शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

भार्इंदर खाडीपूल रेल्वे मोडीत काढणार ?

By admin | Updated: December 22, 2015 00:11 IST

पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल

वसई : पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल काढण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत. त्यामुळे चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या तीन हजार लोकवस्तीच्या पाणजू गावातील पाणी आणि वीज पुरवठा लवकरच खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.चारही वाजूने पाण्याने वेढलेल्या पाणजू बेटावर नरवीर चिमाजी आप्पांच्या काळापासून वस्ती आहे. या ऐतिहासिक गावात जाण्यासाठी बोटीचाच पर्याय आहे. रेल्वेचा वावर सुरु झाल्यानंतर ब्रिटीशांनी वसई खाडीवर उत्तर आणि दक्षिणेला दोन पूल बांधले होते. या पुलावरून नायगांव किंवा भार्इंदर रेल्वे स्थानकावरून चालत गावात पोहोचण्याची दुसरी व्यवस्था झालेली आहे. १९७१ साली या गावाला स्टेम प्राधिकरणामार्फत रेल्वेपुलावरून भार्इंदरमार्गे पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानतंर १९८६ मध्ये पूलावरूनच केबल टाकून महावितरणने वीजपुरवठाही केला आहे. या दोन्ही वाहिन्या जुन्या पुलांवरून करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशकालिन पूल धोकादायक असल्याने रेल्वेने विरार-बोरीवली चौपदरीकरणात दुसरे दोन पूल बांधले. त्यानंतर दोनही पूलावरून रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. दोन्ही पूल दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी त्याचा वापर व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. पण, पूल धोकादायक असल्याने रेल्वेने सुरक्षिततेत्या कारणास्तव ही मागणी धुडकावली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमएमआरडीएच्या मदतीने वसई आणि भार्इंदर दरम्याने वाहतूकीसाठी नवे पूल बांधण्याचा प्रस्तावही तयार केला होता. पण, प्रचंड खर्च असल्याने त्याबाबतीत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. हा पूल पाणजूकरांसाठी दळणवळण आणि इतर सोयी-सुविधांसाठी उपयुक्त होता. आता नवा पूलही होण्याची चिन्हे दिसत नसताना रेल्वेने आपले दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेम प्राधिकरणाला १६० मिलीमिटर व्यासाची पाईपलाईन आणि महावितरण कंपनीला वीज पुरवठा करणाऱ्या केबल तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश रेल्वेचे उपमुख्य अभियंता एम.के.अग्रवाल यांनी दिले आहेत. या निर्देशामुळे पाणजुकरांची वीज आणि पाणी हिरावली जाणार आहे. (प्रतिनिधी)