शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

ठामपा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच दोघांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:46 IST

ठाणे : रहिवाशांच्या दुर्लक्षामुळेच राबोडी इमारत दुर्घटना घडल्याचे सांगून ठाणे महापालिकेने यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केल्याची ...

ठाणे : रहिवाशांच्या दुर्लक्षामुळेच राबोडी इमारत दुर्घटना घडल्याचे सांगून ठाणे महापालिकेने यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केल्याची टीका करून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या दुर्घटनेस केवळ महापालिका अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्या दुर्लक्षामुळेच दोघांचे बळी गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राबोडी क्र.१ मधील खत्री इमारतीचा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब थेट पहिल्या मजल्यापर्यंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन रहिवाशांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. रविवारी झालेल्या या दुर्घटनेची माहिती मिळताच केळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांशी संवाद साधून मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तर उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करून रहिवाशांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या.

खत्री इमारत दुर्घटनेप्रकरणी महापालिकेची जबाबदारी केवळ नोटीस बजावण्यापुरती नसून धोकादायक इमारतींतील रहिवाशांचा जीव वाचविण्यासाठी वेळीच कार्यवाही करण्याची गरजसुद्धा आहे. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दोन रहिवाशांचा बळी गेला आहे. वेळीच इमारत दुरुस्त करण्यासाठी रहिवाशांना इमारत खाली करण्यास सांगितले असते तर घटना टाळता आली असती, असे ते म्हणाले.

ठाणे शहरात अनेक धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नसून पुनर्वसन आणि पुनर्बांधणीबाबत शासन ठोस निर्णय घेत नाही, असा आरोपही त्यांनी केला.