शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

बदलीपूर्वीच अडकल्या लाच प्रकरणात

By admin | Updated: June 21, 2017 04:31 IST

विजया जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरच त्यांनी उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा बाजार मांडला होता

पंकज पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : विजया जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरच त्यांनी उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा बाजार मांडला होता. उघड उघड पैसे मागून जमिनींच्या प्रकरणात न्याय देण्याचा धडाका त्यांनी लावला होता. या प्रकारामुळे अनेक तक्रारी आल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत आमदार किसन कथोरे यांनी महिनाभरापूर्वीच मुख्यंंत्र्यांना पत्र देऊन या भ्रष्ट्र अधिकाऱ्यांची बदलीची मागणी केली होती. या प्रकरणी निर्णय घेण्याची तयारी सरकार करत असतानाच लाचखोर जाधव या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्या. उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागाच्या कारभाराची जबाबदारी होती. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कामे चालतात ती जमिनीचे वाद मिटवण्याची. मात्र या वादांच्या प्रकरणातून आर्थिक लाभ मिळवण्याचा एक मोठा व्यवसाय उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयात सुरू होता. शेती आणि शेतीच्या मालकी हक्कासंदर्भातील अनेक वाद या कार्यालयात चालवले जात होते. तहसीलदार यांनी दिलेल्या निर्णयांना आव्हान देण्यासाठी शेतकरी या कार्यालयात दाद मागत होते. या ठिकाणी न्याय बुध्दीने निर्णय घेणे हे उपविभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. उपविभागीय अधिकाऱ्यांना न्यायाधीशाचे अधिकार प्राप्त होते. शेत जमिनीचे प्रकरण निकाली काढत असताना न्यायदेवतेच्या भूमिकेत राहण्याची जबाबदारी ही उपविभागीय अधिकारी जाधव यांची होती. मात्र त्यांनी ९ महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यापासून या कार्यालयात निकाल देण्यासाठी आर्थिक लाभाचा मार्ग अवलंबला. त्यांच्या या कार्यशैलीची कल्पना आल्यावर या कार्यालयातील एका नायब तहसीलदारांनी रजेवर जाणे पसंत केले. या कार्यालयात काम न करण्याचा निर्णय नायब तहसीलदारांनी घेतला होता. त्यामुळे गैरहजर असलेल्या या नायब तहसीलदाराच्या कामाची जबाबदारी ही उल्हासनगरचे नायब तहसीलदार विकास पवार यांच्यावर सोपवण्यात आली होती. पवार आणि जाधव यांची चांगली समेट बसली होती. पवार हे पूर्णपणे जाधव यांच्या आहारी गेल्याने त्या दोघांनी प्रकरणे बाहेर काढून संबंधितांशी आर्थिक व्यवहार करून न्याय देण्याचा सपाटा सुरू केला होता. या जोडीच्या कामाची आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची मोठी चर्चा जागेचे व्यवहार करणाऱ्यांमध्ये होती. शेतकरी आणि बिल्डर यांच्यातील वादात बिल्डरच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी मोठी रक्कम घेतली जात होती. या सर्व प्रकरणाची तक्रार अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कथोरे यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या आधारावर कथोरे यांनी लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवत जाधव यांच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार एक महिन्या आधीच केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर आपली बदली होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जाधव या सतत मंत्रालयात खेटा मारत होत्या. त्यांनी आपली बदली रोखण्याचे सर्वेतोपरी प्रयत्नही केले होते. मात्र आमदार कथोरे यांनी त्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांची २० जून रोजी भेटही घेतली होती. त्यामुळे जाधव यांची बदली निश्चित मानली जात होती. मात्र विजया यांच्या चुकीच्या कामांचा उच्चांक गाठला गेल्याने त्यांची बदली नव्हे तर त्यांना त्यांच्या कामाची शिक्षाच वाट्याला आली. बदली होण्याची शक्यता ज्या दिवशी निर्माण झाली त्याच्या एक दिवस आधीच त्यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केली. त्यांना साथ देणारे नायब तहसीलदार पवार हेही जाळ्यात अडकले.