शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मीटरमुळे भाईंदरला पाणीकपात

By admin | Updated: March 31, 2016 02:51 IST

शहराला स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सदोष मीटरमुळे रोज १० ते १५ एमएलडी पुरवठ्याला मुकावे लागत आहे. पाणीपुरवठा कमी होत असला तरी मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत

भार्इंदर : शहराला स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सदोष मीटरमुळे रोज १० ते १५ एमएलडी पुरवठ्याला मुकावे लागत आहे. पाणीपुरवठा कमी होत असला तरी मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत असल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे. या तांत्रिक पाणीकपातीची समस्या महापौर गीता जैन यांनी स्टेमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत सदोष मीटरची दुरुस्ती करण्याची मागणी स्टेमकडे केली आहे.शहराला स्टेमद्वारे ८६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. स्टेमच्या अभियंत्यांनी मीरा-भार्इंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या चेना येथील मुख्य जलवाहिनीवर बसवलेल्या मीटरची नुकतीच चाचपणी केली. त्या वेळी त्यांनी मीटरमधील काही तांत्रिक दोष दुरुस्त करून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मोजणीला सुरुवात केली. मीटर दुरुस्तीनंतर प्रत्यक्षात होत असलेल्या पाणीपुरवठ्यात १० ते १५ एमएलडीची घट होऊनही मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित याची माहिती स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक कर्नल चौधरी व महाव्यवस्थापक शशिकांत साळुंखे यांना देत मीटर दुरुस्तीची मागणी केली. त्यावर, दोन्ही प्रशासनांत वाद निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने थेट महापौरांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार, महापौर गीता जैन यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदोष मीटरची दुरुस्ती करून शहराच्या वाट्याला मिळालेले पाणी देण्याचे आदेश दिले. उद्या सदोष मीटरच्या दुरुस्तीसाठी स्टेमचे अधिकारी येणार असून आठ दिवसांपासून सुमारे १२० एमएलडी कमी मिळालेल्या पाण्यावरही चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. याला स्टेमच्या महाव्यवस्थापकांनीसुद्धा दुजोरा दिला. काही दिवसांतच सदोष मीटर बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)