शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

भाजप नेत्यांनी सामान्यांची उपेक्षा करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : जनसंघाच्या स्थापनेपासून दोनदा खासदार राहिलेले स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी पक्षाची अत्यंत खडतर काळात उभारणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : जनसंघाच्या स्थापनेपासून दोनदा खासदार राहिलेले स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी पक्षाची अत्यंत खडतर काळात उभारणी केली. त्यांच्या योगदानामुळे आज भाजप दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली चांगली सत्ता चालवत आहे. त्यामुळे अनेकांना विविध संधी मिळत आहेत. नेते मंडळींनी त्यांना पद मिळाले की सामान्यांची उपेक्षा करू नये. सामान्यांची जाण ठेवणारा भाजप हा सध्या एकमेव पक्ष आहे. त्यामुळे पक्ष बळकटीचा संकल्प कार्यकर्त्यांनी रामभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करावा, असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी केले.

माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्या आयोजनाखाली म्हाळगी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी प्रगती महाविद्यालयात हे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मोडक यांनी रामभाऊंचा जीवनपट उलगडवून सांगताना अनेक आठवणींना उजाळा दिला. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आयारामांना मंत्रिपदे मिळाल्याची व निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा सुरू असताना डॉ. मोडक यांनी अन्य पक्षातून आलेल्यांना रामभाऊ म्हाळगी यांचा त्याग व त्या पुण्याईवर उभे असलेल्या केंद्रातील भाजप सरकारची सूचक आठवण करून दिल्याचे बोलले जात आहे.

चव्हाण म्हणाले, उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून कार्यकर्त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले जाते. ठाण्यात ४० वर्षे होणाऱ्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत देशभरातील दिग्गज आपले विचार मांडतात. म्हाळगी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्यातील गुण आत्मसात करण्याची आणि जनसेवेसाठी वाहून घेण्याची संधी आपल्याला आहे. त्या संधीतून प्रत्येकाने स्वतःला प्रगल्भ बनवले पाहिजे.

यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. युवा मोर्चा अध्यक्ष मिहीर देसाई यांनी सूत्रसंचलन केले. त्यावेळी रा. स्व. संघाचे मधुकर चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर आदी उपस्थित होते.

चौकट :

म्हाळगी यांनी खेडोपाडी जाऊन जनसंघ उभा केला

पाटील म्हणाले, मी रामभाऊंच्या सोबत साडेचार वर्षे होते. ते ठाण्याचे खासदार होते. त्यावेळचा मतदारसंघ त्यांनी प्रवास करून पिंजून काढला, तेव्हाच्या काळात प्रवासाची तसेच संभाषणाची साधन नसताना त्यांनी खेडोपाडी जाऊन जनसंघ उभा केला. त्यांचे जीवन अभ्यास करण्यासारखे आहे. कार्यकर्त्यांना निश्चित प्रेरणा देणारे आहे.

---------

वाचली