शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

भार्इंदर खाडीपूल रेल्वे मोडीत काढणार ?

By admin | Updated: December 22, 2015 00:11 IST

पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल

वसई : पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल काढण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत. त्यामुळे चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या तीन हजार लोकवस्तीच्या पाणजू गावातील पाणी आणि वीज पुरवठा लवकरच खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.चारही वाजूने पाण्याने वेढलेल्या पाणजू बेटावर नरवीर चिमाजी आप्पांच्या काळापासून वस्ती आहे. या ऐतिहासिक गावात जाण्यासाठी बोटीचाच पर्याय आहे. रेल्वेचा वावर सुरु झाल्यानंतर ब्रिटीशांनी वसई खाडीवर उत्तर आणि दक्षिणेला दोन पूल बांधले होते. या पुलावरून नायगांव किंवा भार्इंदर रेल्वे स्थानकावरून चालत गावात पोहोचण्याची दुसरी व्यवस्था झालेली आहे. १९७१ साली या गावाला स्टेम प्राधिकरणामार्फत रेल्वेपुलावरून भार्इंदरमार्गे पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानतंर १९८६ मध्ये पूलावरूनच केबल टाकून महावितरणने वीजपुरवठाही केला आहे. या दोन्ही वाहिन्या जुन्या पुलांवरून करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशकालिन पूल धोकादायक असल्याने रेल्वेने विरार-बोरीवली चौपदरीकरणात दुसरे दोन पूल बांधले. त्यानंतर दोनही पूलावरून रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. दोन्ही पूल दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी त्याचा वापर व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. पण, पूल धोकादायक असल्याने रेल्वेने सुरक्षिततेत्या कारणास्तव ही मागणी धुडकावली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमएमआरडीएच्या मदतीने वसई आणि भार्इंदर दरम्याने वाहतूकीसाठी नवे पूल बांधण्याचा प्रस्तावही तयार केला होता. पण, प्रचंड खर्च असल्याने त्याबाबतीत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. हा पूल पाणजूकरांसाठी दळणवळण आणि इतर सोयी-सुविधांसाठी उपयुक्त होता. आता नवा पूलही होण्याची चिन्हे दिसत नसताना रेल्वेने आपले दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेम प्राधिकरणाला १६० मिलीमिटर व्यासाची पाईपलाईन आणि महावितरण कंपनीला वीज पुरवठा करणाऱ्या केबल तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश रेल्वेचे उपमुख्य अभियंता एम.के.अग्रवाल यांनी दिले आहेत. या निर्देशामुळे पाणजुकरांची वीज आणि पाणी हिरावली जाणार आहे. (प्रतिनिधी)