शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गाळात रुतलेली पालिका वर काढण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

By admin | Updated: May 29, 2017 06:12 IST

गेल्या ३० वर्षांत प्रथमच भिवंडीतील जनतेने एका पक्षाच्या बाजूने कौल दिला असल्याने आता आर्थिक डबघाईला आलेल्या या महापालिकेचा

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: गेल्या ३० वर्षांत प्रथमच भिवंडीतील जनतेने एका पक्षाच्या बाजूने कौल दिला असल्याने आता आर्थिक डबघाईला आलेल्या या महापालिकेचा गाडा स्वबळावर हाकण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने काँग्रेसकडील या महापालिकेला राजश्रय लाभणे कठीण आहे. अशा परिस्थितीत भिवंडीकरांच्या अपेक्षांना सार्थ ठरण्याची काँग्रेसची कसोटी आहे.मागील निवडणुकीत काँग्रेसचे जास्त नगरसेवक निवडून आलेले असतानादेखील कोणार्क आघाडी व शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने सत्ता स्थापन केली. महापालिकेच्या तिजोरीत अक्षरश: खडखडाट आहे. कराची प्रचंड थकबाकी आहे. महापालिका ८०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. शहरातील रस्ते, पाणी, नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मालमत्ताकर हा पालिकेचा एकमेव प्रमुख उत्पन्नस्रोत आहे. मनपातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही वसुली न केल्याने शासनाकडून मिळणारे अनुदान व निधीवर अवलंबून राहावे लागत आहे.अशा स्थितीत महानगरपालिकेस आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.शहरात भाजपाचे खासदार, शिवसेना व भाजपाचे असे दोन आमदार असून भाजपाची सत्ता असल्यामुळे अपेक्षित अनुदान, निधी मिळताना कोंडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर भरपूर निधी उपलब्ध करून देऊ. मात्र, तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती दिल्या, तर निधीची लूट करणाऱ्यांच्या खिशात तो जाऊ देणार नाही, असे स्पष्ट विधान फडणवीस यांनी जाहीर सभेत केले होते. त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर महापौर बसवला व शहराचा विकास झाला नाही, तर येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते.देशात भाजपाला अनुकूल वातावरण असताना भिवंडीतील बहुसंख्य मुस्लिम समाजाने काँग्रेसची साथ देऊन नवे संकेत दिले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याकडे आकृष्ट झालेला मुस्लिम गोमांसबंदी व ट्रिपल तलाक अशा मुद्द्यांमुळे तसेच भाजपा-रा.स्व. संघाच्या बेलगाम नेत्यांच्या वक्तव्यांनी पुन्हा काँग्रेसकडे वळला आहे, असे दिसत आहे.त्यामुळे पुन्हा धार्मिक राजकारणाची पोळी न पिकवता मुस्लिम समाजाचा विकास करून दाखवण्याचे व हाच भिवंडी पॅटर्न पुढील निवडणुकीत काँग्रेसला यश देईल, अशी बांधणी करावी लागेल, असे मुस्लिम समाजातील नेत्यांचेही मत आहे.