शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

उल्हासनगर महापालिकेच्या तोडक कारवाईविरोधात भाजपा-रिपाइंचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 17:50 IST

महापालिका प्रशासनाच्या आश्वासनावर संतुष्ट, नागरिकांना दिलासा, उल्हासनगरात भाजप व रिपाइं मोर्चाचे गोलमैदानात विसर्जन 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेच्या आश्वासनानंतर भाजप-रिपाइं नेत्यांनी आयोजित केलेला मोर्चा गोल मैदानात विसर्जन केल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. धोकादायक ११६ इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिका करणार असून अन्य इमारतीच्या स्ट्रॅक्टरल ऑडिटसाठी १५ जनाचें सरंचनात्मक अभियंता पॅनेलची नियुक्ती करण्यात आले. तसेच विस्थापित होणाऱ्या नागरिकांची पर्यायी व्यवस्था केल्याची महिती महापौर लिलाबाई अशान यांनी दिली. 

उल्हासनगरात गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारत दुर्घटनेचा धसका महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी घेऊन सरसगट १० वर्ष जुन्या तब्बल १५०० जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याच्या नोटिसा पाठविल्या, तसेच महापालिकेने जाहीर केलेल्या अतिधोकादायक यादीतील इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू करून, काही इमारतीचे वीज व पाणी पुरवठा खंडित केला. याप्रकारने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. पाडकाम कारवाईत इमारती मधून बेघर व विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था महापालिकेकडे नसतांना, कोरोना काळात शेकडो नागरिकांना विस्थापित करण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारला गेला. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी व महापौर लिलाबाई अशान याप्रकरणी टीकेचे धनी बनले. महापालिकेच्या एकूनच कारवाईच्या निषेधार्थ भाजप-रिपाईने एकत्र येत शुक्रवारी गोलमैदान ते प्रांत कार्यालय दरम्यान मोर्चाची हाक दिल्याने महापालिकेला जाग आली. 

भाजप-रिपाईच्या मोर्चाच्या पाश्वभूमीवर महापौर लिलाबाई अशान, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यानी गुरवारी बैठक घेवून अनेक निर्णय घेतले. ११६ धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिका करणार, अन्य इमारतीच्या स्ट्रॅक्टरल ऑडिट साठी एकून १५ सरंचनात्मक अभियंत्यांची पॅनल तयार करणे, धोकादायक इमारती मधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून भिवंडी येथील टाटा निमंत्रण येथील ५०० प्लॉट तात्पुरते स्वरूपात घेऊन तात्पुरता निवासी निवारा केंद्र उभारणे, शाळा, मंदिर, समाजमंदिर आदी ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. धोकादायक व अनधिकृत बांधकामे नियमाधिन करण्याची प्रक्रिया सुरू करणे. असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

आयुक्तांना अतिविश्वास नडलाशहरातील इमारतीचा स्लॅब पडल्याच्या पाश्वभूमीवर आयुक्तांनी महापौर, उपमहापौर, आमदार, नगरसेवक यांच्यासोबत चर्चा न करता, १० वर्ष जुन्या १५०० पेक्षा जास्त जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याच्या नोटिसा दिल्या. तसेच सन १९९४ ते ९८ दरम्यानच्या इमारतीचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतींना १४ दिवसात स्ट्रॅक्टरल ऑडिटचे आदेश दिले. तर काही इमारतीचे पाणी व वीज पुरवठा खंडित करून इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली. यामुळे नागरिकांसह राजकीय नेत्यांत रोष निर्माण झाला. आयुक्तांच्या अतिविश्वासामुळे ऐन कोरोना काळात शहरात ही परिस्थिती ओढविल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.