शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

बदलीपूर्वीच अडकल्या लाच प्रकरणात

By admin | Updated: June 21, 2017 04:31 IST

विजया जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरच त्यांनी उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा बाजार मांडला होता

पंकज पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : विजया जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरच त्यांनी उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा बाजार मांडला होता. उघड उघड पैसे मागून जमिनींच्या प्रकरणात न्याय देण्याचा धडाका त्यांनी लावला होता. या प्रकारामुळे अनेक तक्रारी आल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत आमदार किसन कथोरे यांनी महिनाभरापूर्वीच मुख्यंंत्र्यांना पत्र देऊन या भ्रष्ट्र अधिकाऱ्यांची बदलीची मागणी केली होती. या प्रकरणी निर्णय घेण्याची तयारी सरकार करत असतानाच लाचखोर जाधव या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्या. उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागाच्या कारभाराची जबाबदारी होती. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कामे चालतात ती जमिनीचे वाद मिटवण्याची. मात्र या वादांच्या प्रकरणातून आर्थिक लाभ मिळवण्याचा एक मोठा व्यवसाय उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयात सुरू होता. शेती आणि शेतीच्या मालकी हक्कासंदर्भातील अनेक वाद या कार्यालयात चालवले जात होते. तहसीलदार यांनी दिलेल्या निर्णयांना आव्हान देण्यासाठी शेतकरी या कार्यालयात दाद मागत होते. या ठिकाणी न्याय बुध्दीने निर्णय घेणे हे उपविभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. उपविभागीय अधिकाऱ्यांना न्यायाधीशाचे अधिकार प्राप्त होते. शेत जमिनीचे प्रकरण निकाली काढत असताना न्यायदेवतेच्या भूमिकेत राहण्याची जबाबदारी ही उपविभागीय अधिकारी जाधव यांची होती. मात्र त्यांनी ९ महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यापासून या कार्यालयात निकाल देण्यासाठी आर्थिक लाभाचा मार्ग अवलंबला. त्यांच्या या कार्यशैलीची कल्पना आल्यावर या कार्यालयातील एका नायब तहसीलदारांनी रजेवर जाणे पसंत केले. या कार्यालयात काम न करण्याचा निर्णय नायब तहसीलदारांनी घेतला होता. त्यामुळे गैरहजर असलेल्या या नायब तहसीलदाराच्या कामाची जबाबदारी ही उल्हासनगरचे नायब तहसीलदार विकास पवार यांच्यावर सोपवण्यात आली होती. पवार आणि जाधव यांची चांगली समेट बसली होती. पवार हे पूर्णपणे जाधव यांच्या आहारी गेल्याने त्या दोघांनी प्रकरणे बाहेर काढून संबंधितांशी आर्थिक व्यवहार करून न्याय देण्याचा सपाटा सुरू केला होता. या जोडीच्या कामाची आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची मोठी चर्चा जागेचे व्यवहार करणाऱ्यांमध्ये होती. शेतकरी आणि बिल्डर यांच्यातील वादात बिल्डरच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी मोठी रक्कम घेतली जात होती. या सर्व प्रकरणाची तक्रार अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कथोरे यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या आधारावर कथोरे यांनी लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवत जाधव यांच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार एक महिन्या आधीच केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर आपली बदली होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जाधव या सतत मंत्रालयात खेटा मारत होत्या. त्यांनी आपली बदली रोखण्याचे सर्वेतोपरी प्रयत्नही केले होते. मात्र आमदार कथोरे यांनी त्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांची २० जून रोजी भेटही घेतली होती. त्यामुळे जाधव यांची बदली निश्चित मानली जात होती. मात्र विजया यांच्या चुकीच्या कामांचा उच्चांक गाठला गेल्याने त्यांची बदली नव्हे तर त्यांना त्यांच्या कामाची शिक्षाच वाट्याला आली. बदली होण्याची शक्यता ज्या दिवशी निर्माण झाली त्याच्या एक दिवस आधीच त्यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केली. त्यांना साथ देणारे नायब तहसीलदार पवार हेही जाळ्यात अडकले.