शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महानगरांवरील भार कमी करावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : गावं गिळंकृत करून शहरं फुगत चालली आहेत. खेडी ओस पडत असून, शहरे वाढत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बदलापूर : गावं गिळंकृत करून शहरं फुगत चालली आहेत. खेडी ओस पडत असून, शहरे वाढत आहेत. यामुळे भारत आणि इंडिया ही दरी वाढत असून, ती कमी करण्यासाठी महानगरांवरील भार कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विकासाची नवीन बीजे विकसित करण्याची गरज आहे. अशा सुदृढ विकासाची मुहूर्तमेढ आपण बदलापूर - अंबरनाथ अशा शहरांत रोवूया, असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या नगरपरिषद प्रशासनाचे संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी मंगळवारी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, युवाराज प्रतिष्ठान आणि साहित्य गौरव ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ''निमशहरी विभागांचे महाराष्ट्राचे व्हिजन'' या विषयावर डॉ. कुलकर्णी यांचे व्याख्यान मंगळवारी सायंकाळी साहित्य गौरव ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेडी स्वयंपूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. आतापर्यंत आपण दोन महायुद्धे पहिली, महापूर आणि नैसर्गिक आपत्ती पाहिली, कोरोनाची महामारी पाहिली. यात सर्वांत जास्त नुकसान महानगरांमध्ये झाले आहे. कोरोनाच्या काळात आदिवासी वस्त्यांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण नगण्य आहे. यावरून धडा घेऊन आपण आपल्या शहरांचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. लोकसंख्येच्या आधारावर विकास आराखडा तयार करणे योग्य नाही.

राजकारण हे आपले काम नाही, राजकारण हा आपला विषय नाही, ही मानसिकता अयोग्य आहे. चांगल्या माणसांनी राजकारणात येणे गरजेचे आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. चांगली, हुशार, अभ्यासू माणसे राजकारणात आणि प्रशासनात येणे ही काळाची गरज आहे. चांगले मुद्दे आणि चांगले विचार यावर चर्चा होणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण राज्याचा अभ्यास दौरा सुरू केला आहे. महानगरांवरील भार कमी करून मध्यम शहर विकसित करणे आवश्यक आहे. तोच या दौऱ्याचा हेतू आहे. अंबरनाथ आणि बदलापूरसारख्या पालिका तयार करतांना त्यामध्ये चांगल्या नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करूया. सध्या ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगचा जमाना आहे. त्याचा फायदा घेत आपल्या पालिकांचे उत्पन्न कसे वाढेल, याचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे, असे कुलकर्णी म्हणाले.

.............

वाचली