शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

मुंबई-वडोदरा महामार्गातील बाधितांनाच मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : कल्याण तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात बल्याणी येथील चाळींतील हजारो रहिवासी बाधित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात बल्याणी येथील चाळींतील हजारो रहिवासी बाधित होणार आहेत. भरपाईचा शासकीय मोबदला विकासक, चाळीच्या जमीनमालकांनी घेऊन आम्हाला वंचित ठेवले आहे. जोपर्यंत मोबदला मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यासाठी भूसंपादन करू दिले जाणार नाही, असा इशारा चाळीतील रहिवाशांनी दिला आहे. प्रसंगी प्रांत कार्यालयासमोर उपोषणही करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी दिला आहे.

बल्याणी परिसरात अनेकांनी जमीन मालकांकडून चाळींतील घरे खरेदी केली आहेत. या घरांचे वीजदेयक, मालमत्ताकर हेच चाळीतील रहिवाशीच भरतात. मुंबई-वडोदा महामार्गात या भागांतील दोन हजार चाळी बाधित होणार आहेत. परंतु, या जमिनीचा मोबदला मूळ जमीनमालकांना मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत गायब झालेले जमीनमालक पुन्हा चाळींच्या जागेचा मोबदला घेण्यासाठी या भागात हजर झाले आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

बाधितांना प्रत्येक घराप्रमाणे सुमारे सात ते आठ लाख रुपये भरपाई निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण २८ कोटी २८ लाखांचा निधी बाधितांना देण्याचे महसूल विभागाने प्रस्तावित केले आहे. परंतु, चाळीमालकांनी रहिवाशांचा मोबदला स्वत: घेऊन त्यातील अर्धी रक्कमच रहिवाशांना देण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षण यादीत आमचे नाव असल्याने पूर्ण मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे, अशी रहिवाशांची मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी रहिवाशांनी याबाबत तत्कालीन आमदार जगन्नाथ शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे केली होती. आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बैठक घेऊन बाधित होणाऱ्या चाळीतील रहिवाशांना मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य करत चाळीतील बाधित रहिवाशांना मोबदला द्यावा, असे आदेश महसूल अधिकाऱ्यांना दिले होते.

दरम्यान, कळव्यातील एका विकासकाने नांदप भागात बांधलेली चाळींतील घरे विकली होती. परंतु, त्याने आता रस्त्याचा मोबदला चाळीतील रहिवाशांना मिळून देण्याऐवजी स्वतः घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार फाटक यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

---------------

चाळीतील रहिवाशांनी घरे खरेदी करताना घरांची अधिकृत नोंदणी केलेली नाही. त्यांनी केवळ नोटरी करून घरे घेतली आहेत. प्रकल्पाकरिता भूसंपादन करताना नोटरी पद्धत ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे जमीनमालकांना मोबदला दिला आहे. बाधित चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा हमीपत्र मोबदला देताना महसूल विभागाने जमीन मालकांकडून घेतले आहे. जमीन मालक बाधित रहिवाशांची फसवणूक करीत असतील तर त्यांनी तक्रारी कराव्यात. त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

- अभिजीत भांडे-पाटील, उपविभागीय अधिकारी, कल्याण

----------------