शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

अधिकाऱ्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने बिल्डरची एबीसीकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST

कल्याण : दावडी येथील बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणात अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप बिल्डरने केला होता. या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या विरोधात ...

कल्याण : दावडी येथील बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणात अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप बिल्डरने केला होता. या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याने बिल्डरने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (एसीबी) धाव घेत चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित बिल्डरची सुनावणी झाली असून, चौकशी सुरू आहे. बिल्डरने ठोस पुरावा सादर केल्यास दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

केडीएमसीने काही दिवसांपूर्वी दावडी परिसरातील डीपी रस्त्याच्या आड येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर कारवाई केली होती. परंतु, या इमारतीवर कारवाई करू नये, यासाठी अधिकारी अनंत कदम आणि दीपक शिंदे यांनी आपल्याकडून पैसे घेतल्याचा आरोप बिल्डर मुन्ना सिंग यांनी केला होता. तसेच एका हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांसोबतचे चर्चेचे सीसीटीव्ही फुटेज बिल्डरने सादर केले होते.

अधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक लाख रुपये आणि आयुक्तांच्या नावे २५ लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केल्यावर सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. दोन्ही अधिकाऱ्यांची त्यांनी चौकशी केली. त्याचबरोबर बिल्डरची सुनावणीही घेतली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात प्रशासनाकडून हात आखडता घेतला जात असल्याचा आरोप बिल्डरने करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही तक्रार करीत चौकशीची मागणी केली होती.

‘बिल्डरने पुरावे सादर करावेत’

याप्रकरणी सूर्यवंशी यांनी सांगितले की, ‘या प्रकरणात चौकशी सुरू आहे. १७ सप्टेंबरला समिती अहवाल सादर करणार आहे. बिल्डरने केलेल्या आरोपानुसार त्याच्याकडे असलेले ठोस पुरावे त्याने समितीला सादर करावे. बिल्डरची पहिली सुनावणी झाली आहे. दुसऱ्या सुनावणीसाठी त्याला कळविले आहे. ठोस पुरावा सादर केल्यास तथ्य आढळून आल्यास दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल. बिल्डर कारवाई टाळण्यासाठी असे आरोप करतात. मात्र, मनपाने मागील दीड वर्षात ६२० बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. ही कारवाई या पुढेही सुरूच राहील.’

----------------