शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

उत्सुकता अन् जबाबदारीची जाणीवही...पहिलं मतदान न विसरण्यासारखंच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:03 IST

आयुष्यातील पहिली घटना प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असते. त्या घटनेला विशेष असं महत्व असतं. त्याचप्रकारे पहिले मतदानही तेवढेच महत्वाचे असते.

आयुष्यातील पहिली घटना प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असते. त्या घटनेला विशेष असं महत्व असतं. त्याचप्रकारे पहिले मतदानही तेवढेच महत्वाचे असते. लोकशाहीतील सर्वाधिक मोठा उत्सव म्हणजे निवडणुका होय. या निवडणुकांमध्ये मतदान मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाते. मतदानाला अनन्यसाधारण महत्व असून, आपण केलेल्या पहिल्या मतदानाच्या वेळी कशी परिस्थिती होती, उत्साह होता की जबाबदारीची जाणीव, अशा काही मुद्यांवर जाणून घेतलेल्या निवडक मान्यवरांच्या आठवणींचा हा धांडोळा.

जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण

मी मूळची अलिबागची. आम्ही श्रीबागमध्ये राहायला होतो. बाबा प्रकाश जोशी स्टेट बँकेत मॅनेजर, तर आई कमल जोशी ट्रेझरीमध्ये होती. एखाद्या नोकरदार कुटुंबात ज्या पद्धतीचे संस्कार मुलांवर होतात, तसेच आम्हा भावंडांवर झाले होते. लोकशाहीचे महत्त्व आम्हाला बाबा नेहमी सांगायचे. माझं पहिलं मतदान होतं, तेव्हाही बाबांनी जबाबदारीची जाणीव करून दिली होती. कान्होजी आंग्रे समाधीस्थळाजवळील मराठी शाळेत आमचे मतदानकेंद्र होते. तेथे जाण्यासाठी एका उमेदवाराने घरी रिक्षा पाठवली होती; मात्र त्या सुविधेचा लाभ घेतला असता, तर मतदान करताना मनावर थोडेफार दडपण आले असते. त्यामुळे आम्ही उमेदवाराची रिक्षा नम्रपणे नाकारली. पहिल्या मतदानाबद्दल बरीच उत्सुकता होती. मतदानकेंद्रावर बोटाला शाई लावली जाणार असल्याने नेलपॉलिश लावली नव्हती. त्यावेळी ईव्हीएम नव्हत्या. त्यामुळे मतदानकेंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मतपत्रिकेवर शिक्का कसा मारायचा, याची माहिती दिली होती. मतदान केल्यानंतर आपला हक्क बजावल्याची नव्हे, तर कर्तव्यपालन केल्याची भावना होती. घरी आल्यावर बाबांनी केवळ मतदान केलं का, एवढंच विचारलं. मतदान कुणाला केलं, हे विचारण्याचे टाळून गोपनीय मतदानाचे महत्त्व त्यांनी आमच्या मनावर त्यावेळीच बिंबवले होते.- मेधा जोशी, फाइन आर्टिस्ट

आणीबाणीनंतरचे दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याचे मत

आणीबाणीनंतर, म्हणजे १९७८ साली मी पहिल्यांदा मतदान केल्याचं नक्की आठवतं. त्याआधी शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागल्याने इच्छा असूनही मतदान करता आलं नव्हतं. पहिल्यांदाच मत दिल्यावर खूप मोठ्ठं झाल्यासारखं वाटून अंगावर मूठभर मांस चढलं होतं. माझं सरकार मी निवडू शकतो, ही भावनाच खूप जबाबदारीची आणि अभिमानाची होती. आता मात्र तेवढं काही वाटत नाही. वाचन-लिखाणामुळे सामाजिक, राजकीय सजगता माझ्यात लहानपणापासूनच असल्याने मी स्वत:च मतदारयादीत माझं नाव नोंदवलं होतं. मतदानाच्या दिवशी तर आपण काहीतरी मोठं काम करीत आहोत, अशी भावना असायची आणि त्यामुळे खूप उत्साह असायचा. लोकनायक जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामुळे स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे राजकीय सजगता निर्माण झालेली होती. देशाभिमानाने सर्व वातावरण भारल्यासारखं होतं. स्वातंत्र्याचा दुसरा लढा दिल्यासारखी ही निवडणूक आमची पिढी कधीच विसरणार नाही. मी जेव्हा पहिल्यांदा मतदान केले, तेव्हा साहजिकच आणीबाणीतील दडपशाही व अत्याचार हेच प्रमुख मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात होते.- अरुण सु. पाटील, कवी आणि लेखक

शेतकरी विरुद्ध भांडवलदार अशी लढाईमी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मतदान केलं, साधारण १९६५ च्या आसपास. तेव्हा एक वेगळा उत्साह आणि उत्सुकता होती. त्यावेळी असणारे स्थानिक कार्यकर्ते हे आमचे मित्रच होते. त्यांनीच आमचे फॉर्म वगैरे भरून नाव नोंदवले होते. तेव्हा आमच्या भागात शेकाप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई होती. शेतकरी आणि भांडवलदार असे चर्चेचे मुद्दे होते. वातावरण चढाओढीचे कधी तणावाचे तर कधी आक्रमक होत असे. तेव्हा कार्यकर्तेही खटाºयातून प्रचारात सहभागी होत असंत. उन्हात टेबल टाकून नोंदी ठेवणे. भजीवडा, शेवचिवडा खायला मिळत असे. एक वेगळीच मजा असायची.- नारायण लाळे, ज्येष्ठ लेखक, समीक्षक

मराठी माणसांच्या नोकऱ्या हा होता मुद्दामे १९६७ साली मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केलं होतं. २० व्या वर्षी केलेलं ते माझं पहिलं मतदान होतं. पहिल्यांदा मतदान करणार म्हणजे प्रौढ झाल्यासारखं वाटलं. आम्ही स्वत:ही कार्यकर्ते म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे आम्हीच आमचे नाव मतदारयादीत नोंदवले होते. त्यावेळी ईव्हीएम नसल्याने मत देण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोर स्टॅम्प मारण्याची पद्धत होती. स्टॅम्प मारल्यावर आडवी घडी घातली आणि ओली शाई दुसºया उमेदवाराच्या नावावरही उमटली तर गोंधळ व्हायचा. मराठी लोकांना नोकºया मिळाल्या पाहिजे. परकीयांचे आक्रमण थांबले पाहिजे, असे मुद्दे त्यावेळी होते.- डॉ. सुधाकर फडके, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान