शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

रिंग रोड बाधितांनी अडथळे आणल्यास गुन्हे दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रिंग रोड प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मात्र, त्यानंतरही जर ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रिंग रोड प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मात्र, त्यानंतरही जर कुणी प्रकल्पात अडथळे आणणार असेल तर त्या रहिवाशांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिला.

दुर्गाडी ते टिटवाळादरम्यान विकासाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र ३० टक्के भूसंपादनाचे काम रखडले आहे. या प्रकल्पाच्या आड येणारी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात यावी. मात्र दोन एफएसआय देऊन जमीनमालक व अतिक्रमित घरात राहणारे रहिवासी यांचे पुनर्वसन केले जात नाही, तोपर्यंत अतिक्रमणे हटवू नयेत, अशी मागणी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांची गुरुवारी भोईर यांनी भेट घेतली.

दुर्गाडी ते मांडा टिटवाळादरम्यान आटाळी, आंबिवली या परिसरातील ८५० अतिक्रमणे रिंग रोड प्रकल्पाच्या आड येत आहेत. या अतिक्रमित घरांमध्ये राहणाऱ्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय रस्ते विकास करण्यात येऊ नये, असे बाधितांचे म्हणणे आहे. प्रकल्पाचे ३० टक्के काम या अतिक्रमणांमुळे रखडले आहे. ज्या जागेवर रस्त्यालगत चाळी व घरे बांधली आहेत, त्यासाठी जमीनमालकांनी जागा दिली आहे. महापालिकेने एफएसआयच्या स्वरूपात जागामालकास मोबदला दिल्यास अतिक्रमित चाळीत राहणाऱ्यांना त्याचा काही उपयोग होणार नाही. जागा मालकास दोन एफएसआय दिलाच तर त्यापैकी एक एफएसआय जागा मालकाने स्वत: आणि एक एफएसआयचा बाधिताच्या पुनर्वसनाकरिता वापरण्याची सक्ती करावी. घरे विकास प्रकल्पासाठी तुटली तरी ती मंडळी बेघर होता कामा नयेत, अशी मागणी भोईर यांनी केली.

त्याचबरोबर आंबिवली येथील एनआरसी कंपनीची जागा लिलावात अदानी ग्रुपला देण्यात आली. त्याठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार आहे. कंपनीकडून १३० कोटी रुपये मालमत्ता करापोटी महापालिकेस येणे बाकी आहे. महापालिकेने विकासाला परवानगी न देण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम रहावे. कामगारांची देणी दिली जात नाहीत तोपर्यंत विकासाला परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी भोईर यांनी केली.

-----------------------

वाचली