शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाटिया हत्येप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: March 28, 2016 02:00 IST

वांगणीत झालेल्या पितांबर भाटिया (७०) या ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, शनिवारी रायगड जिल्ह्यातील बेडीसगाव येथून पोलिसांनी तिघांना अटक

बदलापूर : वांगणीत झालेल्या पितांबर भाटिया (७०) या ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, शनिवारी रायगड जिल्ह्यातील बेडीसगाव येथून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांनी चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काशिनाथ पुजारा (२८), रवींद्र वारे (३०), अरु ण भवारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वांगणीतील पितांबर भाटिया (७०) यांची हत्या करण्यात आली. भाटिया एकटेच बंगल्यात राहत असल्याचे पुजारा याला माहीत असल्यामुळे त्याने रवींद्र व अरु ण यांच्यासह चोरी करण्याच्या उद्देशाने बंगल्यात प्रवेश केला. त्या वेळी आवाज आल्याने भाटिया मुख्य दरवाजा उघडून बंगल्याच्या बाहेर आले. काशिनाथ याला भाटिया यांनी ओळखले. भाटिया पोलिसात तक्रार करतील, या भीतीने तिघांनी भाटिया यांची हत्या केली आणि ते पळून गेले. १५ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील काशिनाथ पुजारा व त्याच्या दोन मित्रांनी भाटिया यांच्या बंगल्यातील नारळाचे एक झाड तोडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांची एकत्र व स्वतंत्रपणे चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळली. त्यानंतर, पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी एच.टी. व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके स्थापन करून या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, एस.बी. हरगुडे, हवालदार के.एन. काशिवले यांच्या पथकाने ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)- २१ मार्चला सकाळी बंगल्याच्या मुख्य दरवाजात भाटिया यांचा मृतदेह आढळला. चोरट्यांनी त्यांची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत होता. मात्र, घरातील कोणतेही सामान चोरीला गेलेले नव्हते. त्यामुळे भाटिया यांची हत्या कोणी व कशासाठी केली, असा प्रश्न पोलिसांसमोर होता.- भाटिया यांना मूलबाळ नव्हते. पाच वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्याने ते एकटेच बंगल्यात राहत होते.