शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

‘अपघातमुक्त ठाणे जिल्हा’ संकल्पनेसाठी एकत्रित या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST

ठाणे : जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे. तसेच अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात ...

ठाणे : जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे. तसेच अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी बुधवारी येथे केले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक बुधवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, हेमांगिनी पाटील आदी उपस्थित होते. तर आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी यावेळी उपस्थित होते.

सामान्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, अपघाती मृत्यूदर कमी करणे आदी विषयांवर चर्चा करून यासंबंधी काय नाविन्यपूर्ण उपाय आपण करू शकतो, याबाबतचे मार्गदर्शन करून पाटील म्हणाले की, ठराविक महिन्यात तसेच ठराविक वेळातच जास्त अपघात का होतात, याचे विश्लेषण करावे. तसेच नागरिकांमध्ये नियम पाळण्यासंदर्भाची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. ब्लॅक स्पॉट कमी करून ठाणे जिल्हा झिरो टॉलरन्स सेफ रोड महाराष्ट्र करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग हे ठाणे जिल्ह्यातून जातात. रस्ते सुरक्षाविषयक कामामध्ये जिल्ह्याने गेल्या वर्षी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील काळातही यापेक्षा अधिक चांगले काम केले जावे. रस्ते सुरक्षासंबंधी ज्या उपाययोजना राबविल्या जातात, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार गायकवाड आणि आयलानी यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या.