शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांनी सामान्यांची उपेक्षा करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : जनसंघाच्या स्थापनेपासून दोनदा खासदार राहिलेले स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी पक्षाची अत्यंत खडतर काळात उभारणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : जनसंघाच्या स्थापनेपासून दोनदा खासदार राहिलेले स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी पक्षाची अत्यंत खडतर काळात उभारणी केली. त्यांच्या योगदानामुळे आज भाजप दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली चांगली सत्ता चालवत आहे. त्यामुळे अनेकांना विविध संधी मिळत आहेत. नेते मंडळींनी त्यांना पद मिळाले की सामान्यांची उपेक्षा करू नये. सामान्यांची जाण ठेवणारा भाजप हा सध्या एकमेव पक्ष आहे. त्यामुळे पक्ष बळकटीचा संकल्प कार्यकर्त्यांनी रामभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करावा, असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी केले.

माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्या आयोजनाखाली म्हाळगी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी प्रगती महाविद्यालयात हे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मोडक यांनी रामभाऊंचा जीवनपट उलगडवून सांगताना अनेक आठवणींना उजाळा दिला. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आयारामांना मंत्रिपदे मिळाल्याची व निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा सुरू असताना डॉ. मोडक यांनी अन्य पक्षातून आलेल्यांना रामभाऊ म्हाळगी यांचा त्याग व त्या पुण्याईवर उभे असलेल्या केंद्रातील भाजप सरकारची सूचक आठवण करून दिल्याचे बोलले जात आहे.

चव्हाण म्हणाले, उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून कार्यकर्त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले जाते. ठाण्यात ४० वर्षे होणाऱ्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत देशभरातील दिग्गज आपले विचार मांडतात. म्हाळगी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्यातील गुण आत्मसात करण्याची आणि जनसेवेसाठी वाहून घेण्याची संधी आपल्याला आहे. त्या संधीतून प्रत्येकाने स्वतःला प्रगल्भ बनवले पाहिजे.

यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. युवा मोर्चा अध्यक्ष मिहीर देसाई यांनी सूत्रसंचलन केले. त्यावेळी रा. स्व. संघाचे मधुकर चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर आदी उपस्थित होते.

चौकट :

म्हाळगी यांनी खेडोपाडी जाऊन जनसंघ उभा केला

पाटील म्हणाले, मी रामभाऊंच्या सोबत साडेचार वर्षे होते. ते ठाण्याचे खासदार होते. त्यावेळचा मतदारसंघ त्यांनी प्रवास करून पिंजून काढला, तेव्हाच्या काळात प्रवासाची तसेच संभाषणाची साधन नसताना त्यांनी खेडोपाडी जाऊन जनसंघ उभा केला. त्यांचे जीवन अभ्यास करण्यासारखे आहे. कार्यकर्त्यांना निश्चित प्रेरणा देणारे आहे.

---------

वाचली