेत, खिशात बड्या नोटा आहेत, परंतु खर्चाला मिळालेल्या रकमेचे रेशनिंग झाले आहे, असा संतापजनक अनुभव ग्राहकांना आला.गुरुवारी सकाळपासून सर्वच बँकांच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. काही बँकांनी ग्राहकांचा गोंधळ होऊ नये, याकरिता चोख बंदोबस्त केला होता, तर काही बँकांमध्ये कमालीचा गोंधळ अनुभवास येत होता. नोटा बदलून घेण्याकरिता आलेल्यांना एक फॉर्म भरणे सक्तीचे केले होते. त्यासोबत काही बँकांमध्ये पॅन कार्ड, तर काही बँकांमध्ये आधार कार्डाची झेरॉक्स प्रत मागितली जात होती. यामुळे झेरॉक्स दुकानांवर झुंबड उडाली होती. प्रत्यक्ष कॅश काउंटरला पोहोचल्यावर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मुदतीनुसार ४ हजार रुपये नव्हे, तर १ किंवा २ हजार रुपये दिले जात होते. काही बँकांनी १० व २० रुपयांच्या नोटा दिल्याने पैसे कसे व कुठे ठेवायचे, असा प्रश्न ग्राहकांना पडला. नव्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा कधी येणार? आणि नोटांच्या रेशनिंगचे हे दुष्टचक्र कधी संपणार? याचे ठोस उत्तर बँकांच्या व्यवस्थापकांकडेही नव्हते.रिझर्व्ह बँक मुंबईत आहे. नोटांची छपाई नाशिकमध्ये होते. ठाणे-डोंबिवलीत नव्या नोटा पोहोचत नाहीत. मात्र नागपूर, गुजरातमधील ग्राहकांना मिळतात, हे काय राजकीय गौडबंगाल आहे, असा सवाल ग्राहक करीत होते. (प्रतिनिधी) काही छोटे उद्योजक गुरुवारी पैसे काढण्याकरिता बँकेत गेले असता त्यांनाही त्यांच्या मागणीनुसार पैसे देण्यास नकार देण्यात आला. काही उद्योजकांना तर तुमचे केवायसी अर्ज भरलेले नसल्याने पैसे देता येणार नाहीत, असे सांगण्यात आले. काल-परवापर्यंत ज्या बँकांना केवायसीची आठवण झाली नव्हती, त्यांना अचानक गुरुवारीच ती कशी झाली, असा सवाल त्यांनी केला.अलिबाग : अलिबाग-रायगड जिल्ह्यात पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर लोकांनी रांगा लावल्या. मात्र, सहकारी व अर्बन बँकांना नोटांचा पुरेसा पुरवठाच न झाल्याने एकच गोंधळ माजला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यात ५८ शाखा असून, त्यांना ३५ कोटी रुपये गरजेचे होते. पण, स्टेट बँक आॅफ इंडियाकडून अवघी १ कोटी रुपयांची रोकड मिळाल्याने अडचण झाल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली. जिल्ह्यातील काही पतसंस्थांनी नोटा स्वीकारल्या; परंतु नोटा स्वीकारण्याबाबत आदेश नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक पतसंस्थांनी खातेदारांना बँकेत जाण्याचा सल्ला दिला.