शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

संगणक दोन महिन्यांपासून धूळखात

By admin | Updated: February 17, 2017 02:01 IST

महाराष्ट्र शासनाची २०११-१२ मध्ये सुरू केलेली आयसीटी योजना बंद झाल्याने शाळांतील लाखो रुपयांची संगणक यंत्रणा

भातसानगर : महाराष्ट्र शासनाची २०११-१२ मध्ये सुरू केलेली आयसीटी योजना बंद झाल्याने शाळांतील लाखो रुपयांची संगणक यंत्रणा आज अक्षरश: धूळखात पडून आहे. दुसरीकडे शालेय अभ्यासक्रमात मात्र संगणक विषयाचा समावेश आहे. त्यामुळे संगणक असूनही नियोजनाअभावी विद्यार्थी प्रत्यक्ष संगणकहाताळणीपासून वंचित राहणार आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक हाताळता यावा, त्याची माहिती व्हावी, यासाठी २०११-१२ पासून शिक्षण संचालनालय (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) यांच्या माध्यमातून संगणक प्रयोगशाळेचा (आयसीटी) प्रयोग सुरू करण्यात आला. शहापूर तालुक्यातील १३ शाळांमध्ये ही योजना सुरू झाली. त्यासाठी एक प्रशिक्षित शिक्षकही देण्यात आल्याने हजारो विद्यार्थी या संगणकहाताळणीत यशस्वी झाले. त्यानंतर, अभ्यासक्रमात संगणक विषयाचा समावेश झाल्याने शासनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत होता. मात्र, डिसेंबरमध्ये अचानक हा उपक्रमच बंद झाल्याने लाखो रुपयांची ही सामग्री आजही तालुक्यातील शाळांमध्ये धूळखात पडून आहे. या उपक्रमासाठी शाळेत एक वेगळी संगणक रूमही तयार करण्यात आली होती. स्वतंत्र खोली असल्याने आठवड्यातील संगणकाच्या दोन तासांसाठी विद्यार्थी प्रत्यक्ष संगणक हाताळत होते. वाचन, लेखन यापेक्षा कृतीतून मिळणारे शिक्षण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. मात्र, आता हा उपक्रम बंद झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी आता पालकांमधून जोर धरत आहे. (वार्ताहर)