शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

राज्य प्रदूषण मंडळ बंद करा!

By admin | Updated: April 2, 2016 03:09 IST

डोंबिवलीतील औद्योगिक वसाहत आणि अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यातील रासायनिक कारखान्यांतून होणारे प्रदूषण रोखण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे.

डोंबिवली : डोंबिवलीतील औद्योगिक वसाहत आणि अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यातील रासायनिक कारखान्यांतून होणारे प्रदूषण रोखण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. प्रदूषण रोखण्याची हमीही हे मंडळ घेत नाही. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य मंडळाचा ताबा घ्यावा, असे कठोर आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल.राज्याचे मंडळ ताब्यात घेण्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी. तिचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ताबा घ्यावा, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आल्याने राज्यातील मंडळाच्या आजवरच्या भोंगळ कारभाराबद्दल त्यांना जोरदार चपराक मिळाल्याचे मानले जाते. ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने हाती घेतलेल्या ‘सेव्ह उल्हास रिव्हर’ या प्रकल्पांतर्गत डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ या परिसरांतील रासायनिक कारखान्यांतून तयार होणारे रसायनमिश्रित सांडपाणी योग्य प्रकारे प्रक्रिया करून सोडले जात नाही. ज्या पाण्यावर प्रकिया होते, त्या पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण (सीओडी) चे प्रमाण निकषांप्रमाणे २५० असायला हवे. प्रत्यक्षात ते दोन हजारांवर आढळल्याने ‘वनशक्ती’ने नोव्हेंबर २०१३ ला याचिका दाखल केली. त्यात, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने प्रदूषण वाढत असल्याचा दावा केला. १५ दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रम मंडळाने प्रतिज्ञापत्र सादर करून डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूरच्या औद्योगिक पट्ट्यातून प्रदूषण होत असल्याचे मान्य केले. त्यामुळे ‘वनशक्ती’च्या प्रदूषणविरोधी लढ्याला बळ मिळाले. डोंबिवली औद्योगिक वसाहतीत १७ दशलक्ष लीटरचे एक आणि दोन दशलक्ष लीटर क्षमतेचे एक अशी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत. या दोन्ही प्रक्रिया केंद्रांतून निकषानुसार रासायानिक सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी त्यांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचे आदेश लवादाने दिले होते. त्यांना ३१ मार्चपर्यंत सुधारणा करण्याची मुदत दिली होती. ती गुरुवारी संपली. मात्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी कामात सुधारणा केली नाही. त्यांच्याकडून या सुधारणा करून घेण्याची जबाबदारीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पार पाडली नाही. त्यावर, लवादाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. ते सादर करताना हमीपत्र देण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नकार दिला. त्यामुळे कठोर होत हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. त्या नोटिशीला १५ दिवसांत समाधानकारक उत्तर दिले नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ताबा केंद्रीय मंडळाने घ्यावा, असे लवादाच्या आदेशात स्पष्ट केले आहे. वापी सुधारले, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? गुजरातमधील वापी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतून निर्माण होणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर त्या ठिकाणच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जात होती. तेथील प्रदूषणाचे प्रमाण डोंबिवलीइतकेच होते. त्यांच्याही प्रक्रिया केलेल्या पाण्यात अडीच हजार सीओडी आढळून येत होते. त्यांना सुधारणा करण्याची संधी लवादाने दिली. त्यानंतर, वापीतील सीओडीचे प्रमाण ३०० मिलिग्रॅम प्रतिलीटर इतके खाली आले. वापीला हे करणे शक्य झाले. डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये हा परिणाम साधण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला काय अडचण आहे, असा सवाल लवादाने सुनावणीदरम्यान केला आणि मंडळाची कानउघाडणी केली.