शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

भार्इंदरमध्ये भाजपा विरुद्ध भाजपा

By admin | Updated: June 20, 2017 06:24 IST

पालिका निवडणुकीच्या तोंडावर मीरा-भार्इंदर भाजपाच्या नेतृत्वाविरोधात टीकेची झोड उठवत भ्रष्टाचार, लूटमार आणि भयमुक्त शहर करण्याचा, पारदर्शक विकासाचा मुद्दा संघ परिवारातील ज्येष्ठ

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : पालिका निवडणुकीच्या तोंडावर मीरा-भार्इंदर भाजपाच्या नेतृत्वाविरोधात टीकेची झोड उठवत भ्रष्टाचार, लूटमार आणि भयमुक्त शहर करण्याचा, पारदर्शक विकासाचा मुद्दा संघ परिवारातील ज्येष्ठ निष्ठावंतांनी मांडल्याने भाजपाची अडचण झाली झाली आहे. नव्याने भाजपात आलेल्यांसह शहरातील अन्य मंडळींना सोबत घेत या ज्येष्ठांनी भार्इंदर जनसेवा पार्टीची अर्थात ‘भाजपा’ची स्थापना केली आहे. या नव्या भाजपाच्या झेंड्याखाली मीरा-भार्इंदर संघर्ष मोर्चाच्या नावे पालिकेच्या सर्व जागा लढवण्याचे त्यांनी जाहीर केले. पालिका निवडणुकीपूर्वीच संघ व भाजपाच्या ज्येष्ठांनी स्थानिक नेतृत्वाविरुध्द दंड थोपटल्याने ‘भाजपा विरुध्द भाजपा’ असाही सामना रंगणार आहे. माजी पालिका आयुक्त आणि भाजपात प्रवेश करुनही गेली पाच वर्षे अडगळीत टाकलेले शिवमूर्ती नाईक, संघाचे स्वयंसेवक तथा ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया, संघ व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. दिलीप पंडित, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व स्टील असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मित्तल, संघ व भाजपाशी जोडलेले भगवान कौशिक आदींनी जनता दल (से.) चे माजी नगरसेवक मीलन म्हात्रेंसोबत मिळून भार्इंदर जनसेवा पार्टीची स्थापना केली आहे. नाईक हे या पक्षाचे अध्यक्ष, सचिवपदी म्हात्रे, उपाध्यक्षपदी गाडोदिया व कौशिक, खजिनदारपदी पंडित, तर प्रसिध्दीप्रमुख म्हणून विलास भोईर काम पाहणार आहेत. सर्व नागरिक जरी भाजपाच्या बाजुचे असले, तरी स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या मनमानी व दहशतवादी कारभारामुळे प्रामाणिक कार्यकर्ते त्रासले आहेत. यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे शहर नियोजन शून्य होऊन धोक्याच्या पातळीवर आहे. मेहता हे बिल्डर, धनिकांच्या सोयीने काम करत आहेत, असा नाईकांचा आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव, टक्केवारीचे राजकारण, जागा हडपणे, गैरप्रकार यामुळे शहराचे वाटोळे झाले असून पुरेसे पाणी, वैद्यकीय व आरोग्य सेवा, मार्केट, पार्किंग, वाहतुक कोंडी, रस्ते-पदपथांची दुरवस्था, मार्केट, परिवहन व्यवस्था, शाळा आदी मुलभूत समस्या गंभीर बनल्याचे नाईक म्हणाले. शहराचा विकास न होता फक्त आमदार मेहतांचाच विकास झाला आहे. शहरात लूटमार व भ्रष्टाचार बोकाळला असून विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल होत असल्याचे मीलन म्हात्रे म्हणाले. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानतो. पण स्थानिक भाजपा आमदाराच्या दडपशाही व मनमानीविरुध्द हे पाऊल उचलले आहे. पारदर्शक व स्वच्छ कारभार आणि मुलभूत विकासाला प्राधान्य अशी आमची भूमिका असल्याचे गाडोदिया म्हणाले.बंडखोर, नाराजांची सोय : या नव्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क चांगला आहे. मीरा-भार्इंदर संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून सर्व ९५ जागा लढवल्या जाणार आहेत. आता दोन्ही पक्षाचा उल्लेख ‘भाजपा’ म्हणूनच होणार असल्याने लोकांतही गोंधळ उडण्याची शक्यता आहे. भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी आहे. स्थानिक नेतृत्वाने अनेकांना उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. शिवाय आमदार मेहतांबद्दल नाराजी असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. संघ व भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असलेल्या शैलेष पांडे यांनी समर्थकांसह नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. अशा नाराज, बंडखोरांना भार्इंदर जनविकास पार्टीचा म्हणजे नव्या भाजपाचा पर्याय खुला झाला आहे. अन्य पक्षातील इच्छुकांनाही या नव्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत. या दुसऱ्या भाजपाने सामाजिक संस्था, संघटनांनाही जोडण्याचे काम सुरु केले आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर महापौर व नंतर ज्येष्ठांना डावलून मेहता थेट भाजपाचे जिल्हाध्यक्ष झाले. २००९ मध्ये विधानसभेची उमेदवारी, २०१२ च्या पालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी व २०१४ ला पुन्हा विधानसभेची उमेदवारी मेहतांना मिळाली. सत्ता व संपत्ती झटपट मिळाल्यानंतर मेहता हे नेहमीच वादग्रस्त राहिले. त्यांच्यावर मनमानी, गैरप्रकार आदींचे आरोप सुरुच आहेत. भाजपात देखील त्यांनी स्वत:चा गोतावळा गोळा केला असून भाजपाची ध्येय धोरणे व तत्व कागदावरच उरले आहेत. सोयीनुसार पदे दिली जात आहेत. यातूनच संघ व भाजपाची तत्वे घेऊन चालणारे पक्षातले अनेक जुने - जाणते नाराज आहेत. पक्षात नव्याने आलेल्या अनेकांना भूलथापा देऊन बोळवण केल्याने ते देखील नाराज आहेत. त्याला या नव्या भाजपाने तोंड फोडले आहे.