शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

नागरिकांवर लादलेला पाणी पुरवठा लाभकर रद्द करण्याची शिंदेसेनेसह काँग्रेसची मागणी

By धीरज परब | Updated: April 24, 2024 19:31 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असून कोणालाही  विश्वासात न घेता असा कर लागू करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.  अचानक कर लागू केल्याने नागरिकां मध्ये संताप व्यक्त होत आहे .

मीरारोड - अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नागरिकांवर केली नाही सांगायचे आणि नंतर मागून नवीन कर आकारणी करून थेट बिलात पाठवून नागरिकांना झटका द्यायचा असा प्रकार मीरा भाईंदर महापालिकेने चालवला असून पालिकेच्या पाणीपुरवठा लाभ करास आता शिंदेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक , आमदार गीता जैन , काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे आदींनी विरोध करत कर रद्द करण्याची मागणी केली आहे . 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असून कोणालाही  विश्वासात न घेता असा कर लागू करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.  अचानक कर लागू केल्याने नागरिकां मध्ये संताप व्यक्त होत आहे . महापालिकेच्या या मनमानी निर्णयाला आमचा विरोध असून प्रशासनाने तात्काळ कर रद्द करावा अन्यथा पालिके विरुद्ध संघर्ष करू असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी लेखी पत्रा द्वारे दिला आहे . 

पाणीपुरवठा लाभकर  त्वरित रद्द करुन नव्याने मालमत्ता देयके नागरिकांना वितरित करण्याची मागणी काँग्रेस चे जिल्हा प्रवक्ते व प्रदेश प्रतिनिधी प्रकाश नागणे यांनी महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांच्या कडे केली आहे. गेल्या वर्षात पालिकेने अश्याच प्रकारे जनतेवर १० टक्के इतका रस्ता कर लादला होता .  शहरवासीयांना मूलभूत सेवासुविधा मिळत नाहीत. उधळपट्टी , मनमानी दराने टेंडर देणे , अनावश्यक कामे करणे पासून अनेक घोटाळे करून पालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या प्रशासनाने नागरिकांच्या माथी मात्र सातत्याने करवाढीचा वरवंटा चालवला आहे . महापालिका प्रशासनसह राज्यातील भाजपा - शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सरकार आणि त्यांचे स्थानिक नेते ह्याला जबाबदार असून त्याचा काँग्रेस निषेध करत असल्याचे नागणे यांनी म्हटले आहे . 

आमदार गीता जैन यांनी देखील प्रशासनाने आर्थिक अपव्यय टाळून काटकसर करावी . केवळ नागरिकांवर नवीन कर लादणे व करवाढ करणे हे चालणार नाही . अर्थसंकल्प सादर करताना कोणतीही करवाढ केली नाही सांगून गोडगोड प्रसिद्धी खायची  आणि नंतर गुपचूप मागच्या दाराने नागरिकांवर करवाढ लादून त्यांचा विश्वासघात करायचा हे योग्य नाही . गेल्या वर्षी १० टक्के रस्ता कर लावण्यासह अन्य करत वाढ केली असता आता या वर्षी आणखी एक कर लावून लोकांवर आणखी कराचा बोजा टाकू नये असे आ . जैन म्हणाल्या .