शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भाजपाचे पुन्हा अमराठी कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:25 IST

मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी सर्वात जास्त म्हणजे ६४ मराठी उमेदवार शिवसेनेने दिले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ उमेदवार दिले आहेत.

धीरज परब मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी सर्वात जास्त म्हणजे ६४ मराठी उमेदवार शिवसेनेने दिले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ उमेदवार दिले आहेत. भाजपाने मराठी उमेदवारांऐवजी अमराठी उमेदवारांना प्राधान्य दिले असून ५० अमराठी, तर ४३ मराठी उमेदवारांना तिकीटे दिली आहेत.मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी घराणेशाही, जातीधर्माच्या उमेदवार न देता त्याचे चारित्र्य, शिक्षणाच्या आधारे तिकीटवाटप करू असे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात त्या साºयांपेक्षा निवडून येण्याचा निकष महत्तवाचा ठरला आहे.मीरा-भार्इंदरच्या ९५ जागांसाठी २० आॅगस्टला मतदान होणार आहे. त्यात पाच लाख ९३ हजार ३३५ मतदार असून त्यात तीन लाख २१ हजार ७७० पुरुष, तर दोन लाख ७१ हजार ५४८ महिला मतदार आहेत; तर अन्य १७ जण आहेत.मीरा-भार्इंदर हे तसे विविध धर्म, जात, प्रांताचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे मराठी मतदारांसह गुजराती, राजस्थानी व जैन तसेच ख्रिश्चन, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्याही मोठी-निर्णायक आहे. मराठी मतदारांकडूनही मराठी भाषक उमेदवारच हवा, असा आग्रह धरला जात नाही. कारण हा मतदारही विभागलेला आहे. अन्य धर्म, प्रांत किंवा जातीच्या मतदारांची संख्याही निर्णायक आहे.गुजराती, जैन, राजस्थानी, उत्तर भारतीय, ख्रिश्चन, मुस्लीम मतदार निर्णायक असलेल्या प्रभागांमध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मतदारांना चुचकारण्यासाठी त्या त्या धर्म, जात, प्रांताचा उमेदवार देण्यासाठी पराकाष्ठा करतात. मनसेने निवडणुकीत २५ उमेदवार उभे केले आहेत. त्यात १८ मराठी उमेदवार आहेत. गुजराती-राजस्थानी चार, तर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय व बंगाली असा प्रत्येकी एक उमेदवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने ६७ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यात ४४ मराठी, ८ जैन, गुजराती व मारवाडी, १० मुस्लिम, प्रत्येकी ३ उत्तर भारतीय व ख्रिश्चन; तर दक्षिण भारतीय अणि बंगाली एक-एक उमेदवार दिले आहेत.बहुजन विकास आघाडीने २७ उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यात १५ मराठी, गुजराती, जैन, मारवाडी २; उत्तर भारतीय ४, मुस्लिम ५ व एका बंगाली उमेदवाराचा समावेश आहे.पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाने ९४ उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत. परंतु प्रभाग २० मधून त्यांच्या नगरसेविका डॉ. नयना वसाणी यांनी गंभीर गुन्ह्याचे कलम तसेच शिक्षणाची माहिती लपवल्याने त्यांचा उमेदवारी अर्जच बाद झाला. त्यामुळे आता भाजपाचे ९३ उमेदवार रिंगणात आहेत.भाजपाने मराठीऐवजी अमराठी उमेदवारांना जास्त प्राधान्य दिले आहे. तब्बल ५० अमराठी उमेदवार देताना मराठी उमेदवार ४३ दिले आहेत. भाजपाने २७ जैन, राजस्थानी व गुजराती उमेदवार दिले आहेत. उत्तर भारतीय ८, मुस्लिम ५ तर ख्रिश्चन-दक्षिण भारतीय प्रत्येकी ३, तर अन्य ४ उमेदवार दिले आहेत.मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे पक्षाची सूत्रे आल्यापासून त्यांनी अमराठी उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. प्रभाग पाचमधून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शरद पाटील यांचा पत्ता कापून राकेश शहा यांना उमेदवारी दिली. रोहिणी संजय कदम यांना डावलून रक्षा भूपतानी यांना प्रभाग सातमधून तिकीट दिले. शिवसेनेतून आलेल्या प्रशांत दळवींना २० मधून उमेदवारी न देता प्रभाग १७ मध्ये पाठवले. सुधीर कांबळी यांच्या पत्नीला डावलून हेतल परमारना तिकीट दिले.प्रभाग २३ मधून शैलेष म्हामूणकर यांच्या पत्नी ऐवजी वर्षा भानुशाली यांना उमेदवारी दिली.मराठी इच्छुकांना दाखवला कात्रजचा घाटप्रभाग १४ मध्ये अनिल भोसलेंना घरचा रस्ता दाखवत मीरादेवी यादव यांना उभे केले. याशिवाय किरण चेऊलकर, किरण गेडाम, राजेंद्र मोरे, अजित पाटील आदी मराठी भाषक इच्छुकांना कात्रजचा घाट दाखवला. यामुळे मराठी भाषिक उमेदवारांनी बंडखोरी केली किंवा ते नाराज झाले.शिवसेनेने ९४ उमेदवारांपैकी तब्बल ६४ मराठी भाषक उमेदवार दिले आहेत. मराठी भाषकांमध्ये स्थानिक ख्रिश्चनांचाही देखील समावेश आहे. मराठी भाषकांना प्राधान्य देतानाच शिवसेनेने १२ उत्तर भारतीय, ८ जैन- गुजराती - मारवाडी, ७ मुस्लिम, २ दक्षिण भारतीय उमेदवार दिले.शिवसेनेच्या एका उत्तर भारतीय महिला उमेदवाराचा अर्ज बाद झाला.काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ७८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात ३५ मराठी भाषक आहेत. या शिवाय १५ उत्तर भारतीय, ११ जैन- गुजराती- मारवाडी, १० मुस्लिम, ४ ख्रिश्चन, २ दक्षिण भारतीय, तर एक बंगाली उमेदवार पक्षाने दिला आहे.मीरा-भार्इंदर हे विविध धर्म, जात, प्रांताचे शहर असून येथे मराठी मतदारांसह गुजराती, राजस्थानी व जैन तसेच ख्रिश्चन, मुस्लिम आणि उत्तर भारतीयांची संख्याही मोठी आहे.