शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

कल्याणमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

कल्याण : राज्य सरकारकडून केडीएमसीला कोरोना प्रतिबंधक लसीचे अपुरे डोस मिळत असल्याने, मागील पाच दिवसांपासून शहरातील लसीकरण बंद होते. ...

कल्याण : राज्य सरकारकडून केडीएमसीला कोरोना प्रतिबंधक लसीचे अपुरे डोस मिळत असल्याने, मागील पाच दिवसांपासून शहरातील लसीकरण बंद होते. लसीकरण मंगळवारी सुरू झाल्याने विविध केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली. दरम्यान, लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने, बुधवारी सर्व केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार असल्याचे मनपाने कळविले आहे.

कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील केंद्रावर मंगळवारी सकाळी लसीकरणासाठी नागरिकांनी भली मोठी रांग लावली होती. ही रांग शिवाजी चौकापर्यंत पोहोचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचबरोबर, सुभाष चौकातील रेल्वेच्या सेंट्रल स्कूलमधील लसीकरण केंद्रावरही नागरिकांची गर्दी झाली होती. पावसाने दडी मारल्याने वातावरणात उष्णता आहे. नागरिक घामाघूम होऊन लसीसाठी रांगेत उभे होते.

मनपा हद्दीतील लसीकरण पाच दिवस बंद असल्याने, एकदमच मंगळवारी लसीकरणाच्या प्रक्रियेवर ताण आला आहे. लसीचे डोस अपुरे असल्याने अनेकांना रांग लावूनही डोस मिळणार की नाही, अशी चिंता सतावत होती. मोहने येथील शांताराम पाटील मराठी शाळेतील केंद्रावर शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय काटकर यांनी चांगली व्यवस्था केल्याची प्रतिक्रिया लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांनी दिली.

६३ हजार नागरिकांना दिले दोन्ही डोस

केडीएमसी हद्दीतील ६३ हजार नागरिकांना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस दिल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्याचबरोबर, मनपाने मोबाइल लसीकरण सुरू करण्याची सुतोवाच केले आहेत. त्यासाठी १० लाख डोसची आवश्यकता आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचेही नियोजन मनपा करीत आहे. मात्र, नियमित लसीकरणासाठीच पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने, मोबाइल आणि घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे काम नेमके कधी सुरू होणार, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

------------------