शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

काँग्रेसच्या सपारांची निवड वादात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 03:03 IST

काँग्रेसच्या प्रभाग २२ अ मधील उमेदवार उमा सपार यांच्या बिनविरोध निवडीवर शिवसेनेच्या उमेदवार दक्षा गुप्ता यांनी आक्षेप घेतला आहे.

भार्इंदर : काँग्रेसच्या प्रभाग २२ अ मधील उमेदवार उमा सपार यांच्या बिनविरोध निवडीवर शिवसेनेच्या उमेदवार दक्षा गुप्ता यांनी आक्षेप घेतला आहे. सपार यांनी उमेदवारी अर्जात निरक्षर असल्याचे नमूद केले असून जात प्रमाणपत्रासाठी मात्र शाळेचा दाखला जोडला असल्याचा दावा करत त्यांची बिनविरोध निवड रद्द करण्याची मागणी गुप्ता यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.सपार या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असून त्यांनी २००२ व २००७ मधील निवडणूक काँग्रेसच्याच तिकिटावर लढवली होती. २००२ मधील निवडणुकीत त्यांनी निरक्षर असल्याचे उमेदवारी अर्जात नमूद केले होते. परंतु, जातप्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी शाळेचा दाखला जोडल्याचा दावा यंदाच्या निवडणुकीतून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या उमेदवार गुप्ता यांनी केला आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दक्षा यांनी ओबीसी या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग २२ अ या जागेसाठी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दक्षा यांच्याकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात त्यासाठी अर्ज केला होता. परंतु, अर्ज केल्याचा पुरावाही त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केला नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी पुरावा सादर करण्यासाठी अर्ज छाननीपर्यंतची वेळ दिली होती. परंतु, त्या वेळेनंतरही दक्षा यांनी पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला असता तो निवडणूक निर्णय अधिकाºयांनी नियमावर बोट ठेवत नाकारला. परिणामी, दक्षा यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवला गेला. यामुळे सपार यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले. आपला नाहक बळी गेल्याची भावना निर्माण झाल्याने दक्षा यांनी सपार यांच्या बिनविरोध निवडीवरच आक्षेप घेतला आहे. सपार यांच्या जातप्रमाणपत्रावेळी सादर केलेल्या शिक्षणाच्या पुराव्यावरच संशय व्यक्त करत त्याची चौकशीची मागणी केली आहे.>प्रभाग १०, १२ मध्ये तीन हजार बोगस मतदारभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत प्रभाग १० व १२ मध्ये अनुक्रमे १४०० व १६३६ बोगस मतदारांची नावे मतदारयादीत घुसवण्यात आली, असा आरोप मीरा-भार्इंदर काँग्रेसचे निरीक्षक राजेश शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. यात भाजपाचा हात असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने यापूर्वीच भाजपाकडून बोगस मतदारांची नोंद होत असल्याबाबतची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ११ हजार बोगस नावे मतदारयादीतून वगळण्याचे निर्देश निवडणूक प्रशासनाला दिले होते. यानंतरही प्रभाग १० व १२ मध्ये एकूण ३०३६ बोगस मतदारांची नोंद अद्याप मतदारयादीत कायम ठेवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रभागातील काँग्रेस उमेदवारांच्या सर्वेक्षणातून बोगस मतदारांच्या नावांचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बहुतांश बोगस मतदारांचे मतदान केंद्र आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. याविरोधात निवडणूक निर्णय अधिकाºयांसह पोलीस व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, स्थानिक निवडणूक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष भाजपाखेरीज इतर सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन या बोगस मतदारांमार्फत मतदान करून घेण्याचा डाव हाणून पाडणार आहे, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रदेश प्रतिनिधी मेहुल व्होरा, माजी महापौर तुळशीदास म्हात्रे, काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.>काँग्रेसच्या उमा सपार यांनी उमेदवारी अर्जात नमूद केलेली माहिती विसंगत असल्यानेच त्यांच्या चौकशीची मागणी आयोगाकडे केली आहे. त्याला दाद न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार आहे.- दक्षा गुप्ता, शिवसेना उमेदवार>काँग्रेसच्या उमा सपार यांनी दोनवेळा निवडणुका लढवल्या असून यंदा त्यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. तत्पूर्वी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना कोणतीही माहिती लपवलेली नाही.- अनिल सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष