शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भाजपाने वापरला आयुक्तांचा ‘चेहरा’

By admin | Updated: February 13, 2017 05:01 IST

युती तुटल्यानंतर मतदारांपुढे जाण्यासाठी भाजपाकडे ठाण्यात सर्वांना अपील होईल, असा चांगला चेहरा नव्हता. सत्तेत सहभागी असल्याने स्वतंत्रपणे सांगता येती

ठाणे : युती तुटल्यानंतर मतदारांपुढे जाण्यासाठी भाजपाकडे ठाण्यात सर्वांना अपील होईल, असा चांगला चेहरा नव्हता. सत्तेत सहभागी असल्याने स्वतंत्रपणे सांगता येतील, असे विकासाचे मुद्देही नव्हते. त्यामुळे कोणत्या आधारावर आपली ताकद वाढवायची, असा पेच होता. परंतु, ठाण्याचा चेहरामोहरा बदलणारे, दलालांचे कंबरडे मोडणारे, रस्ता रुंदीकरणाचा धडाका लावत शहराच्या विकासाला दिशा देणारे आणि अनेक नवीन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची प्रतिमा आणि त्यांचे काम हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणत भाजपाने त्याचा पुरेपूर वापर करण्यास सुरुवात केली. वस्तुत:, प्रशासकीय अधिकारी असल्याने पक्षातीत असलेला हा चेहरा भाजपाने आपल्या प्रचारात आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि ठाण्याच्या भाषणात त्यांच्या नावाचा थेट उल्लेख करत त्यांच्या कामाला पसंतीची पावती दिली. तसेच भाजपाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातही जयस्वाल यांच्या कामांचा उल्लेख करत त्यावर पसंतीची मोहोर उमटवली. बकाल होत असलेल्या ठाण्याला दिशा देण्यासाठी, नागरी प्रश्न, अनधिकृत बांधकामे, रस्त्यालगतची बांधकामे, वाहतूककोंडी फोडणे आणि स्मार्ट ठाण्यासाठी अनेक नव्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज होती. आयुक्तपदी येताच धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असलेले संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. स्टेशन रोड ते जांभळीनाका, पोखरण एक-दोन, शास्त्रीनगर ते हत्तीपूल, घोडबंदर सर्व्हिस रोड, बाळकुम सर्व्हिस रोड, कळवा, मुंब्रा येथील अरुंद रस्ते मोठे केले. ती करताना रस्ते, फुटपाथ अडवणारे गॅरेजवाले, बार, लेडिज बार यांच्यावर कारवाई केली. पारसिकचा खाडीकिनारा मोकळा केला. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक झाले. यावर न थांबता विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प, वायफाय सेवा, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूककोंडी फोडण्यासाठी विविध योजना, हायटेक शिक्षण प्रणाली, नगरसेवकांची मोडून काढलेली दहशत आणि बाधितांचे पुनर्वसन यामुळे जयस्वाल सामान्यांच्या गळ्यातील ताईतच बनले. अनेक ठिकाणी त्यांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. स्वच्छ भारत अभियान, ब्रँडिंग ठाणे, ठाण्याला वेगळी ओळख, भिंती रंगवा अभियानामुळे शहर सुधारू लागले.(प्रतिनिधी)