शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणांनी मारवाडी, गुजरातींचा आदर्श ठेवावा

By admin | Updated: October 4, 2016 02:30 IST

प्रत्येक व्यक्तीने माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे देशातील गरीब, दिव्यांग तसेच होतकरू तरुणांसाठी मग ते कोणीही असोत

डोंबिवली : प्रत्येक व्यक्तीने माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे देशातील गरीब, दिव्यांग तसेच होतकरू तरुणांसाठी मग ते कोणीही असोत, एकत्र येणे हे मला जास्त गरजेचे वाटते, असे मत व्यक्त करतानाच सुप्रसिद्ध उद्योगपती व ‘विको’चे संजीव पेंढरकर यांनी, ब्राह्मण समाजाने मारवाडी आणि गुजराती यांचा आदर्श ठेवावा, असा मोलाचा सल्ला दिला आहे.ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकासाकरिता सुरु असलेल्या एकत्रिकरणाबाबत पेंढरकर यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपली भूमिका एकांगी असू नये. बुद्धी कौशल्यावर भर देऊन त्या व्यक्तीस सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बुद्धिजीवी लोकांनी एकत्र यावे, यात दुमत नाही. सर्वत्र समानता आणण्यासाठी निसर्गाने मानवाची निर्मिती केली आहे, याचे विस्मरण होऊ न देता एकत्रिकरण होणे, हे कधीही चांगलेच आहे. आपल्या मनातील वेदना आणि वास्तव मांडण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असले तरी तो मार्ग मात्र विधायक असायला हवा.’पेंढरकर पुढे म्हणाले की, ‘गरीब मग तो कुणीही असो, त्याच्याकडे कौशल्य आहे, पण त्याला जर मजबूत हातांची आवश्यकता असेल, तर तो देण्यासाठी जे काही करण्यासारखे आहे, ते जरूर करावेच. पण त्यासाठी कुठलीही बंधने असायला नकोत. दुसरे म्हणजे केवळ नोकरीच्या मागे न लागता तरुणांना उद्योजकतेकडे आकर्षित करण्यासाठी काही ध्येयधोरणे राबवावी. त्यासाठी ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील, त्या जरूर करून द्याव्यात. ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना राबवल्यास आपले परकीय चलनही वाचेल आणि जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) वाढेल. मात्र, त्यासाठी काही उपाययोजना जसे बँक कर्ज, सहजतेने कर्ज, परवाना या गोष्टींसाठी जाणत्या व्यक्तींनी समाजाला जरूर मदत करावी. जेणेकरून त्या व्यक्तींचा आत्मविश्वास उंचावेल आणि त्यांच्याकरीता पुढील वाटचाल सुकर होईल’. (प्रतिनिधी)