शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना होऊन गेला; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, याच कालावधीत कोरोना झालेल्या बहुतांशी जणांच्या शस्त्रक्रियांचे नियोजनही रखडले आहे. दुसऱ्या लाटेतील या रुग्णांवर आरोग्यदृष्ट्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. पण, कोरोनामुळे शस्त्रक्रिया उशिरा करण्याचा संभ्रम या रुग्णांमध्ये आहे. त्यामुळे बहुतांशी जणांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्या करायच्या की पुढे ढकलायच्या या द्विधा स्थितीत रुग्ण आढळून येत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून दीड वर्षापासून घोषित आहे. तेथे महिलांच्या बाळंतपणाच्या कलावधीतील सिझर ही शस्त्रक्रिया फक्त केली जात आहे. उर्वरित अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी येथील कळवा रुग्णलय किंवा मुंबईला जे. जे. सायन्स रुग्णालयाला रुग्ण पाठवला जात आहे. कोरोनाच्या कालावधीतही त्या केल्या जात आहेत. पण, काही रुग्णांची कोरोनाची चाचणी पाॅझिटिव्ह येताच दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जात असल्याने जिल्ह्यातील रुग्ण संभ्रमावस्थेत असले तरी ती किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देऊन तसा सल्ला दिला जात आहे. आवश्यक असल्यास रुग्णांची मानसिकता व सशक्तपणा या गोष्टी लक्षात घेऊन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे निदर्शनात आले आहे.

-----

१) कोरोनाचे एकूण रुग्ण - ५,५४,२१३

बरे झालेले रुग्ण - ५,४२,८७५

कोरोनाचे बळी - ११,३३८

-------

२) दीड महिना वाट पाहा

- कोरोना झाल्यानंतर अशक्तपणा येतो. रुग्ण मानसिकदृष्ट्या फिटनेस नसतो. कोरोनामुळे कमीत कमी १५ दिवस अशक्तपणा अधिक जाणवतो. त्यामुळे रुग्णाकडून शस्त्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे महिना ते दीड महिना उशिरा शस्त्रक्रिया करणे उत्तम आहे. या कालावधीत रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो. यासाठी दीड महिन्याचा सल्ला डॉक्टर देतात.

------