शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
2
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
3
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
4
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
5
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
6
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
7
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
8
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
9
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
10
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
11
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
12
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
13
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
14
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
15
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
16
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
17
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
18
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
19
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
20
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 

गाळात रुतलेली पालिका वर काढण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

By admin | Updated: May 29, 2017 06:12 IST

गेल्या ३० वर्षांत प्रथमच भिवंडीतील जनतेने एका पक्षाच्या बाजूने कौल दिला असल्याने आता आर्थिक डबघाईला आलेल्या या महापालिकेचा

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: गेल्या ३० वर्षांत प्रथमच भिवंडीतील जनतेने एका पक्षाच्या बाजूने कौल दिला असल्याने आता आर्थिक डबघाईला आलेल्या या महापालिकेचा गाडा स्वबळावर हाकण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने काँग्रेसकडील या महापालिकेला राजश्रय लाभणे कठीण आहे. अशा परिस्थितीत भिवंडीकरांच्या अपेक्षांना सार्थ ठरण्याची काँग्रेसची कसोटी आहे.मागील निवडणुकीत काँग्रेसचे जास्त नगरसेवक निवडून आलेले असतानादेखील कोणार्क आघाडी व शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने सत्ता स्थापन केली. महापालिकेच्या तिजोरीत अक्षरश: खडखडाट आहे. कराची प्रचंड थकबाकी आहे. महापालिका ८०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. शहरातील रस्ते, पाणी, नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मालमत्ताकर हा पालिकेचा एकमेव प्रमुख उत्पन्नस्रोत आहे. मनपातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही वसुली न केल्याने शासनाकडून मिळणारे अनुदान व निधीवर अवलंबून राहावे लागत आहे.अशा स्थितीत महानगरपालिकेस आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.शहरात भाजपाचे खासदार, शिवसेना व भाजपाचे असे दोन आमदार असून भाजपाची सत्ता असल्यामुळे अपेक्षित अनुदान, निधी मिळताना कोंडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर भरपूर निधी उपलब्ध करून देऊ. मात्र, तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती दिल्या, तर निधीची लूट करणाऱ्यांच्या खिशात तो जाऊ देणार नाही, असे स्पष्ट विधान फडणवीस यांनी जाहीर सभेत केले होते. त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर महापौर बसवला व शहराचा विकास झाला नाही, तर येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते.देशात भाजपाला अनुकूल वातावरण असताना भिवंडीतील बहुसंख्य मुस्लिम समाजाने काँग्रेसची साथ देऊन नवे संकेत दिले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याकडे आकृष्ट झालेला मुस्लिम गोमांसबंदी व ट्रिपल तलाक अशा मुद्द्यांमुळे तसेच भाजपा-रा.स्व. संघाच्या बेलगाम नेत्यांच्या वक्तव्यांनी पुन्हा काँग्रेसकडे वळला आहे, असे दिसत आहे.त्यामुळे पुन्हा धार्मिक राजकारणाची पोळी न पिकवता मुस्लिम समाजाचा विकास करून दाखवण्याचे व हाच भिवंडी पॅटर्न पुढील निवडणुकीत काँग्रेसला यश देईल, अशी बांधणी करावी लागेल, असे मुस्लिम समाजातील नेत्यांचेही मत आहे.