शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महानगरांवरील भार कमी करावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : गावं गिळंकृत करून शहरं फुगत चालली आहेत. खेडी ओस पडत असून, शहरे वाढत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बदलापूर : गावं गिळंकृत करून शहरं फुगत चालली आहेत. खेडी ओस पडत असून, शहरे वाढत आहेत. यामुळे भारत आणि इंडिया ही दरी वाढत असून, ती कमी करण्यासाठी महानगरांवरील भार कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विकासाची नवीन बीजे विकसित करण्याची गरज आहे. अशा सुदृढ विकासाची मुहूर्तमेढ आपण बदलापूर - अंबरनाथ अशा शहरांत रोवूया, असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या नगरपरिषद प्रशासनाचे संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी मंगळवारी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, युवाराज प्रतिष्ठान आणि साहित्य गौरव ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ''निमशहरी विभागांचे महाराष्ट्राचे व्हिजन'' या विषयावर डॉ. कुलकर्णी यांचे व्याख्यान मंगळवारी सायंकाळी साहित्य गौरव ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेडी स्वयंपूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. आतापर्यंत आपण दोन महायुद्धे पहिली, महापूर आणि नैसर्गिक आपत्ती पाहिली, कोरोनाची महामारी पाहिली. यात सर्वांत जास्त नुकसान महानगरांमध्ये झाले आहे. कोरोनाच्या काळात आदिवासी वस्त्यांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण नगण्य आहे. यावरून धडा घेऊन आपण आपल्या शहरांचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. लोकसंख्येच्या आधारावर विकास आराखडा तयार करणे योग्य नाही.

राजकारण हे आपले काम नाही, राजकारण हा आपला विषय नाही, ही मानसिकता अयोग्य आहे. चांगल्या माणसांनी राजकारणात येणे गरजेचे आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. चांगली, हुशार, अभ्यासू माणसे राजकारणात आणि प्रशासनात येणे ही काळाची गरज आहे. चांगले मुद्दे आणि चांगले विचार यावर चर्चा होणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण राज्याचा अभ्यास दौरा सुरू केला आहे. महानगरांवरील भार कमी करून मध्यम शहर विकसित करणे आवश्यक आहे. तोच या दौऱ्याचा हेतू आहे. अंबरनाथ आणि बदलापूरसारख्या पालिका तयार करतांना त्यामध्ये चांगल्या नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करूया. सध्या ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगचा जमाना आहे. त्याचा फायदा घेत आपल्या पालिकांचे उत्पन्न कसे वाढेल, याचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे, असे कुलकर्णी म्हणाले.

.............

वाचली