शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

मोदी सरकारच्या अन्यायाविरोधात काँग्रेस कायम उभी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

ठाणे : देशातील सर्व शेतकरीवर्ग, कामगारवर्ग, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेल्या महिला आदींच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहणार ...

ठाणे : देशातील सर्व शेतकरीवर्ग, कामगारवर्ग, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेल्या महिला आदींच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहणार असून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायम विरोध करणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संपूर्ण राज्यभर तीन नवे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला पाठिंबा देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील मुख्यालयासमोर उपोषण करण्यात आले. जिल्हा काँग्रेसच्या वतीने ठाण्यातही स्टेशनबाहेर धरणे धरून दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपोषण केले. या उपोषणास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व ठाणे प्रभारी राजेश शर्मा, तारिक फारुकी, जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना खान यांनी सांगितले, खोट्या आश्वासनांच्या जिवावर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आता या आश्वासनांचा विसर पडला आहे, देशातील शेतकरी आंदोलनात ३०० नाहक बळी गेलेत, अजूनही हे आंदोलन सुरूच आहे. महागाई गगनाला भिडली असून, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असतानाही या सरकारला अजून जाग येत नाही. या सरकारला जागे करण्याची वेळ आता आली असून ठिकठिकाणी या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाबरोबर विविध कामगार संघटना, सामाजिक संस्थादेखील सहभागी होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.