शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर खाडीपूल रेल्वे मोडीत काढणार ?

By admin | Updated: December 22, 2015 00:11 IST

पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल

वसई : पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल काढण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत. त्यामुळे चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या तीन हजार लोकवस्तीच्या पाणजू गावातील पाणी आणि वीज पुरवठा लवकरच खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.चारही वाजूने पाण्याने वेढलेल्या पाणजू बेटावर नरवीर चिमाजी आप्पांच्या काळापासून वस्ती आहे. या ऐतिहासिक गावात जाण्यासाठी बोटीचाच पर्याय आहे. रेल्वेचा वावर सुरु झाल्यानंतर ब्रिटीशांनी वसई खाडीवर उत्तर आणि दक्षिणेला दोन पूल बांधले होते. या पुलावरून नायगांव किंवा भार्इंदर रेल्वे स्थानकावरून चालत गावात पोहोचण्याची दुसरी व्यवस्था झालेली आहे. १९७१ साली या गावाला स्टेम प्राधिकरणामार्फत रेल्वेपुलावरून भार्इंदरमार्गे पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानतंर १९८६ मध्ये पूलावरूनच केबल टाकून महावितरणने वीजपुरवठाही केला आहे. या दोन्ही वाहिन्या जुन्या पुलांवरून करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशकालिन पूल धोकादायक असल्याने रेल्वेने विरार-बोरीवली चौपदरीकरणात दुसरे दोन पूल बांधले. त्यानंतर दोनही पूलावरून रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. दोन्ही पूल दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी त्याचा वापर व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. पण, पूल धोकादायक असल्याने रेल्वेने सुरक्षिततेत्या कारणास्तव ही मागणी धुडकावली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमएमआरडीएच्या मदतीने वसई आणि भार्इंदर दरम्याने वाहतूकीसाठी नवे पूल बांधण्याचा प्रस्तावही तयार केला होता. पण, प्रचंड खर्च असल्याने त्याबाबतीत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. हा पूल पाणजूकरांसाठी दळणवळण आणि इतर सोयी-सुविधांसाठी उपयुक्त होता. आता नवा पूलही होण्याची चिन्हे दिसत नसताना रेल्वेने आपले दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेम प्राधिकरणाला १६० मिलीमिटर व्यासाची पाईपलाईन आणि महावितरण कंपनीला वीज पुरवठा करणाऱ्या केबल तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश रेल्वेचे उपमुख्य अभियंता एम.के.अग्रवाल यांनी दिले आहेत. या निर्देशामुळे पाणजुकरांची वीज आणि पाणी हिरावली जाणार आहे. (प्रतिनिधी)