शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने वापरला आयुक्तांचा ‘चेहरा’

By admin | Updated: February 13, 2017 05:01 IST

युती तुटल्यानंतर मतदारांपुढे जाण्यासाठी भाजपाकडे ठाण्यात सर्वांना अपील होईल, असा चांगला चेहरा नव्हता. सत्तेत सहभागी असल्याने स्वतंत्रपणे सांगता येती

ठाणे : युती तुटल्यानंतर मतदारांपुढे जाण्यासाठी भाजपाकडे ठाण्यात सर्वांना अपील होईल, असा चांगला चेहरा नव्हता. सत्तेत सहभागी असल्याने स्वतंत्रपणे सांगता येतील, असे विकासाचे मुद्देही नव्हते. त्यामुळे कोणत्या आधारावर आपली ताकद वाढवायची, असा पेच होता. परंतु, ठाण्याचा चेहरामोहरा बदलणारे, दलालांचे कंबरडे मोडणारे, रस्ता रुंदीकरणाचा धडाका लावत शहराच्या विकासाला दिशा देणारे आणि अनेक नवीन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची प्रतिमा आणि त्यांचे काम हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणत भाजपाने त्याचा पुरेपूर वापर करण्यास सुरुवात केली. वस्तुत:, प्रशासकीय अधिकारी असल्याने पक्षातीत असलेला हा चेहरा भाजपाने आपल्या प्रचारात आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि ठाण्याच्या भाषणात त्यांच्या नावाचा थेट उल्लेख करत त्यांच्या कामाला पसंतीची पावती दिली. तसेच भाजपाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातही जयस्वाल यांच्या कामांचा उल्लेख करत त्यावर पसंतीची मोहोर उमटवली. बकाल होत असलेल्या ठाण्याला दिशा देण्यासाठी, नागरी प्रश्न, अनधिकृत बांधकामे, रस्त्यालगतची बांधकामे, वाहतूककोंडी फोडणे आणि स्मार्ट ठाण्यासाठी अनेक नव्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज होती. आयुक्तपदी येताच धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असलेले संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. स्टेशन रोड ते जांभळीनाका, पोखरण एक-दोन, शास्त्रीनगर ते हत्तीपूल, घोडबंदर सर्व्हिस रोड, बाळकुम सर्व्हिस रोड, कळवा, मुंब्रा येथील अरुंद रस्ते मोठे केले. ती करताना रस्ते, फुटपाथ अडवणारे गॅरेजवाले, बार, लेडिज बार यांच्यावर कारवाई केली. पारसिकचा खाडीकिनारा मोकळा केला. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक झाले. यावर न थांबता विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प, वायफाय सेवा, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूककोंडी फोडण्यासाठी विविध योजना, हायटेक शिक्षण प्रणाली, नगरसेवकांची मोडून काढलेली दहशत आणि बाधितांचे पुनर्वसन यामुळे जयस्वाल सामान्यांच्या गळ्यातील ताईतच बनले. अनेक ठिकाणी त्यांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. स्वच्छ भारत अभियान, ब्रँडिंग ठाणे, ठाण्याला वेगळी ओळख, भिंती रंगवा अभियानामुळे शहर सुधारू लागले.(प्रतिनिधी)