शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-वडोदरा महामार्गातील बाधितांनाच मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : कल्याण तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात बल्याणी येथील चाळींतील हजारो रहिवासी बाधित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात बल्याणी येथील चाळींतील हजारो रहिवासी बाधित होणार आहेत. भरपाईचा शासकीय मोबदला विकासक, चाळीच्या जमीनमालकांनी घेऊन आम्हाला वंचित ठेवले आहे. जोपर्यंत मोबदला मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यासाठी भूसंपादन करू दिले जाणार नाही, असा इशारा चाळीतील रहिवाशांनी दिला आहे. प्रसंगी प्रांत कार्यालयासमोर उपोषणही करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी दिला आहे.

बल्याणी परिसरात अनेकांनी जमीन मालकांकडून चाळींतील घरे खरेदी केली आहेत. या घरांचे वीजदेयक, मालमत्ताकर हेच चाळीतील रहिवाशीच भरतात. मुंबई-वडोदा महामार्गात या भागांतील दोन हजार चाळी बाधित होणार आहेत. परंतु, या जमिनीचा मोबदला मूळ जमीनमालकांना मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत गायब झालेले जमीनमालक पुन्हा चाळींच्या जागेचा मोबदला घेण्यासाठी या भागात हजर झाले आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

बाधितांना प्रत्येक घराप्रमाणे सुमारे सात ते आठ लाख रुपये भरपाई निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण २८ कोटी २८ लाखांचा निधी बाधितांना देण्याचे महसूल विभागाने प्रस्तावित केले आहे. परंतु, चाळीमालकांनी रहिवाशांचा मोबदला स्वत: घेऊन त्यातील अर्धी रक्कमच रहिवाशांना देण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षण यादीत आमचे नाव असल्याने पूर्ण मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे, अशी रहिवाशांची मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी रहिवाशांनी याबाबत तत्कालीन आमदार जगन्नाथ शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे केली होती. आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बैठक घेऊन बाधित होणाऱ्या चाळीतील रहिवाशांना मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य करत चाळीतील बाधित रहिवाशांना मोबदला द्यावा, असे आदेश महसूल अधिकाऱ्यांना दिले होते.

दरम्यान, कळव्यातील एका विकासकाने नांदप भागात बांधलेली चाळींतील घरे विकली होती. परंतु, त्याने आता रस्त्याचा मोबदला चाळीतील रहिवाशांना मिळून देण्याऐवजी स्वतः घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार फाटक यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

---------------

चाळीतील रहिवाशांनी घरे खरेदी करताना घरांची अधिकृत नोंदणी केलेली नाही. त्यांनी केवळ नोटरी करून घरे घेतली आहेत. प्रकल्पाकरिता भूसंपादन करताना नोटरी पद्धत ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे जमीनमालकांना मोबदला दिला आहे. बाधित चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा हमीपत्र मोबदला देताना महसूल विभागाने जमीन मालकांकडून घेतले आहे. जमीन मालक बाधित रहिवाशांची फसवणूक करीत असतील तर त्यांनी तक्रारी कराव्यात. त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

- अभिजीत भांडे-पाटील, उपविभागीय अधिकारी, कल्याण

----------------