शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

मोदी सरकारच्या अन्यायाविरोधात काँग्रेस कायम उभी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

ठाणे : देशातील सर्व शेतकरीवर्ग, कामगारवर्ग, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेल्या महिला आदींच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहणार ...

ठाणे : देशातील सर्व शेतकरीवर्ग, कामगारवर्ग, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेल्या महिला आदींच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहणार असून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायम विरोध करणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संपूर्ण राज्यभर तीन नवे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला पाठिंबा देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील मुख्यालयासमोर उपोषण करण्यात आले. जिल्हा काँग्रेसच्या वतीने ठाण्यातही स्टेशनबाहेर धरणे धरून दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपोषण केले. या उपोषणास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व ठाणे प्रभारी राजेश शर्मा, तारिक फारुकी, जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना खान यांनी सांगितले, खोट्या आश्वासनांच्या जिवावर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आता या आश्वासनांचा विसर पडला आहे, देशातील शेतकरी आंदोलनात ३०० नाहक बळी गेलेत, अजूनही हे आंदोलन सुरूच आहे. महागाई गगनाला भिडली असून, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असतानाही या सरकारला अजून जाग येत नाही. या सरकारला जागे करण्याची वेळ आता आली असून ठिकठिकाणी या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाबरोबर विविध कामगार संघटना, सामाजिक संस्थादेखील सहभागी होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.