शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

हवामानातील बदल पिकांना घातक

By admin | Updated: March 1, 2016 01:52 IST

डहाणू तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून धुके ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, आंबा, सफेद जांभू आदी पिकांवर अनिष्ठ परिणाम होण्याची दाट शक्यता असून उत्पादन घटण्याच्या भीतीने

बोर्डी : डहाणू तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून धुके ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, आंबा, सफेद जांभू आदी पिकांवर अनिष्ठ परिणाम होण्याची दाट शक्यता असून उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी व बागायतदारांना ग्रासले आहे. पंचायत समिती कृषी विभागात प्रतिबंधात्मक कीडनाशक औषधे तसेच फवारणी पंपाचा तुटवडा असल्याने महागडी औषध खरेदीमुळे बळीराजा हवालदिल बनला आहे.डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षापासून नगदी पीके घेण्याचा कल वाढला आहे. सागरी आणि डोंगरी भागात वांगी, मिरची, तसेच कारली, दुधी, शिराळे या वेलवर्गीय पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. कारखाना, बांधकाम आणि वीटभट्टी मजुरही शेतीकडे वळले आहेत. मिरची पिकातून भरघोस आर्थिक लाभ होतो. परंतु ते किड व रोगांना लवकर बळी पडते. गेल्या पंधरा दिवसापासून दाट धुके, आणि वातावरणातील बदलाचा फटका भाजीपाला पिकांवर दिसू लागला आहे. भुरी, पांढरीमाशी, फुलकिडे, रसशोषक अळी इ. चा उपद्रव वाढल्याने पिक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे.आंबा, सफेद जांभू या बागायती मोहर धरू लागल्या आहेत. तालुक्यात जिरायत, प्रवाही, ठिबक, तुषार आणि बांधावरील आंबा लागवडीचे एकूण क्षेत्र १७१९.४० हेक्टर आहे. सफेद जांभूचे क्षेत्र त्यामुळे पिकांवर औषध फवारणी करण्याची गरज आहे. मात्र शेतकऱ्याकडे तेवढा पैसा नसल्याने आकाशाकडे पहावे लागत आहे.मात्रच्डहाणू पंचायत समिती कृषी विभागाकडे ना औषधांना साठा आहे ना फवारणी साहीत्य त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी विक्रेत्यांकडून अधिक पैसे देऊन किटकनाशके खरेदी करावी लागतात. लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे शासकीय अनास्थेपायी शेतकऱ्यांचा हकानाक बळी जात आहे. च्जिरायत, प्रवाही, ठिबक, तुषार आणि बांधावरील आंबा लागवडीचे एकूण क्षेत्र १७१९.४० हेक्टर आहे. झाडांनी मोहर धरल्याने आणि दुसरीकडे पालवी फुटल्याने बागायतदारांचे गणित बिघडले आहे.