शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संगणक दोन महिन्यांपासून धूळखात

By admin | Updated: February 17, 2017 02:01 IST

महाराष्ट्र शासनाची २०११-१२ मध्ये सुरू केलेली आयसीटी योजना बंद झाल्याने शाळांतील लाखो रुपयांची संगणक यंत्रणा

भातसानगर : महाराष्ट्र शासनाची २०११-१२ मध्ये सुरू केलेली आयसीटी योजना बंद झाल्याने शाळांतील लाखो रुपयांची संगणक यंत्रणा आज अक्षरश: धूळखात पडून आहे. दुसरीकडे शालेय अभ्यासक्रमात मात्र संगणक विषयाचा समावेश आहे. त्यामुळे संगणक असूनही नियोजनाअभावी विद्यार्थी प्रत्यक्ष संगणकहाताळणीपासून वंचित राहणार आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक हाताळता यावा, त्याची माहिती व्हावी, यासाठी २०११-१२ पासून शिक्षण संचालनालय (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) यांच्या माध्यमातून संगणक प्रयोगशाळेचा (आयसीटी) प्रयोग सुरू करण्यात आला. शहापूर तालुक्यातील १३ शाळांमध्ये ही योजना सुरू झाली. त्यासाठी एक प्रशिक्षित शिक्षकही देण्यात आल्याने हजारो विद्यार्थी या संगणकहाताळणीत यशस्वी झाले. त्यानंतर, अभ्यासक्रमात संगणक विषयाचा समावेश झाल्याने शासनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत होता. मात्र, डिसेंबरमध्ये अचानक हा उपक्रमच बंद झाल्याने लाखो रुपयांची ही सामग्री आजही तालुक्यातील शाळांमध्ये धूळखात पडून आहे. या उपक्रमासाठी शाळेत एक वेगळी संगणक रूमही तयार करण्यात आली होती. स्वतंत्र खोली असल्याने आठवड्यातील संगणकाच्या दोन तासांसाठी विद्यार्थी प्रत्यक्ष संगणक हाताळत होते. वाचन, लेखन यापेक्षा कृतीतून मिळणारे शिक्षण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. मात्र, आता हा उपक्रम बंद झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी आता पालकांमधून जोर धरत आहे. (वार्ताहर)