शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

सहकारी बँका, अल्पबचतीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: March 1, 2016 02:08 IST

सरकारी बँकांवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी सहकारी बँकांना मात्र सापत्नभावाची वागणूक दिली आहे. अल्पबचत योजना हाही अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहे

कल्याण : सरकारी बँकांवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी सहकारी बँकांना मात्र सापत्नभावाची वागणूक दिली आहे. अल्पबचत योजना हाही अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहे. पण त्यांच्याकडेही लक्ष पुरविलेले नाही, अशी भावना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवरांनी व्यक्त केली आहे. शिक्षण क्षेत्राच्या पदरातही फारसे काही न पडल्याचे मतही मांडण्यात आले आहे. चांगल्या रस्त्यांचा फायदा उद्योगांनायंदाचा अर्थसंकल्प दिलासादायक आहे. रस्ते विकासासाठी जो निधी मिळणार आहे, त्यातून रस्तेविकास साधला जाईल. त्याचा फायदा उद्योगालाही होणार आहे. एकंदरीतच उद्योगजगताला फायदेशीर असलेला असा अर्थसंकल्प असल्याने आम्ही उद्योजक त्याचे स्वागत करतो. - उमेश तायडे, अध्यक्ष, अंबरनाथ-कल्याण कारखानदारी संघटना (आमा)मागल्या दाराने घरे महाग करणारा यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांना सवलत देण्याचा विषय अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. त्यात नेमकी किती सवलत आहे, त्याचा खरेच किती फायदा घर खरेदी करणाऱ्याला होणार आहे, हे तपासून पाहायला हवे. मागच्या दाराने सेवा कर वाढवून ठेवल्याने परवडणारी घरेसुद्धा महागात पडतील. हा अर्थसंकल्प घरे स्वस्त करणारा नसून उलट महाग करणारा आहे. - रविंद्र पाटील, बिल्डरशिक्षणासाठी भरीव तरतूद नाहीशेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यास मत होऊ शकते. शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. पण, शिक्षणासाठी फार काही तरतूद केल्याचे दिसून येत नाही. एकीकडे डिजिटल इंडियाचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे शिक्षणासाठी फारशी तरतूद न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे शिक्षणाशिवाय इंडिया डिजिटल कसा होणार, असा माझा सवाल आहे. - वसंत पाटील, शेतकरी आणि शिक्षण संस्थाचालकसिंचन, प्राप्तिकराच्या तरतुदी समतोल राखणाऱ्याकेंद्राचा अर्थसंकल्प १९ लाख कोटींचा आहे. त्यात १२ लाख कोटींचे उत्पन्न दाखविले गेले आहे. खर्च आणि उत्पन्नात सात लाख कोटींची तूट आहे. ही तूट कशा प्रकारे भरून काढणार, याचे स्पष्टीकरण कुठेही दिले गेलेले नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे, हे मान्य करायला हवे. त्याचबरोबर सिंचनासाठीही कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. प्राप्तिकराच्या रचनेत बदल केलेला नाही. पण, एकंदरीतच हा अर्थसंकल्प समतोल स्वरूपाचा आहे. - बाबा रामटेके,नागरिक हक्क संघर्ष समितीसहकारी बँकांना फारसा दिलासा नाही अर्थमंत्र्यांनी ग्रामीण भागाला न्याय दिला असला, तरी उद्योगजगतासाठी फारशा सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. विकासदर हा साडेसात टक्के दाखवला असला तरी तो राखणार कसा, त्यासाठी काय सोयीसुविधा पुरविणार, याचे कोणतेही दिशादर्शन त्यात नाही. सेवाकर लागू करून त्यांनी सगळेच महाग करून ठेवले आहे. रस्ते-महामार्ग विकसित करण्यासाठी त्यांनी जो निधी देण्याची तूरतूद केली आहे, ती भलीमोठी आहे. रस्ते चांगले झाले तर त्याचा फायदा उद्योजजगताला होईल. मालवाहतूक करणे सुकर होईल. सेवाकर वाढविण्यामागे केंद्र सरकारला संसदेत जीएसटी आणायचे आहे, त्याचीच नांदी आहे. सहकारी बँकांना मोठी अपेक्षा होती. तीन गोष्टी अपेक्षित होत्या. पण, प्रथमदर्शनी सहकारी बँकांसाठी कोणताही लाभदायी निर्णय सरकारने घेतल्याचे दिसून येत नाही. - विलास देसाई, अध्यक्ष, कोकण सहकारी बँक असोसिएशनघरात सूट देतानाच सेवाकरातून लूटकेंद्रीय अर्थसंकल्पात कामगारांसाठीच्या छोट्या घरांवर सूट दिली आहे. दुसरीकडे सेवाकरात वाढ केली आहे. एकीकडे सूट देऊन दुसरीकडे लूट करणे कितपत योग्य आहे? ही एक प्रकारे कामगारांची फसवणूक आहे. त्यांना सूट मिळूनही घरे घेता येणार नाही. एक प्रकारे दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे. सामान्यांना या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होती. परदेशात असलेला काळा पैसा आणण्याची घोषणा केली गेली होती. तो पैसा सामान्यांच्या खात्यात जमा करू, असे सांगितले होते. त्याचा सोयीस्कर विसर भाजपा सरकारला पडला आहे. ‘अच्छे दिन’ सांगून लोकांची फसवणूक केली आहे. कुठे आहे काळा पैसा? तो आणण्याची तरतूद केलेली नाही. - गुलाब करंजुले, व्यवस्थापकीय संचालक, जीबीके ग्रुप अल्पबचतीकडे दुर्लक्ष ही खंत ग्रामीण भागावर सरकारने जास्त भर दिला आहे. पण, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य पाया या जिल्हा मध्यवर्ती बँका असतात. या बँकांना काही सवलती न देता सरकारी बँकांना सवलती दिल्या आहेत. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करताना मायक्रोलेव्हलवर (अल्पबचतीपर्यंत) सरकार पोहोचलेले नाही. हा या अर्थसंकल्पातील विरोधाभास असल्याचे मला वाटते. - स्वाती पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सहकारी बँक असोसिएशन>> परिवहन शुल्काला स्थगितीची मागणीकल्याण : राज्य सरकारने २०१६ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार परिवहन शुल्कामध्ये भरमसाट वाढ केलेली आहे. ती जाचक असून तिला त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. यासाठी महासंघ १ मार्च रोजी रावते यांची भेट घेणार आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले की, मोटार वाहन कायद्यानुसार १० फेब्रुवारी २०१६ रोजी प्रधान सचिव डॉ. विजय सतबीर सिंग यांनी जीआर काढून मोटार वाहनांकरिता परवाना शुल्कातही वाढ करून ते वसूल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यात मोटार वाहनांकरिता नवा परवाना, नूतनीकरण, राष्ट्रीय पर्यटक परवाना, तात्पुरता परवाना, प्रतिस्वाक्षरी परवाना देण्यासाठी शुल्कात वाढ केली आहे. यात जो परवाना काढण्यासाठी १०० व २०० रुपये लागत होते, त्याचे सुधारित शुल्क हे एक हजार रुपयांच्या घरात गेले आहे. विहित तारखेनंतर परवाना काढल्यास अथवा विलंब झाल्यास त्याला पाच हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.