शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

कुर्बानीनंतर स्वच्छता होणार

By admin | Updated: September 13, 2016 02:18 IST

बकरी ईदनिमित्ताने तीन दिवस चालणाऱ्या कुर्बानीनंतर जनावरांचा टाकाऊ भाग व इतर घाणीच्या साफसफाईबाबत मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी घेतलेला

भिवंडी : बकरी ईदनिमित्ताने तीन दिवस चालणाऱ्या कुर्बानीनंतर जनावरांचा टाकाऊ भाग व इतर घाणीच्या साफसफाईबाबत मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी घेतलेला पवित्रा महापौरांच्या मध्यस्थीनंतर मावळला. गेल्या तीन-चार दिवसांपासून मनपा प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये धुसफूस सुरू होती. या प्रकरणी सोमवारी दुपारी महापौर तुषार चौधरी यांनी कामगार संघटनांशी चर्चा केल्याने मंगळवारपासून बकरी ईदची सफाई करण्याची तयारी कामगारांनी दर्शवली. त्यामुळे ईदच्या आयोजनातील अडथळे दूर झाल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील शहर सफाई सोडता अन्य सर्व कामे ठेकेदारामार्फत करण्यात येतात. त्यामुळे बकरी ईदनिमित्ताने होणाऱ्या कुर्बानीनंतरचा जनावरांचा टाकाऊ भाग व इतर घाण वाहून नेण्यासाठी ठेकेदार नेमावेत, अशी मागणी कामगार संघटनेने प्रशासनाकडे गेली दोन वर्षे सुरू केली आहे. मात्र, प्रशासनाने विविध कारणे पुढे करीत कुर्बानीनंतरची स्वच्छता सफाई कामगारांकडूनच सुरू ठेवल्याचा आरोप करीत संघटनांनी प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला. दैनंदिन सफाई ही सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी असून अत्यावश्यक सेवा म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही, तर शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले होते. कामगारांनी स्वच्छतेचे काम केले नाही, तर त्यांच्यावर अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत फौजदारी कारवाई करण्याची नोटीस दिल्याने प्रशासन व कामगार संघटनांमध्ये तणावाचे वातावरण होते. ईदच्या सणात व्यत्यय येऊ नये, म्हणून महापौर तुषार चौधरी यांनी मध्यस्थी केली.कुर्बानी केंद्रावर व इतर ठिकाणी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम केल्यास दिलेली नोेटीस मागे घेण्यात येईल, असे पत्र कर्मचारी संघर्ष कृती समितीला दिले. त्यानंतर, कामगार व प्रशासनातील वातावरण निवळले आणि सफाईप्रकरणी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करीत कर्मचाऱ्यांनी बकरी ईदच्या काळात सफाईचे काम करण्याचे संघटनांनी मान्य केले. (प्रतिनिधी)