शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच ९४ लाखांचे बिल काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST

ठाणे : शहापूर तालुक्यातील भाकरपाडा रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेव्दारे तब्बल २०१७ पासून सुरू आहे. यासाठी केवळ मोऱ्यांचे खड्डे ...

ठाणे : शहापूर तालुक्यातील भाकरपाडा रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेव्दारे तब्बल २०१७ पासून सुरू आहे. यासाठी केवळ मोऱ्यांचे खड्डे खोदून ठेवलेले असतानाच अधिकाऱ्यांच्या संगनमताने संबंधित ठेकेदाराने ९४ लाखांचे बिल परस्पर काढून भ्रष्टाचार केला, असा आरोप ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य देवराम भगत यांनी केला. यामुळे सभागृहात एकच गाेंधळ होऊन अन्यही सदस्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील भ्रष्टाचाराची मालिका सभागृहात कथन केली.

कोरोनामुळे तब्बल एक वर्षानंतर ठाणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नियोजन भवनमध्ये शुक्रवारी पार पडली. अध्यक्षा सुषमा लोण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष सुभाष पवार, बांधकाम सभापती कुंदन पाटील आदींसह अन्य सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार आदींसह जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सभापती आदी सभागृहात उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराचा मुद्दा भगत यांनी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

शहापूर तालुक्यातील या भाकरी पाडा रस्त्याच्या कामाची वर्कऑर्डर २०१७ ची आहे. आतापर्यंत चार वर्षे होत असतानाही या रस्त्याचे काम झाले नसल्याची पोलखोल भगत यांनी केली. यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याला किती रक्कम मिळाली हेदेखील सभागृहात उघड करण्याचा दम भगत यांनी दिला. सभागृहातील अन्य सदस्यांनीही हा मुद्दा उचलून धरल्याचे लक्षात घेऊन संबंधित ठेकेदारावर कामाच्या शिल्लक रकमेवर आठवड्याला एक टक्का रकमेची दंडात्मक कारवाई केल्याचे अधिकाऱ्याने सभागृहात नमूद केले.

उत्तर शिव या ठाणे तालुक्यातील गावाच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असतानाही ठेकेदाराला बिल काढून दिल्याचे सदस्य रमेश पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. या कामाची वेळोवेळी तक्रार करूनही ठेकेदारावर कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला, तर साकवचे काम झालेले नसतानाही कामाचे बिल काढल्याच्या आरोपासह विहिरीच्या कामांचीही बिले ठेकेदारांनी काढल्याची धक्कादायक माहिती रमेश जाधव यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली. भिवंडीच्या झिडका ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने भ्रष्टाचार करूनही कारवाई झाली नाही. केवळ त्यांची पालघरला बदली केल्याचा मुद्यावरही जाधव यांनी सभागृहात चर्चा केली.

........

जाेड -मुलींचा जन्मदर वाढविण्याची मागणी