शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवन संरक्षणासाठी पालिका चौकी उभारणार

By admin | Updated: May 6, 2017 05:43 IST

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कांदळवनाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तारेचे कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे. बेकायदा

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कांदळवनाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तारेचे कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे. बेकायदा मातीचा भराव करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली चौकी उभारणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले. शहरातील बहुतांश जमीन सीआरझेडबाधित आहेत. त्यातच, शहराच्या तिन्ही बाजूंना खाडी व समुद्रकिनारा असल्याने या ठिकाणी कांदळवन क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच नैसर्गिक नाला व खाडीजवळ पाणथळ जागांचे प्रमाण जास्त असल्याने या ठिकाणी बांधकाम करण्यास मनाई आहे. मात्र, पर्यावरण विभागाची परवानगी मिळाल्यास बांधकामाला अनुमती देण्यात येते. परंतु, या प्रक्रियेला बगल देत शहरातील काही विकासक व भूमाफियांकडून कांदळवन नष्ट करून त्यावर बेकायदा मातीचा भराव केला जातो. काही वेळा तर नैसर्गिक नाले मातीभरावात गायब केले जात असल्याने शहरातील भूमाफियांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. ही क्षेत्र संरक्षित करण्यासाठी उच्च न्यायालयाने पालिकेला सतत निर्देश दिले असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत काही वर्षांपूर्वी कांदळवन, पाणथळ क्षेत्रासह मातीचा भराव झालेल्या ठिकाणचे सर्वेक्षणही करण्यात आले. तरीदेखील हा प्रकार थांबत नसल्याने अखेर पालिकेने कांदळवनाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्यात पालिकेने कांदळवनाचे मोठे क्षेत्र असलेल्या भार्इंदर पश्चिमेकडील उत्तन व मीरा रोडच्या सृष्टीमधील सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील कांदळवनाभोवती तारेचे कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी पालिकेने कांदळवन व पाणथळ क्षेत्रात संरक्षित क्षेत्राचे फलकही लावले आहेत. दरम्यान, कांदळवन नष्ट करून बेकायदा मातीचा भराव होत असल्याने त्यावर महसूल विभागाचे थेट नियंत्रण राहावे, यासाठी कनाकिया परिसरात चौकी उभारण्यात येणार आहे. पालिकेचे तीन कर्मचाऱ्यांचे पथकही नेमले आहे.एकत्रित कारवाई हवी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित म्हणाले, या बेकायदा प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने महसूल विभागासह स्थानिक पोलिसांना पत्र दिले आहे. परंतु, सर्वच जबाबदारी पालिकेवर ढकलली जात असल्याने पालिकेलाच जबाबदार धरले जात आहे. असे न होता एकत्रित कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बेकायदा प्रकार रोखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.