शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

इंधन दरवाढीविरोधात पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

ठाणे : सातत्याने वाढणारे पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस ...

ठाणे : सातत्याने वाढणारे पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे जिल्ह्यातील ३६ हजार वाहतूकदार चालक, मालकांनी आपापल्या वाहनावर काळे झेेंडे लावून व दंडावर काळी फीत बांधून, काळा दिवस पाळून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. येत्या ३१ दिवसात भाववाढ आटोक्यात आली नाही, तर ऑगस्टमध्ये चक्का जाम करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

देशात कोरोनामुळे जे काही आर्थिक संकट ओढावले आहे, त्यामध्ये वाहतूकदारांचे कंबरडेच मोडले आहे. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारच्या वाहतूक व्यवसायातील जाचक अटी व सतत होणारी इंधन दरवाढ, विम्याची दरवाढ, वाहनावरील घेतलेले कर्जाचे हप्ते भरले नाहीत, म्हणून दुप्पट व्याजासह बँकेच्या खासगी वसुली एजन्सीकडून होणारा जाचक त्रास... या सर्व गोष्टींमुळे वाहतूकदार संपण्याच्या मार्गावर आहे. केंद्र, राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळा दिवस पाळला.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसला ट्रक टेम्पो संघटना, लॉरी असोसिएशन, महाराष्ट्र आरटीओ प्रतिनिधी संघासह ३६ संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना इमेलद्वारे निवेदन दिले आहे. मागण्यांसंदर्भात ३१ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील ३६ हजार आणि देशभरातील ९६ हजार वाहतूकदार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष भटेसिंग राजपूत यांनी दिला आहे.