शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

मधमाशांच्या दंशाने ठाण्यात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

ठाणे : बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या राबोडी येथील नबी उल्ला (१५) या बालकाच्या संपूर्ण शरीराला मधमाशांनी दंश केल्याने कळवा ...

ठाणे : बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या राबोडी येथील नबी उल्ला (१५) या बालकाच्या संपूर्ण शरीराला मधमाशांनी दंश केल्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. बालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांनी मृतदेह घेण्यास नकार देऊन डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करून रुग्णालयात गोंधळ घातला. अखेर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मृत बालकाच्या एका नातेवाइकाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

नबी हा इतर मित्रांसह ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. यावेळी झाडांच्या फांद्या तोडताना चुकून कोणाचा तरी धक्का त्या झाडावरील मधमाश्यांच्या पोळ्याला लागला आणि त्या मध्यमाश्यांनी नबी याच्यासह त्याच्या मित्रांनाही दंश केले. ही घटना सोमवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास घडली. ते सर्व जण आपापल्या घरी गेले. नबी याला मध्यमाशांनी अंगभर दंश केल्याने त्याला संध्याकाळी अचानक त्रास जाणवू लागला. त्यानुसार नातेवाइकांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. परंतु, कोणीही उपचारार्थ दाखल करू घेतले नाही. अखेर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणल्यावर तेथील डॉक्टरांनी दाखल करून तत्काळ उपचारही सुरू केले. मात्र, मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास तब्येत अचानक बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हा तेथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नातेवाइकांनी गोंधळ घालून डॉक्टरांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका नातेवाइकाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी दिली. तसेच दुपारपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘मध्यमाशांनी त्या बालकाच्या अंगभर दंश केले होते. तसेच रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्याला रुग्णालयात आणल्यावर तातडीने उपचारही सुरू केले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवला आहे. नातेवाइकांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत.’ - डॉ भीमराव जाधव, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे