शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात जमावबंदी?

By admin | Updated: March 31, 2016 02:54 IST

अपुऱ्या, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आणि अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाईमुळे उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने, मारहाणीच्या घटना, ठिय्या, उपोषणे सुरू आहेत.

उल्हासनगर : अपुऱ्या, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आणि अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाईमुळे उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने, मारहाणीच्या घटना, ठिय्या, उपोषणे सुरू आहेत. पाण्याच्या पळवापळवीच्या घटनाही घडत आहेत. परिस्थिती क्षणोक्षणी गंभीर बनत आहे. पोलीस बंदोबस्तात पालिका कर्मचारी सध्या काम करीत आहेत. ही स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन शहरात जमावबंदी लागू करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करीत असल्याचे संकेत आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले. शहरातील उंचावरील जलकुंभांचा ताबा नगरसेवकांसह तथाकथित समाजसेवक आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तेथे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी आहे. मात्र, पाण्याच्या टाक्यांचाच ताबा घेतल्याने अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनते आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. वेगवेगळे उपाय करूनही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने समाजकंटकांचा उपद्रव वाढल्याने उल्हासनगरमध्येही जमावबंदी लागू करण्याच्या निष्कर्षाप्रत आयुक्त येऊन ठेपले आहेत. (प्रतिनिधी)मनसेसोबत चर्चाउल्हासनगरात जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत मनसेने शोले स्टाइल ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर, प्रभागातील नागरिकांसह पालिका अधिकारी उपोषणकर्त्यांशी गुरुवारी चर्चा करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.नगरसेवकांनी मागितले पोलीस संरक्षणभाजपाचे नगरसेवक हरेश जग्यासी यांच्या घरावर प्रभागातील नागरिकांनी बुधवारी पाण्यासाठी मोर्चा काढला. मोर्चातील काहींनी त्यांना मारहाणीची धमकी दिल्याने जग्यासी आणि भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. खेमानी नाल्याचे काम सुरूमहापालिकेने ३२ कोटींच्या निधीतून खेमानी नाल्याचा प्रवाह वळवण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील सांडपाणी, रासायनिक पाणी वाहून नेणारा हा खेमानी नाला उल्हास नदीला थेट जाऊन मिळत असल्याने प्रदूषण वाढते आहे. त्यामुळे त्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पालिका काढते आहे जलपर्णी उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ग्रामीण परिसर, भार्इंदर, भिवंडी आदी पालिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा होत आहे. नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सर्व पालिकांसह पाटबंधारे विभाग व एमआयडीसी यांचे आहे. असे असताना फक्त उल्हासनगर पालिका लाखो रुपये खर्च करून जलपर्णी काढत असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.