शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

कांदळवन संरक्षणासाठी पालिका चौकी उभारणार

By admin | Updated: May 6, 2017 05:43 IST

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कांदळवनाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तारेचे कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे. बेकायदा

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कांदळवनाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तारेचे कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे. बेकायदा मातीचा भराव करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली चौकी उभारणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले. शहरातील बहुतांश जमीन सीआरझेडबाधित आहेत. त्यातच, शहराच्या तिन्ही बाजूंना खाडी व समुद्रकिनारा असल्याने या ठिकाणी कांदळवन क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच नैसर्गिक नाला व खाडीजवळ पाणथळ जागांचे प्रमाण जास्त असल्याने या ठिकाणी बांधकाम करण्यास मनाई आहे. मात्र, पर्यावरण विभागाची परवानगी मिळाल्यास बांधकामाला अनुमती देण्यात येते. परंतु, या प्रक्रियेला बगल देत शहरातील काही विकासक व भूमाफियांकडून कांदळवन नष्ट करून त्यावर बेकायदा मातीचा भराव केला जातो. काही वेळा तर नैसर्गिक नाले मातीभरावात गायब केले जात असल्याने शहरातील भूमाफियांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. ही क्षेत्र संरक्षित करण्यासाठी उच्च न्यायालयाने पालिकेला सतत निर्देश दिले असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत काही वर्षांपूर्वी कांदळवन, पाणथळ क्षेत्रासह मातीचा भराव झालेल्या ठिकाणचे सर्वेक्षणही करण्यात आले. तरीदेखील हा प्रकार थांबत नसल्याने अखेर पालिकेने कांदळवनाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्यात पालिकेने कांदळवनाचे मोठे क्षेत्र असलेल्या भार्इंदर पश्चिमेकडील उत्तन व मीरा रोडच्या सृष्टीमधील सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील कांदळवनाभोवती तारेचे कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी पालिकेने कांदळवन व पाणथळ क्षेत्रात संरक्षित क्षेत्राचे फलकही लावले आहेत. दरम्यान, कांदळवन नष्ट करून बेकायदा मातीचा भराव होत असल्याने त्यावर महसूल विभागाचे थेट नियंत्रण राहावे, यासाठी कनाकिया परिसरात चौकी उभारण्यात येणार आहे. पालिकेचे तीन कर्मचाऱ्यांचे पथकही नेमले आहे.एकत्रित कारवाई हवी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित म्हणाले, या बेकायदा प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने महसूल विभागासह स्थानिक पोलिसांना पत्र दिले आहे. परंतु, सर्वच जबाबदारी पालिकेवर ढकलली जात असल्याने पालिकेलाच जबाबदार धरले जात आहे. असे न होता एकत्रित कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बेकायदा प्रकार रोखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.