शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘भातसा’ ९९ टक्के भरले, गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर/वासिंद : सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत. भातसा धरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर/वासिंद : सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत. भातसा धरण सध्या ९९.०६ टक्के भरले असून, धरणाचे पाचही दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी भातसा नदीच्या प्रवाहात उतरणे नागरिकांनी टाळावे किंवा पाण्यात उतरताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच नदीलगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

भातसा धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असली, तरी नदीकाठच्या गावांची चिंता मात्र वाढली आहे. भातसा नदी किनाऱ्यालगतच्या साजीवली, सरलांबे, तुते, सावरशेत, सापगाव, खुटघर, खुटाडी या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, तेथील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सय्या धरणाची पाणी पातळी १४१.७० मी असून, पूर्ण संचय पातळी १४२.०७ मी. आहे. आज धरण क्षेत्रात ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

------------

विद्युत गृहातून सोडण्यात आलेला विसर्ग २१.१३६ क्युसेक्स इतका आहे. भातसा नदीत पाणी जास्त नसते, तेव्हाच धरणातून पाणी सोडले जाते. धरणातून पाणी सोडल्यामुळे सापगाव पूल कधीही पाण्याखाली बुडाला नाही, त्याबाबत आम्ही नेहमी काळजी घेतो.

- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, भातसा धरण.