शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

नदीकिनारी दररविवारी साफसफाई; खडवली येथे तरुणाईचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:14 IST

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील खडवली या रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर खडवली-भातसा नदी आहे.

टिटवाळा : कडक उन्हाळ्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर खडवली येथे भातसा नदीपात्रात पोहायला येतात. त्यामुळे येथे उन्हाळी पिकनिक पॉइंट तयार झाले आहे. मात्र, याठिकाणी पर्यटकांकडून कचरा होत असल्याने नदीकिनाऱ्याच्या साफसफाईसाठी निसर्गसंवर्धन समितीने पुढाकार घेतला असून दररविवारी येथे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यामध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील खडवली या रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर खडवली-भातसा नदी आहे. याठिकाणी मुंबई, ठाण्यासह लगतच्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, वासिंद, शहापूर तसेच नाशिक जिल्ह्यातून हजारो पर्यटक येतात. काही हुल्लडबाज पर्यटक तेथेच मद्यपान करून रिकाम्या बाटल्या फोडतात. तसेच खाद्यपदार्थांचे पॅकिंग, प्लास्टिक पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा होत आहे. ग्रामस्थ याच नदीपात्रात गाड्याही धुतात. विशेष म्हणजे, या नदीपात्रातून शेजारच्या गावांना कुठलीही प्रकिया न करता स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत) प्रशासनाकडून पाण्याचा पुरवठा केला जातो. सांडपाणीही थेट नदीत सोडले जात असून शेवाळ तयार झाले आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आहे. स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा व प्रशासनाकडे मागणी करूनही उपाययोजना न झाल्याने तरुणांनी पुढाकार घेऊ न समितीने दररविवारी स्वच्छता हाती मोहीम सुरू केली आहे.

खडवली-भातसा नदीवरील पिकनिक पॉइंटवर रविवारी तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. काही हुल्लडबाज पर्यटक मद्याच्या बाटल्या तेथेच फोडतात तसेच मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा होत आहे. त्यामुळे समितीच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. - सागर लोणे, निसर्गसंवर्धन समिती