शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

बदलीपूर्वीच अडकल्या लाच प्रकरणात

By admin | Updated: June 21, 2017 04:31 IST

विजया जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरच त्यांनी उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा बाजार मांडला होता

पंकज पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : विजया जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरच त्यांनी उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा बाजार मांडला होता. उघड उघड पैसे मागून जमिनींच्या प्रकरणात न्याय देण्याचा धडाका त्यांनी लावला होता. या प्रकारामुळे अनेक तक्रारी आल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत आमदार किसन कथोरे यांनी महिनाभरापूर्वीच मुख्यंंत्र्यांना पत्र देऊन या भ्रष्ट्र अधिकाऱ्यांची बदलीची मागणी केली होती. या प्रकरणी निर्णय घेण्याची तयारी सरकार करत असतानाच लाचखोर जाधव या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्या. उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागाच्या कारभाराची जबाबदारी होती. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कामे चालतात ती जमिनीचे वाद मिटवण्याची. मात्र या वादांच्या प्रकरणातून आर्थिक लाभ मिळवण्याचा एक मोठा व्यवसाय उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयात सुरू होता. शेती आणि शेतीच्या मालकी हक्कासंदर्भातील अनेक वाद या कार्यालयात चालवले जात होते. तहसीलदार यांनी दिलेल्या निर्णयांना आव्हान देण्यासाठी शेतकरी या कार्यालयात दाद मागत होते. या ठिकाणी न्याय बुध्दीने निर्णय घेणे हे उपविभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. उपविभागीय अधिकाऱ्यांना न्यायाधीशाचे अधिकार प्राप्त होते. शेत जमिनीचे प्रकरण निकाली काढत असताना न्यायदेवतेच्या भूमिकेत राहण्याची जबाबदारी ही उपविभागीय अधिकारी जाधव यांची होती. मात्र त्यांनी ९ महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यापासून या कार्यालयात निकाल देण्यासाठी आर्थिक लाभाचा मार्ग अवलंबला. त्यांच्या या कार्यशैलीची कल्पना आल्यावर या कार्यालयातील एका नायब तहसीलदारांनी रजेवर जाणे पसंत केले. या कार्यालयात काम न करण्याचा निर्णय नायब तहसीलदारांनी घेतला होता. त्यामुळे गैरहजर असलेल्या या नायब तहसीलदाराच्या कामाची जबाबदारी ही उल्हासनगरचे नायब तहसीलदार विकास पवार यांच्यावर सोपवण्यात आली होती. पवार आणि जाधव यांची चांगली समेट बसली होती. पवार हे पूर्णपणे जाधव यांच्या आहारी गेल्याने त्या दोघांनी प्रकरणे बाहेर काढून संबंधितांशी आर्थिक व्यवहार करून न्याय देण्याचा सपाटा सुरू केला होता. या जोडीच्या कामाची आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची मोठी चर्चा जागेचे व्यवहार करणाऱ्यांमध्ये होती. शेतकरी आणि बिल्डर यांच्यातील वादात बिल्डरच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी मोठी रक्कम घेतली जात होती. या सर्व प्रकरणाची तक्रार अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कथोरे यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या आधारावर कथोरे यांनी लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवत जाधव यांच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार एक महिन्या आधीच केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर आपली बदली होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जाधव या सतत मंत्रालयात खेटा मारत होत्या. त्यांनी आपली बदली रोखण्याचे सर्वेतोपरी प्रयत्नही केले होते. मात्र आमदार कथोरे यांनी त्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांची २० जून रोजी भेटही घेतली होती. त्यामुळे जाधव यांची बदली निश्चित मानली जात होती. मात्र विजया यांच्या चुकीच्या कामांचा उच्चांक गाठला गेल्याने त्यांची बदली नव्हे तर त्यांना त्यांच्या कामाची शिक्षाच वाट्याला आली. बदली होण्याची शक्यता ज्या दिवशी निर्माण झाली त्याच्या एक दिवस आधीच त्यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केली. त्यांना साथ देणारे नायब तहसीलदार पवार हेही जाळ्यात अडकले.