शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-वडोदरा महामार्गातील बाधितांनाच मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : कल्याण तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात बल्याणी येथील चाळींतील हजारो रहिवासी बाधित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात बल्याणी येथील चाळींतील हजारो रहिवासी बाधित होणार आहेत. भरपाईचा शासकीय मोबदला विकासक, चाळीच्या जमीनमालकांनी घेऊन आम्हाला वंचित ठेवले आहे. जोपर्यंत मोबदला मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यासाठी भूसंपादन करू दिले जाणार नाही, असा इशारा चाळीतील रहिवाशांनी दिला आहे. प्रसंगी प्रांत कार्यालयासमोर उपोषणही करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी दिला आहे.

बल्याणी परिसरात अनेकांनी जमीन मालकांकडून चाळींतील घरे खरेदी केली आहेत. या घरांचे वीजदेयक, मालमत्ताकर हेच चाळीतील रहिवाशीच भरतात. मुंबई-वडोदा महामार्गात या भागांतील दोन हजार चाळी बाधित होणार आहेत. परंतु, या जमिनीचा मोबदला मूळ जमीनमालकांना मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत गायब झालेले जमीनमालक पुन्हा चाळींच्या जागेचा मोबदला घेण्यासाठी या भागात हजर झाले आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

बाधितांना प्रत्येक घराप्रमाणे सुमारे सात ते आठ लाख रुपये भरपाई निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण २८ कोटी २८ लाखांचा निधी बाधितांना देण्याचे महसूल विभागाने प्रस्तावित केले आहे. परंतु, चाळीमालकांनी रहिवाशांचा मोबदला स्वत: घेऊन त्यातील अर्धी रक्कमच रहिवाशांना देण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षण यादीत आमचे नाव असल्याने पूर्ण मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे, अशी रहिवाशांची मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी रहिवाशांनी याबाबत तत्कालीन आमदार जगन्नाथ शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे केली होती. आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बैठक घेऊन बाधित होणाऱ्या चाळीतील रहिवाशांना मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य करत चाळीतील बाधित रहिवाशांना मोबदला द्यावा, असे आदेश महसूल अधिकाऱ्यांना दिले होते.

दरम्यान, कळव्यातील एका विकासकाने नांदप भागात बांधलेली चाळींतील घरे विकली होती. परंतु, त्याने आता रस्त्याचा मोबदला चाळीतील रहिवाशांना मिळून देण्याऐवजी स्वतः घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार फाटक यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

---------------

चाळीतील रहिवाशांनी घरे खरेदी करताना घरांची अधिकृत नोंदणी केलेली नाही. त्यांनी केवळ नोटरी करून घरे घेतली आहेत. प्रकल्पाकरिता भूसंपादन करताना नोटरी पद्धत ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे जमीनमालकांना मोबदला दिला आहे. बाधित चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा हमीपत्र मोबदला देताना महसूल विभागाने जमीन मालकांकडून घेतले आहे. जमीन मालक बाधित रहिवाशांची फसवणूक करीत असतील तर त्यांनी तक्रारी कराव्यात. त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

- अभिजीत भांडे-पाटील, उपविभागीय अधिकारी, कल्याण

----------------