शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

उल्हासनगरात जमावबंदी?

By admin | Updated: March 31, 2016 02:54 IST

अपुऱ्या, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आणि अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाईमुळे उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने, मारहाणीच्या घटना, ठिय्या, उपोषणे सुरू आहेत.

उल्हासनगर : अपुऱ्या, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आणि अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाईमुळे उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने, मारहाणीच्या घटना, ठिय्या, उपोषणे सुरू आहेत. पाण्याच्या पळवापळवीच्या घटनाही घडत आहेत. परिस्थिती क्षणोक्षणी गंभीर बनत आहे. पोलीस बंदोबस्तात पालिका कर्मचारी सध्या काम करीत आहेत. ही स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन शहरात जमावबंदी लागू करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करीत असल्याचे संकेत आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले. शहरातील उंचावरील जलकुंभांचा ताबा नगरसेवकांसह तथाकथित समाजसेवक आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तेथे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी आहे. मात्र, पाण्याच्या टाक्यांचाच ताबा घेतल्याने अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनते आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. वेगवेगळे उपाय करूनही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने समाजकंटकांचा उपद्रव वाढल्याने उल्हासनगरमध्येही जमावबंदी लागू करण्याच्या निष्कर्षाप्रत आयुक्त येऊन ठेपले आहेत. (प्रतिनिधी)मनसेसोबत चर्चाउल्हासनगरात जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत मनसेने शोले स्टाइल ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर, प्रभागातील नागरिकांसह पालिका अधिकारी उपोषणकर्त्यांशी गुरुवारी चर्चा करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.नगरसेवकांनी मागितले पोलीस संरक्षणभाजपाचे नगरसेवक हरेश जग्यासी यांच्या घरावर प्रभागातील नागरिकांनी बुधवारी पाण्यासाठी मोर्चा काढला. मोर्चातील काहींनी त्यांना मारहाणीची धमकी दिल्याने जग्यासी आणि भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. खेमानी नाल्याचे काम सुरूमहापालिकेने ३२ कोटींच्या निधीतून खेमानी नाल्याचा प्रवाह वळवण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील सांडपाणी, रासायनिक पाणी वाहून नेणारा हा खेमानी नाला उल्हास नदीला थेट जाऊन मिळत असल्याने प्रदूषण वाढते आहे. त्यामुळे त्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पालिका काढते आहे जलपर्णी उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ग्रामीण परिसर, भार्इंदर, भिवंडी आदी पालिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा होत आहे. नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सर्व पालिकांसह पाटबंधारे विभाग व एमआयडीसी यांचे आहे. असे असताना फक्त उल्हासनगर पालिका लाखो रुपये खर्च करून जलपर्णी काढत असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.