शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

बोईसरला३७५ आदिवासींचा सामूहिक विवाह

By admin | Updated: May 24, 2017 00:49 IST

आधार प्रतिष्ठान व शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी समाजातील गरीब, गरजू व दारिद्र्य रेषेखालील

पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : आधार प्रतिष्ठान व शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी समाजातील गरीब, गरजू व दारिद्र्य रेषेखालील ३७५ वधू-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला. या सोहळ्यात पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी जोडपी सहभागी झाले होते.या प्रसंगी खासदार राऊत यांनी मुलीच्या लग्ना करीता घेतलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात असे सांगून गोर गरीब अदिवासींकरीता आधार प्रतिष्ठान आयोजित करीत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे कर्ज मुक्त लग्न व संसार सुखी होण्यास निश्चित मदत होईल अशी आशा व्यक्त करून या उपक्रमामुळे गोरगरीबांचे संसार फूलल्याचे गौरोदगार काढले. आधार प्रतिष्ठानामार्फत वधूला साडी, मेकअप बॉक्स, पादत्राणे, वरांसाठी कपडे तसेच टॉवेल, चादर, बेड शीटस्, आणि संसारपयोगी भांडी पाहुण्याच्या हस्ते देण्यात आली.आधार प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळयात आता पर्यंत २३०० जोडपयांच्या विवाह पार पडला असून सावकाराकडून कर्ज घेऊन लग्न करण्याच्या प्रवृत्तीस सामुदायिक लग्नाच्या माध्यमातून आळा बसून ते कुटुंब वेठबिगारीतून मुक्त होईल असे आधार प्रतिष्ठानचे सचिव जगदीश धोडी यांनी सांगितले.बोईसरच्या इराणीवाडी मैदानावर आयोजिलेल्या या विवाह सोहळ्याला शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सिंग, सचिव जगदिश धोडी, पालघर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक बी. जी.यशोद, शिवसेना पालघर जिल्हाचे सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, युवसेना पालघर जिल्हा निरीक्षक केदार दिघे, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख उदय बंधू पाटील व प्रभाकर राऊळ, आमदार अमित घोडा, बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी फत्तेसिंग पाटील, पालघर जि. प. उपाध्यक्ष सचिन पाटील, उपजिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, पालघर जिल्ह्याच्या महिला संघटक ज्योती ठाकरे, युवासेनेचे पालघर जिल्हयाचे युवा अधिकारी अ‍ॅड. परीक्षीत पाटील, पालघर तालुका प्रमुख सुधीर तामोरे, पालघर पं. स.चे सभापती रवींद्र पागधरे, उपसभापती मनोज संखे, आधार प्रतिष्ठान चे पदाधिकारी प.स. सदस्य मुकेश पाटील, बोईसर शहर प्रमुख निलम संखे, आधार महेश जाधव, आंनद धोडी व अशोक भोईर आदि मान्यवर तसेच वधूवरांचे नातेवाईक तसेच त्यांचया गावातील अनेक वऱ्हाडी उपस्थित होते.