शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

काँग्रेस पक्ष म्हातारा झाला, अबू आजमी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

मुंब्रा : काँग्रेस पक्ष हा म्हातारा झाला असून, त्यांच्याकडील नेतृत्व संपले असल्याने हा पक्ष आता उठणार नसून जुने मुद्दे ...

मुंब्रा : काँग्रेस पक्ष हा म्हातारा झाला असून, त्यांच्याकडील नेतृत्व संपले असल्याने हा पक्ष आता उठणार नसून जुने मुद्दे घेऊनच पक्ष चालला असल्याची टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आजमी यांनी बुधवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील मुस्लीमबहुल मुंब्य्रात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.

आमचा पक्ष (समाजवादी) छोटा झाला तरी चालेल. परंतु, आम्ही भाजपला सहन करणार नाही. भाजपला रोखण्यासाठी राज्यात आम्ही समर्थन दिलेले महाविकास आघाडीचे सरकार आमच्या बरोबर अन्याय करीत असून, मोठे राजकीय पक्ष छोट्या राजकीय पक्षांना गिळंकृत करत असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. आगामी ठामपाची निवडणूक पक्ष स्वबळावर लढवणार असून, मुंब्रा-कौसा परिसरातील सर्वच्या सर्व १९ प्रभागांतून तसेच ठाणे शहरातून १० प्रभागांमधून पक्ष उमेदवार उभे करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पक्ष मजबूत करण्यासाठी वसाहती तसेच घरोघरी जाणार असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक मतदारांनी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून दिल्यास हाॅकर्स झोन, शाळा, रुग्णालय आदी स्थानिक मुद्द्यावर काम करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले. पक्षाचे विभागीय अध्यक्ष आदिल खान तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.