शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे निर्बंध आंबा व्यावसायिकांना सुखकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आंबा उत्पादक, विक्रेता यांच्यावर सगळ्यात पहिले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आंबा उत्पादक, विक्रेता यांच्यावर सगळ्यात पहिले संकट ओढावले. त्याची धास्ती उराशी बाळगून यंदा काय होणार याची चिंता व्यावसायिकांसमोर होती, परंतु नाशवंत फळ असल्याने त्याच्या वाहतुकीला राज्य, केंद्र सरकारने परवानगी दिल्याने यंदा तुलनेने खूप समाधान मिळाल्याची भावना आंबा विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

सर्वसाधारणपणे मुंबईत कोकणातून आंबा येतो. अलीकडे कर्नाटकहूनही आंबा यायला लागला आहे. परंतु असे असले तरी देवगड, रत्नागिरी येथील आंब्याला बाजारात चांगली मागणी असते आणि तोच आंबा डोंबिवलीकर चोखंदळ आणि खवय्यांनी यंदा चाखला. कोकणातील आंब्याकरिता डोंबिवली ही एक मोठी बाजारपेठ आहे. येथील बहुतांश पांढरपेशा तसेच कोकणी खवय्यांनी देवगडच्या हापूसची मागणी केल्याने तेथून भरपूर आंबा यंदा येथे आला. आता देवगड पाठोपाठ रत्नागिरीमधूनही चांगले फळ बाजारात आले आहे.

पूर्वीसारख्या ५, ७ डझनाच्या पेट्यांना आता मागणी नसल्याने आता २ डझनाच्या पेट्या बाजारात उपलब्ध झाल्या असल्याने त्याला खूप चांगली मागणी आहे. येथील गुजराथी, जैन समाजामध्येही चांगल्या आंब्याला खूप मागणी वाढत असून विविध देवालयांमध्ये ती बंद असली तरी आंबे प्रसाद स्वरूपात दाखवण्यात येतात.

यंदाही फेरीवाले, घाऊक विक्रेते गल्लोगल्ली दिसत नसून घरातून किंवा एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टोअरेज करण्यासाठी काही पेट्या मागवण्यात येत आहेत. आता एकदा ऑर्डर दिली की दोन दिवसात डिलिव्हरी होत असल्याने नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये समाधान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबे विक्रेते नागरिकांना व्यवसायाची माहिती देत आहेत. त्यामुळे आंबा कसा वाटला याचीही ताजी प्रतिक्रिया व्यावसायिकांच्या नावाने येत असल्याने विशेष जाहिरातबाजीचे प्रयोजनही करावे लागत नाही. आंबा किती मोठा यापेक्षा वजनाने कसा आहे याबाबतची माहिती ग्राहक विचारत असून त्यानुसार फळाची किंमत ठरवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मध्यम, मोठे फळ असल्यास डझनाला किंमत बदलते.

---------

वाहतुकीची समस्या यंदा आली नाही. ऑर्डर दिली की दोन दिवसात आंबे मिळत आहेत. आंबे विकण्याचा व्यवसाय म्हणण्यापेक्षा ग्राहकांना आंबा मिळाला की तो खाऊन जे समाधान मिळते त्याचा आनंद खूप असतो. कोणत्याही अडचणी यंदा आलेल्या नाहीत. उलट मागणी वाढली असून चांगला आंबा दिल्यास नागरिक पुन्हा मागणी करत असल्याचा अनुभव आहे.

- जसराज सुधीर बर्डे , आंबा विक्रेता

-------

यंदा चांगली मागणी आहे. गेल्यावर्षी कडक लॉकडाऊन असल्याने व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. यंदा केंद्र, राज्य सरकारने आंबा हे नाशवंत फळ असल्याने त्याच्या वाहतुकीला परवानगी दिली. त्यामुळे वाहतूक करणे सोपे झाले. बरेच ग्राहक ठरलेले असल्याने मागणी आहेच, यंदाचा मोसम चांगला गेला, पण व्यावसायिक म्हणून बाजारपेठेत जशी मागणी असायला हवी तशी मिळाली नाही . ओळखीतून व्यवसाय तग धरून आहे.

- प्रसाद मोरे, आंबा विक्रेता

-----------------

गेल्या वर्षीपासून या व्यवसायात उतरलो आहे. प्रतिसाद खूप असला तरीही आंब्याचे नुकसान खूप होते. मालवाहतूकदार पेट्या कशाही भरतात. त्यात जिथे चेकिंग असते तिथे काहींच्या अपेक्षा असल्याचे सांगण्यात येते. ग्राहकही एखादं दुसरा आंबा खराब निघाला तर बदलून देण्याची अपेक्षा करतात, परंतु बाजारात सफरचंद, चिकू खराब झाला तर बदलायला जातात का? आणि समोरचा विक्रेता बदलून देतो का? याचा विचारही व्हावा असे वाटते

- चिंतामणी शिधोरे, आंबा व्यावसायिक

----------------

येथील राजकीय नेत्याने मुंबई परिसरात आंबा पाठवला असून खूप वेगाने व्यवसाय करण्यात आला. अडचणी फारशा आल्या नसून व्यवसाय करायला खूप चांगली संधी आहे. कोरोनाचे निर्बंध असतानाही व्यवसायाला गती मिळाली.

- चिन्मय मडके, आंबा विक्रेते

--------------

फणसाचे गरे यांनी खाल्ला भाव

आंबा पोळी, तळलेले फणसाचे गरे, कोकम सरबत, कोकम यांना खूप मागणी आहे. फणसाचे तळलेले गरे यंदा चढ्या भावाने विकले गेले आहेत. नागरिकांमध्ये त्याची खूप मागणी आहे.

-------------