शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसयूपी’ही भ्रष्टाचाराचीच गटारगंगा

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा बीएसयूपी प्रकल्प घोटाळ्याच्या आरोपावरून नेहमीच चर्चेत राहिला. दरम्यान, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दाखल केलेल्या

- प्रशांत माने,  कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिकेचा बीएसयूपी प्रकल्प घोटाळ्याच्या आरोपावरून नेहमीच चर्चेत राहिला. दरम्यान, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून अनियमितता झाल्याचे चव्हाट्यावर आले असून या प्रकल्पाला घोटाळ्यांची किनार लाभल्याचेही स्पष्ट झाले आहे.शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावी तसेच गरिबांना घरकुले मिळावीत, या उद्देशाने केंद्र सरकारने बीएसयूपी योजना राबवली. केडीएमसी हद्दीत पहिल्या टप्प्यात १३ हजार घरे उभारली जाणार होती. आठ ठिकाणी प्रकल्पांचे कामही सुरू झाले होते. परंतु, सध्या डोंबिवलीतील आंबेडकरनगरचा प्रकल्प वगळता बहुतांश ठिकाणचे प्रकल्प पूर्णत्वाला आलेले नाहीत. जे पूर्णावस्थेत आहेत, त्या ठिकाणी कायदेशीर अडचणी आल्याने लाभार्थ्यांना घराचा ताबा देणे शक्य झालेले नाही. दरम्यान, केडीएमसीची बीएसयूपी योजना सुरुवातीपासूनच वादात सापडली. जागा ताब्यात नसताना नगररचना विभागाने बांधकामासाठी लागणारी आयओडी(परवानगी) देणे, प्रकल्पांच्या जागेचा एनए नसणे, वन विभागाच्या जागेवर प्रकल्पाचे काम सुरू करणे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगीनसणे, प्रकल्पातील अशा अनेक अनियमितता सुधाकर नांगनुरे समितीच्या अहवालात उघड झाल्या. तसेच ही घरे म्हणजे बेकायदा बांधकाम असल्याचा आरोपही केला गेला. योजना राबवण्याआधी लाभार्थ्यांची संख्या निश्चित असावी, असे बंधनकारक असूनही याकडे दुर्लक्ष केले गेले. त्याचबरोबर घरांचे काम सुरू झाल्यावर पाच टक्के आगाऊ रक्कम देण्याचा नियम असताना महापालिका प्रशासनाने १० टक्के आगाऊ रकमेची खिरापत वाटली. लाभार्थी ठरवताना बोगस यादी तयार करून त्यांना घरभाड्याचा लाभ मिळवून दिल्याचा आरोपही करण्यात आला. चार जनहित याचिका : एकंदरीतच आढावा घेता या प्रकल्पाच्या अनियमिततेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात चार जनहित याचिका दाखल झाल्या. यात जागरूक नागरिक कौस्तुभ गोखले, माजी खासदार आनंद परांजपे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव आणि माजी नगरसेवक तात्या यांच्या याचिका आहेत. सखोल चौकशीची मागणीअनियमिततेप्रकरणी तत्कालीन आयुक्त, स्थायी समिती सभापती, सदस्य, नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी आणि समंत्रक यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्याची मागणी माजी खासदार परांजपे यांनी केली होती. दरम्यान, शुक्रवारी अधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे हे हिमनगाचे टोक आहे. सखोल चौकशी केल्यानंतरच, यामागचे कर्तेकरविते समोर येतील, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी केली आहे.