शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

ब्राह्मणांनी मारवाडी, गुजरातींचा आदर्श ठेवावा

By admin | Updated: October 4, 2016 02:30 IST

प्रत्येक व्यक्तीने माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे देशातील गरीब, दिव्यांग तसेच होतकरू तरुणांसाठी मग ते कोणीही असोत

डोंबिवली : प्रत्येक व्यक्तीने माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे देशातील गरीब, दिव्यांग तसेच होतकरू तरुणांसाठी मग ते कोणीही असोत, एकत्र येणे हे मला जास्त गरजेचे वाटते, असे मत व्यक्त करतानाच सुप्रसिद्ध उद्योगपती व ‘विको’चे संजीव पेंढरकर यांनी, ब्राह्मण समाजाने मारवाडी आणि गुजराती यांचा आदर्श ठेवावा, असा मोलाचा सल्ला दिला आहे.ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकासाकरिता सुरु असलेल्या एकत्रिकरणाबाबत पेंढरकर यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपली भूमिका एकांगी असू नये. बुद्धी कौशल्यावर भर देऊन त्या व्यक्तीस सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बुद्धिजीवी लोकांनी एकत्र यावे, यात दुमत नाही. सर्वत्र समानता आणण्यासाठी निसर्गाने मानवाची निर्मिती केली आहे, याचे विस्मरण होऊ न देता एकत्रिकरण होणे, हे कधीही चांगलेच आहे. आपल्या मनातील वेदना आणि वास्तव मांडण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असले तरी तो मार्ग मात्र विधायक असायला हवा.’पेंढरकर पुढे म्हणाले की, ‘गरीब मग तो कुणीही असो, त्याच्याकडे कौशल्य आहे, पण त्याला जर मजबूत हातांची आवश्यकता असेल, तर तो देण्यासाठी जे काही करण्यासारखे आहे, ते जरूर करावेच. पण त्यासाठी कुठलीही बंधने असायला नकोत. दुसरे म्हणजे केवळ नोकरीच्या मागे न लागता तरुणांना उद्योजकतेकडे आकर्षित करण्यासाठी काही ध्येयधोरणे राबवावी. त्यासाठी ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील, त्या जरूर करून द्याव्यात. ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना राबवल्यास आपले परकीय चलनही वाचेल आणि जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) वाढेल. मात्र, त्यासाठी काही उपाययोजना जसे बँक कर्ज, सहजतेने कर्ज, परवाना या गोष्टींसाठी जाणत्या व्यक्तींनी समाजाला जरूर मदत करावी. जेणेकरून त्या व्यक्तींचा आत्मविश्वास उंचावेल आणि त्यांच्याकरीता पुढील वाटचाल सुकर होईल’. (प्रतिनिधी)