शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

हवामानातील बदल पिकांना घातक

By admin | Updated: March 1, 2016 01:52 IST

डहाणू तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून धुके ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, आंबा, सफेद जांभू आदी पिकांवर अनिष्ठ परिणाम होण्याची दाट शक्यता असून उत्पादन घटण्याच्या भीतीने

बोर्डी : डहाणू तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून धुके ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, आंबा, सफेद जांभू आदी पिकांवर अनिष्ठ परिणाम होण्याची दाट शक्यता असून उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी व बागायतदारांना ग्रासले आहे. पंचायत समिती कृषी विभागात प्रतिबंधात्मक कीडनाशक औषधे तसेच फवारणी पंपाचा तुटवडा असल्याने महागडी औषध खरेदीमुळे बळीराजा हवालदिल बनला आहे.डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षापासून नगदी पीके घेण्याचा कल वाढला आहे. सागरी आणि डोंगरी भागात वांगी, मिरची, तसेच कारली, दुधी, शिराळे या वेलवर्गीय पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. कारखाना, बांधकाम आणि वीटभट्टी मजुरही शेतीकडे वळले आहेत. मिरची पिकातून भरघोस आर्थिक लाभ होतो. परंतु ते किड व रोगांना लवकर बळी पडते. गेल्या पंधरा दिवसापासून दाट धुके, आणि वातावरणातील बदलाचा फटका भाजीपाला पिकांवर दिसू लागला आहे. भुरी, पांढरीमाशी, फुलकिडे, रसशोषक अळी इ. चा उपद्रव वाढल्याने पिक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे.आंबा, सफेद जांभू या बागायती मोहर धरू लागल्या आहेत. तालुक्यात जिरायत, प्रवाही, ठिबक, तुषार आणि बांधावरील आंबा लागवडीचे एकूण क्षेत्र १७१९.४० हेक्टर आहे. सफेद जांभूचे क्षेत्र त्यामुळे पिकांवर औषध फवारणी करण्याची गरज आहे. मात्र शेतकऱ्याकडे तेवढा पैसा नसल्याने आकाशाकडे पहावे लागत आहे.मात्रच्डहाणू पंचायत समिती कृषी विभागाकडे ना औषधांना साठा आहे ना फवारणी साहीत्य त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी विक्रेत्यांकडून अधिक पैसे देऊन किटकनाशके खरेदी करावी लागतात. लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे शासकीय अनास्थेपायी शेतकऱ्यांचा हकानाक बळी जात आहे. च्जिरायत, प्रवाही, ठिबक, तुषार आणि बांधावरील आंबा लागवडीचे एकूण क्षेत्र १७१९.४० हेक्टर आहे. झाडांनी मोहर धरल्याने आणि दुसरीकडे पालवी फुटल्याने बागायतदारांचे गणित बिघडले आहे.