शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

भाजप नेत्यांनी सामान्यांची उपेक्षा करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : जनसंघाच्या स्थापनेपासून दोनदा खासदार राहिलेले स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी पक्षाची अत्यंत खडतर काळात उभारणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : जनसंघाच्या स्थापनेपासून दोनदा खासदार राहिलेले स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी पक्षाची अत्यंत खडतर काळात उभारणी केली. त्यांच्या योगदानामुळे आज भाजप दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली चांगली सत्ता चालवत आहे. त्यामुळे अनेकांना विविध संधी मिळत आहेत. नेते मंडळींनी त्यांना पद मिळाले की सामान्यांची उपेक्षा करू नये. सामान्यांची जाण ठेवणारा भाजप हा सध्या एकमेव पक्ष आहे. त्यामुळे पक्ष बळकटीचा संकल्प कार्यकर्त्यांनी रामभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करावा, असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी केले.

माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्या आयोजनाखाली म्हाळगी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी प्रगती महाविद्यालयात हे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मोडक यांनी रामभाऊंचा जीवनपट उलगडवून सांगताना अनेक आठवणींना उजाळा दिला. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आयारामांना मंत्रिपदे मिळाल्याची व निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा सुरू असताना डॉ. मोडक यांनी अन्य पक्षातून आलेल्यांना रामभाऊ म्हाळगी यांचा त्याग व त्या पुण्याईवर उभे असलेल्या केंद्रातील भाजप सरकारची सूचक आठवण करून दिल्याचे बोलले जात आहे.

चव्हाण म्हणाले, उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून कार्यकर्त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले जाते. ठाण्यात ४० वर्षे होणाऱ्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत देशभरातील दिग्गज आपले विचार मांडतात. म्हाळगी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्यातील गुण आत्मसात करण्याची आणि जनसेवेसाठी वाहून घेण्याची संधी आपल्याला आहे. त्या संधीतून प्रत्येकाने स्वतःला प्रगल्भ बनवले पाहिजे.

यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. युवा मोर्चा अध्यक्ष मिहीर देसाई यांनी सूत्रसंचलन केले. त्यावेळी रा. स्व. संघाचे मधुकर चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर आदी उपस्थित होते.

चौकट :

म्हाळगी यांनी खेडोपाडी जाऊन जनसंघ उभा केला

पाटील म्हणाले, मी रामभाऊंच्या सोबत साडेचार वर्षे होते. ते ठाण्याचे खासदार होते. त्यावेळचा मतदारसंघ त्यांनी प्रवास करून पिंजून काढला, तेव्हाच्या काळात प्रवासाची तसेच संभाषणाची साधन नसताना त्यांनी खेडोपाडी जाऊन जनसंघ उभा केला. त्यांचे जीवन अभ्यास करण्यासारखे आहे. कार्यकर्त्यांना निश्चित प्रेरणा देणारे आहे.

---------

वाचली