शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांचे एक हजार कोटींचे प्रकल्प ठप्प; केडीएमसीत दुसऱ्यांदा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:23 IST

घनकच-याचे व्यवस्थापन न करणा-या राज्यात नव्या बांधकामांवर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बिल्डरांना दुसºयांदा बंदीचा सामना करावा लागणार आहे

- मुरलीधर भवारकल्याण : घनकच-याचे व्यवस्थापन न करणा-या राज्यात नव्या बांधकामांवर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बिल्डरांना दुसºयांदा बंदीचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदीचे आदेश दिले होते. बंदीच्या नव्या आदेशांमुळे कल्याण-डोंबिवलीतील बिल्डरांना जवळपास ५०० कोटी रुपयांचा फटका बसणार असून एक हजार कोटींचे सुरू असलेले प्रकल्प ठप्प होणार आहेत. त्याचबरोबर ग्राहकांना वेळेत घरे देणे शक्य होणार नसल्याची माहिती एमसीएचआयचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे.अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, महापालिकेने घनकचºयाचा प्रकल्प राबवण्यात दिरंगाई केल्याने उच्च न्यायालयाने एप्रिल २०१५ मध्ये महापालिका हद्दीत नव्या इमारतीच्या बांधकामांची परवानगी देण्यावर स्थगिती आणली होती. ही स्थगिती २५ एप्रिल २०१६ रोजी उठवण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील नव्या बांधकामांवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बिल्डर व्यवसाय धोक्यात आला आहे. भाजपा सरकारच्या नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले बिल्डर त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, तोच पुन्हा न्यायालयाच्या बंदीआदेशामुळे बिल्डर अडचणीत आले आहेत. राज्य सरकारने रेरा कायदा केला आहे. या कायद्यानुसार बिल्डरांनी ग्राहकांना वेळेत घरे बांधून देणे बंधनकारक आहे. बंदीमुळे ग्राहकांची डेडलाइन बिल्डरांना पाळता येणार नाही. बिल्डरांनी बँकांकडून १२ ते १३ टक्के दराच्या व्याजाचे कर्ज घेऊन प्रकल्प सुरू केले आहेत. घरे बांधून तयार झाली नाही, ती विकली गेली नाही, तर बिल्डर कर्ज कसे काय फेडणार, असा प्रश्न आहे. २०१५-१६ या वर्षभराच्या कालावधीत बिल्डरांना २०० कोटींपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. सरकारचा महसूल बुडाला. महापालिकेने घनकचरा प्रकल्प उभारण्यात दिरंगाई केल्याबद्दल महापालिकेवर काय कारवाई झाली, याचा विचार होणे आवश्यक आहे. बिल्डर व्यवसायावर छोटेमोठे १२६ उद्योग अवलंबून आहेत. ते देखील गोत्यात येतील.बड्या इमारतींत कचºयापासून खताचे प्रकल्प राबवण्यास बिल्डर तयार आहेत. मात्र, अधिकाºयांची अनास्था आहे. त्यांच्या अनास्थेचा भुर्दंड बिल्डरांना सहन करावा लागत आहे.डोंबिवलीत बंदी लागू झाली, तेव्हा उच्च न्यायालयातून याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांची याचिका हरित लवादाकडे वर्ग केली गेली. घनकचरा प्रकल्प उभारला जात नसल्याने उच्च न्यायालयाने दिलेले बांधकामबंदीचे आदेश लवादाने पुनरुज्जीवित करावेत, अशी मागणी गोखले यांनी केली होती. आता एका शहरावर नव्हे तर राज्यावर बंदीची वेळ आली.बेकायदाबांधकामांवरबंदी कुठे?बेकायदा इमारती, चाळी उभ्या करणारे भूमाफिया व काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकीय कार्यकर्ते यांच्या बांधकामांवर बंदीचा सुतराम परिणाम होत नाही. बंदी लागू होण्यापूर्वीच्या तारखांनी अर्ज व मंजुºया मिळाल्याचे बनावट दस्तावेज तयार करून किंवा मंजुरी न घेताच ते बेकायदा इमले चढवतील व अधिकृत घरांची टंचाई असल्याने व दर वाढल्याने सर्वसामान्य गरजू लोक अशा बेकायदा इमारतींमध्ये घरे विकत घेण्याचा धोका काही पटींत वाढणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका